५१
संपादने
(दुवे जोडले) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
||
परभणी शहरात तुराबुल हक पीर यांचा दर्गा आहे. फेब्रुवारी महिन्याच्या २ तारखेला दर्ग्यामध्ये उरूस भरतो. हा उरूस १० ते १२ दिवस चालतो. या उरुसामध्ये दर्ग्याच्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची दुकाने मांडली जातात, ज्यामध्ये खेळणी, आकर्षक वस्तू, गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, मनोरंजनाच्या वस्तू इत्यादी अनेक प्रकारच्या वस्तूंचा समावेश असतो. तसेच वेगवेगळी कलाप्रदर्शने, क्रीडा व इतर कौशल्यांची प्रदर्शने केली जातात. उरुसामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा आपआपल्या आवडीनुसार या सर्व ठिकाणी जातो व त्यांच्या आनंद घेतो. परभणीच्या या उरूस रुपी जत्रेमध्ये परभणी शहारामधूनच नाही तर वेगवेगळ्या आजूबाजूच्या गावांमधूनही अनेक लोक सहभागी होतात. लहान-मोठी माणसे, महिला वर्ग, वृध्द, तसेच प्रत्येक वयाचे लोक या मध्ये आनंदाने सहभागी होतात. या उरुसाचे वैशिष्ट्य म्हणजे या उरूसामध्ये कोणताही भेदभाव न ठेवता प्रत्येक जातीधर्माचे व्यक्ती सहभागी होतात आणि एकमेकांसोबत आनंदाने प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतात. या उरुसाच्या कालावधी मध्ये दररोज शहराच्या वेगवेगळ्या भागांमधून ऊंठांची मिरवणूक काढण्यात येते, या मिरवणुकीला '''संदल''' असे म्हणतात. या संदल मध्ये उंठांच्या पाठीवर नवीन चादर आणि फुलांच्या झुली अंथरूण त्यांना वाजत्र्यांसहित नाचतगात शहरातून फिरवले जाते आणि शेवटी दर्ग्याजवळ आणले जाते. नंतर ह्या चादर, झुली उंठांवरून काढून दर्ग्यामध्ये चढवल्या जातात. परभणी शहरातील आणि शहराच्या आजूबाजूच्या गावातील लोक या उरुसाच्या प्रतीक्षेत असतात आणि या मध्ये उत्साहाने सहभागी होतात.
परभणी शहरात [[मराठवाडा कृषी विद्यापीठ]] आहे. २०१३ मध्ये या विद्यापीठाचे नाव बदलून त्याचे नाव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असे ठेवण्यात आले. या विद्यापीठामध्ये शेती संबधित विविध अभ्यासक्रम घेतले जातात, तसेच त्यामध्ये विविध प्रकारचे संशोधन करून विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले जातात.
|
संपादने