"जिजाबाई शहाजी भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३८:
 
== भोसले व जाधवांचे वैर ==
पुढे [[लखुजी जाधव]] व [[शहाजीराजे भोसले]] यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला, एकदा एक हत्ती पिसाळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली पहिले जाधवांचे त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव [[लखुजी जाधव]] यांचा मुलगा व जिजाबाई यांचा भाऊ. दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व शरफोजी भोसले [[शहाजीराजे भोसले]] यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यांस ठार केले.हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासर्‍यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/227.html|शीर्षक=राजमाता जिजाबाई|दिनांक=2010-07-04|संकेतस्थळ=बालसंस्कार|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2019-01-12}}</ref>
 
या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले.<ref>{{स्रोत पुस्तक|title=१०१ कर्तुत्ववान स्त्रिया|last=कर्वे|first=स्वाती|publisher=उत्कर्ष प्रकाशन|year=२०१४|isbn=978-81-7425-310-1|location=पुणे|pages=२९}}</ref> नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण [[छत्रपती शिवाजी महाराज|शिवाजी राजांत]] पुरेपूर उतरला होता.
ओळ ४५:
जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर [[शिवाजी]] राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती.
 
जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले. त्‍यानंतर त्यांना ४ मुले झाली; चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला. शनिवार १७ एप्रिल १६२७ , प्रभव नाव संवत्सर , वैशाख शु.२ , शके १५४९ या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी [[शिवनेरी]] येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव [[शिवाजी]] ठेवले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://vishvamarathi.blogspot.com/2013/09/blog-post_24.html|शीर्षक=जिजाऊ चरित्रातून काय शिकावे|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2019-01-12}}</ref>
 
==मुलाचे संगोपन व राजकारभार==
शिवाजी १४ वर्षांचा असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती [[पुणे|पुण्याची]] जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकार्‍यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले. [[निजामशाही]], [[आदिलशाही]] आणि मुघलांच्या सततच्या स्वार्‍यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी [[दादोजी कोंडदेव]] यांच्या सोबत नेटाने [[पुणे]] शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजीच्या राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईंनी शिवाजीला पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या रामायण, महाभारतातील गोष्टी सांगितल्या. सीतेचे हरण करणार्‍या रावणाचा वध करणारा [[राम]] किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा [[भीम]] किती पराक्रमी होता, वगैरे. जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच .शिवाजीराजे घडले. जिजाबाईम्नी नुसत्याच्गोष्टी सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://zeemarathijagruti.com/stories-from-past/rajmata-jijau-information-in-marathi|शीर्षक=Rajmata Jijau, आदर्श राजमाता जिजाऊ|दिनांक=2017-01-11|संकेतस्थळ=Zee Marathi Jagruti|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2019-01-12}}</ref>
 
शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईने लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वत: तंटे सोडवत.