'''वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ''' [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[परभणी]] शहरातील [[कृषी विद्यापीठ]] आहे.
१९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेच्या काही काळ आधी तत्कालीन हैदराबाद राज्यात असलेल्या परभणी येथे कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. त्याचाच पुढे विस्तार करून १८ मे १९७२ रोजी '''मराठवाडा कृषी विद्यापीठा'''ची स्थापना परभणीत करण्यात आली.[५] २०१३ मध्ये या विद्यापीठाचे नाव बदलले आणि त्याचे नाव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असे करण्यात आले. मराठवाड्याचेवसंतराव नाईकांचे कृषी क्षेत्रातील मोलाचे कार्य लक्षात घेऊन नोव्हेंबर २०१२ मध्ये मुख्यमंत्र्यांनी असे घोषित केले की मराठवाडा कृषी विद्यापीठाचे नाव बदल्यात येऊन ते वसंतराव नाईक यांच्या नावावर ठेवण्यात यावे. मराठवाड्यातील आठही जिल्हे हे या विद्यापीठाचेविद्यापीठाच्या कार्यक्षेत्रकार्यक्षेत्रामध्ये आहेयेतात. कृषी, शेतीशी संबंधित शास्त्रे आणि मानव्यविद्येचे शिक्षण देणे हे या विद्यापीठाचे प्रमुख कार्य आहे. त्याचप्रमाणे कृषी विषयांचे संशोधनही येथे होते. या विद्यापीठामध्ये आणि याच्या अंतर्गत वेगवेगळी महाविद्यालये आहेत. त्यामध्ये कृषी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, गृहविज्ञान महाविद्यालय (अलीकडे याचे नाव बदलून सामुदायिक विज्ञान महाविद्यालय असे करण्यात आले आहे), अन्नतंत्र महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय इत्यादींचा समावेश होतो. या विद्यापीठाच्या स्थापनेच्या वेळी या विद्यापीठामध्ये पशुवैद्यक आणि पशुविद्यान महाविद्यालयाचाही समावेश होता, परंतु महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर च्या स्थापनेनंतर हे महाविद्यालय २००० - २००१ या वर्षात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठापासून वेगळे झाले. या विद्यापीठामध्ये वेगवेगळी पदविका, पदवी, पदविउत्तर, तसेच आचार्य पदवी अभ्यासकमे घेतली जातात. या विद्यापीठामध्ये शिक्षणाबरोबरच संशोधन आणि विस्तार शिक्षणही तितकेच महत्त्वाचे आहे.