"बहिणाबाई पाठक (संत)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो →जीवन |
|||
ओळ ५८:
बहिणाबाईचा जन्म, गोदावरीच्या उत्तरेस घृष्णेश्वराच्या पश्चिमेस, [[कन्नड]] तालुक्यातील [[वेळगंगा नदी]]च्या काठी देवगांव (रंगाऱ्याचे) येथे शके १५५१ मध्ये झाला. तिच्या आईचे नांव जानकी व पित्याचे नांव आऊजी. माता-पित्यानी तिचा विवाह वयाच्या पाचव्या वर्षी त्याच गावापासून पाच कोसावर असलेल्या '''रत्नाकर पाठक''' यांच्याशी लावला. त्यांना दोन मुले होती.
संत बहिणाबाईना लहानपणापासूनच परमार्थाची व भक्तीची ओढ होती. कथा – कीर्तने, पुराण-श्रवण आणि सत्पुरुषांची सेवा यात संत बहिणाबाई रमली होती. पण तिची संसारावरील आसक्ती कमी होऊन पारमार्थिक वृत्ती वाढत गेली. घरची गरिबी, शि़क्षणाचा अभाव, तरीही समाधानी वृत्ती व संतवृत्तीला साजेशी पांडुरंगाची ओढ मनात होतीच. अखंड नामस्मरण चालू असे. शेतात काम करीत असतानाही हा भक्तिभाव अभंगाचे रूपाने तिच्या मुखातून बाहेर पडे. पुढे कोल्हापूरच्या वास्तव्यात जयराम स्वामीच्या कथा कीर्तनाचा संत बहिणाबाईच्या मनावर प्रभाव पडला. ती रोज तुकारामाचे अभंग म्हणू लागली व तिने तुकारामाच्या दर्शनाचा ध्यास घेतला. तिला तुकोबारायांना सदगुरू करून त्यांचे अनुग्रह व आशीर्वाद घ्यावयाचा होता. म्हणून रात्रंदिवस तुकोबांचे अभंग म्हणत ती त्यांचे ध्यान करू लागली. भेटीपूर्वीच तुकोबारायांचे वैकुंठागमन झाल्यामुळे त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. शेवटी तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन झाल्यावर बहिणाबाईची निष्ठा पाहून तुकोबारायांनी कार्तिक वद्य ५ शके १५६९ रोजी स्वप्नात येऊन तिला साक्षात दर्शन व गुरूपदेश दिला. बहिणाबाईचे सारे जीवन गुरुबोधामुळे बदलून गेले. तिने आपले गुरू [[संत तुकाराम]] महाराज व त्यांचीही गुरुपरंपरा आपल्या अभंगांत वर्णन केली आहे. तुकाराम महाराजांविषयीं प्रत्यक्ष माहिती असलेल्या कवयित्रीचे हे अभंग आहेत, त्यामुळे या अभंगांना विशेष महत्त्व आहे. त्यांचे वर्णन करताना गेल्या शतकातील एक श्रेष्ठ संत, संतचरित्रकार आणि 'श्री गजानन विजय'कर्ते संतकवी [[दासगणू महाराज]] लिहितात. '''''पहा केवढा अधिकार .. ऋणी तिचा परमेश्वर ...''''' त्यांच्या अभंगांंपैकी 'संत कृपा झाली। इमारत
==चमत्कार==
|