"दिनकरराव गोविंदराव पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ५:
अप्पासाहेब पवारांनी आपले ज्ञान ज्या रीतीने प्रत्यक्ष शेतीत वापरले, निरनिराळे प्रयोग यशस्वी केले ते थक्क करणारे होते. त्यामुळे बारामती परिसराचा चेहरामोहराच पालटून गेला. इस्रायलसारख्या छोट्या देशाने शेतीत मारलेला पल्ला अप्पासाहेबांनी प्रत्यक्ष पाहिला आणि हे आपल्या भूमीत का होऊ शकणार नाही, अशा जिद्दीने कामाला जुंपून घेतले.
बारामतीचे कृषी-विकास प्रतिष्ठान म्हणजे अप्पासाहेबांची सृजनशील अशी प्रयोगशाळाच होती.
विविधं पिके वेगवेगळ्या हंगामात कशी पिकवा वीत याची प्रातीशके त्यांनी दाखवली. शेतीला जोडून दुध व्यवसाय, कुकुटपालन,शेळी मेंढी पालन, मधमाश्या पालन करून जोड धेंदा कसा करावा याचे प्रशिक्षण त्यांनी शेतक्र्याना दिले. प्रदेशातील दुधाळ गाई या देशात निर्माण करण्यासाठी देशी गायीवरपरदेशी वळूचा संकर करून दुधाचे उत्पादने त्यांनी वाढवून दाखवले.जमिनीतील तनावरउपय योजना करण्यासाठी प्लाय्स्तिक चा कागद जमिनीवर टाकून तन वाढू नयेहा प्रयोग त्यांनी यशवी करून दाखवला.
इस्रायल च्या भेटीनंतर शेतीला पाणी देणाऱ्या परंपरागत पद्धतीतबदल करून ठिबक सिंचन करून उत्तम पिक काढता येतेहे त्यांनी अनेक प्रयोग करून दाखवले.
तेथे प्रत्येक धडपडणाऱ्या, नवीन विचार करणाऱ्या शेतकऱ्याचे स्वागत होते. आता शेतीत सर्रास वापरले जाणारे ठिबक सिंचन तंत्रज्ञान अप्पासाहेबांनी बारामतीत कित्येक वर्षांपूर्वीच यशस्वी केले.
नारळाचे देशावर फारसे उत्पन्न न देणारे फळझाड बारामतीत रुजविले, त्यासाठी आपल्या सार्वजनिक जीवनात धडपडणाऱ्या धाकट्या भावाला-शरद पवार यांना, कोकणात पाठविले. तेथून मासळीच्या खताचा वापर आणि इतर गोष्टी आत्मसात करायला लावल्या. हा धाकटा भाऊ पुढे खूप मोठा झाला तरी अप्पासाहेबांच्या कर्तृत्वाचा आधार आणि सावली त्याच्या मागे उभी असे.
|