"काळ (वृत्तपत्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''काळ''' या वृत्तपत्राची सुरवात [[शिवराम महादेव परांजपे]] यांनी केली. हे पत्र सुरु झाले तो काळ राजकीय चळवळीला व वृत्तपत्रांना खूपच प्रतिकूल होता.पण शिवरामपंतंवर झालेल्या शैक्षणिक व इतर संस्कारांमुळे अशा परिस्थितीतहि पत्र सुरु करण्याचे धाडस यांनी दाखविले. "धार्मिक,सामाजिक,राजकीय,ऐतिहासिक आणि वाङ्मयीन विषयांची नि:पक्षपाताने व निर्भयपणे पूर्ण चर्चा करणारे साप्ताहिक " अशी जाहिरात करून २५ मार्च १८९८ रोजी हे वृत्तपत्र सुरु झाले.<ref>{{स्रोत पुस्तक|title=मराठी वृत्तपत्रांचा इतिहास|last=लेले|first=रा.के.|publisher=कॉंटिनेंटलकाँटिनेंटल प्रकाशन|year=१९७४|isbn=|location=पुणे|pages=}}</ref><br>
 
== उद्दिष्टे ==
ओळ ६:
वृत्तपत्राचा प्रसिद्धीचा वार शुक्रवार होता. लोकांत दृढमुल व रूढ झालेल्या कित्येक राजकीय कल्पनांच्या उच्छेदासाठी काळाचा जन्म आहे. असे हे पत्र काढण्यामागचे उदिष्ट शिवरामपंतांनी जाहीर केले होते. लोकांच्या मनात पारतंत्र्याची चीड निर्माण व्हावी व त्यांनी स्वतंत्राचा ध्यास घ्यावा, असा आपल्या मनातील विचार लोकांपर्यंत पोचविण्याचे व्यापक व्यासपीठ निर्माण करावे या विचाराने काळ ची निर्मिती झाली. असा विशिष्ट मताचा प्रचार हेच मुख्य उदिष्ट असल्याने काळ मध्ये बातम्याना फारसे स्थान नव्हते. काही जाहिराती,थोड्या बातम्या वगळल्या,तर सर्व मजकूर शिवरामपंतांचाच असे. त्यांच्या लेखनात भावनेला अधिक प्राधान्य होते आणि लेखनही शैलीदार होते.<br>
 
काळ मधील कडक लेखनाची छापखानेवाल्यांना भीती वाटली. सरकारच्या रोषाला बळी पडू असे वाटल्याने त्यांनी पत्र छापण्यास नकार दिला. यांची कल्पना असल्याने शिवरामपंतांनी आपला स्वतंत्र छापखाना काढला. पुढे लोकप्रियता वाढत गेल्याने काळ ने लवकरच त्यांना चांगली परिस्थिती प्राप्त करून दिली. अर्थात हा व्यवसाय त्यांनी पैशासाठी अजिबातच सुरु केला नव्हता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand17/index.php/23-2015-01-15-05-42-45/9964-2012-06-14-09-33-10?showall=&start=12|शीर्षक=वृत्तपत्रे|last=अकलूजकर|पहिले नाव=प्रसन्नकुमार|दिनांक=|संकेतस्थळ=http://marathivishwakosh.maharashtra.gov.in|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=१५ जानेवारी २०१९}}</ref>
 
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित साहित्य]]