"अतिसार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
sized |
Mahendra.adt (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ २६:
'''
अतिसारामधील गुंतागुंत''' –
अतिसारामुळे होणारा परिणाम एकंदरीत शरीरातील शुष्कता – डीहायड्रेशन, कुपोषण आणि वजनातील घट. शरीर शुषकतेची लक्षणे घ्यानात येणे अवघड असते. अधिक तहान लागणे, तोंड कोरडे पडणे, अशकत पणा, डोके हलके झाल्यासारखे वाटणे, उभे राहिल्यानंतर चक्कर येणे, मूत्राचा रंग काळपट होणे, मूत्रविसर्जन कमी होणे या गोष्टी शुषकतेचे दर्शक आहेत. शरीरामधील शुष्कता वाढल्यामुळे शरीरामध्ये रासायनिक असंतुलन निर्माण होते. असे असुंतलन जीवधेणे होण्याची शक्यता असते. अतिसारामुळे झालेल्या शुष्कतेमुळे वृक्काचे काम थांबणे, मेंदूच्या कार्यात अडथळा , संधिशोथ , आणि त्वचा विकार उद्भवतात.
'''निदान''' – अतिसारच्या बहुतेक रुग्णामध्ये जोपर्यंत अतिसार तीव्र होत नाही तोपर्यंत निदान करण्याची आणि उपचाराची फारशी आवश्यकता नसते. पण अतिसार झालेल्या रुग्णास 102 पर्यंत ताप, शुष्कतेची लक्षणे , शौचामधून रक्त , पोटदुखी, आणि प्रतिजैविके घेतल्याची माहिती असल्यास त्वरित वैद्यकीय उपचाराची गरज आहे.
ओळ ५८:
शरीरातील '''पाण्याचे प्रमाण''' कमी होऊ नये म्हणून प्रयत्न करणे गरजेचे असते. ओ. आर. एस. युक्त पाणी घेणे गरजेचे आहे. एक लिटर पाण्यात एक मूठ साखर आणि चिमुटभर मीठ घातल्यास ओ. आर. एस. तयार होते. अंतराने मीठ आणि साखरेचे पाणी घेतल्यास फायदा होतो. यामुळे शरीरातील पाण्याची कमी भरून निघते , तसेच अशक्तपणा ही काही प्रमाणात कमी होतो. ओ. आर. एस. या उपचार पद्धतीमुळे अनेक बालकांचे प्राण आजपर्यंत वाचले आहेत. ओ. आर. एस. मधील मिश्रणामुळे मोठ्या आतड्यात पाणी धरून ठेवले जाते.
|