"शिव तांडव स्तोत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
"शिव ताण्डव स्तोत्र" पानाचे भाषांतर करुन तयार झाले
 
छोNo edit summary
ओळ १:
शिव तांडव स्तोत्र (संस्कृत:शिवताण्डवस्तोत्रम्) हे शंकरांचे स्तोत्र शिवभक्त लंकाधिपती रावणाद्वारे रचण्यात आले.
 
'''कथा'''
 
कथांमध्ये अशी मान्यता आहे की, रावणाने संपूर्ण कैलास पर्वत उचलला होता आणि तो जेव्हा तो पर्वत लंकेला घेऊन चालला होता, तेव्हा त्याला त्याच्या शक्तीवर अहंकार झाला होता. शंकरांना त्याचा हा अहंकार नष्ट करायचा होता, म्हणून त्यांनी अंगठ्याने दाब दिला व पर्वत आहे त्या जागी पुन्हा स्थापित झाला. यामुळे रावणाचा हात पर्वताखाली दाबला गेला आणि त्याचा मनातील अहंकार गळून मनात शिवभक्तीचा अंतर्नाद घुमला "शंकर शंकर"- अर्थात क्षमा मागून स्तुती करू लागला. हीच स्तुती म्हणजे शिव तांडव स्तोत्र. ह्या शिव तांडव स्तोत्राने भगवान शंकर एवढे प्रसन्न झाले की त्यांनी रावणाला सकळ समृद्धी असणारी लंकाच नव्हे तर ज्ञान, विज्ञान तसेच अमरत्व वरदानरूपात दिले.
 
असे मानले जाते की, मात्र स्तोत्र ऐकल्याने व्यक्तीला धनधान्य, समृद्धी व पुत्रप्राप्ती होते.
 
'''काव्यशैली'''
 
ह्या स्तोत्राची भाषा अनुपम आणि जटील आहे. हे स्तोत्र पंचचामर छंदात बद्ध आहे.