"बारामती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो →शिक्षण |
No edit summary खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! |
||
ओळ ३६:
==अर्थव्यवस्था==
निरा डावा कालवा :- इ.स.१९९०साली"रोजगार हमी "या योजनेच्या कामातुन निरा डावा कालवा अस्तित्वात आला { संदर्भ-- दै. सकाळ (पुणे जिल्हा )लेख-विकासवाटा, २५फेब्रुवारी२००१। पा. १२ }भिमथडीच्या दक्षिण भागाच्या माध्यमातून पूर्व आणि पश्चिम असा हा कालवा खणला गेला आहे. बारामतीच्या नैऋत्य-उत्तर आणि वायव्य दिशेने हा कालवा वाहातो.
बारामतीतुन वाहाणा-या क-हा व निरा या दोन वाहाणा-या नद्या पूर्व वाहिनी आहेत.त्या शेतक-याला वरदान ठरलेल्या आहेत." मागील पन्नास-साठ वर्षात येथील पर्जन्यमानात विशेष काही फरक पडलेला नाही. येथे पर्जन्यवृष्टी२०.२०इंचा पर्यंतच असते " ( संदर्भ- दै. लोकमत -वर्धापन दिन विशेषांक , दि.१३संप्टेबर२०११)▼
▲या दोन वाहाणा-या नद्या पूर्व वाहिनी आहेत.त्या शेतक-याला वरदान ठरलेल्या आहेत." मागील पन्नास-साठ वर्षात येथील पर्जन्यमानात विशेष काही फरक पडलेला नाही. येथे पर्जन्यवृष्टी२०.२०इंचा पर्यंतच असते " ( संदर्भ- दै. लोकमत -वर्धापन दिन विशेषांक , दि.१३संप्टेबर२०११)
निरा डाव्या कालाव्याच्या सिंचनामुळे बारामती तालुक्यातील पूर्वेकडील भागाने शेती उत्पादनात लक्षणीय प्रगती केली आहे. येथे मुख्यत्वे ऊस, गहू, मका इ. चे उत्पन्न घेतले जाते. काही ठिकाणी फळबागाही आहेत. येथे पारंपारिक आणि आधुनिक या दोन्हीही प्रकारची शेती केली जाते. येथे ऊस पिकाचे भरघोस उत्पादन होत असून उसापासून साखर तयार करणारे दोन सहकारी साखर कारखाने आहेत. श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना हा भवानीनगर (इंदापूर) येथे स्थित असून बारामती आणि इंदापूर या दोन्ही तालुक्यातील उसाचे गाळप या कारखान्यात केले जाते. माळेगाव सहकारी साखर कारखाना हा माळेगाव येथे स्थित असून येथे साखरेबरोबर इथेनॉल निर्मितीही केली जाते. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सोमेश्वर येथे स्थित आहे. या साखर कारखान्यांमुळे सभासद शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली असून त्यांचे राहणीमान उंचावले आहे. हे साखर कारखाने येथील अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. त्याचबरोबर येथे भाजीपाला, फळे इ. चेही उत्पादन घेतले जाते. येथील भाजीपाला पुणे, मुंबईच्या बाजारपेठेत पाठविला जातो. बारामतीचा पश्चिमेकडील भाग कमी पाऊस व सिंचनाच्या सोयीअभावी कोरडवाहू आहे. येथे फक्त पावसाळ्यात ज्वारी व बाजरीचे उत्पादन घेतले जाते. या भागात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून वाहन उद्योग, कापड उद्योग,चॉकलेट ,डेअरी प्रक्रिया उदयोग इ. चे कारखाने उभारण्यात आले आहेत. अलीकडे बारामतीचे औद्योगिकिकरण झाल्यामुळे येथील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.बारामती येथे ब्रिटिश काळात म्हणजे १ जानेवारी १८६५ साली बारामती नगरपालिकेची स्थापना झाली. या नगरपालिकेच्या पहिल्या महिला सदस्या शारदाबाई गोविन्दराव पवार या होत्या. आज या नगरपालिकेस १५० वर्षे उलटून गेली आहेत. इ.स. १८८१ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार तत्कालीन बारामती ची लोकसंख्या पाच हजार दोनशे बाहत्तर इतकी होती. आज तो आकडा लाखाच्या ही वर गेला आहे.
==प्रवास==
बारामती मध्ये दळणवळणाच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. बारामती महाराष्ट्रातील इतर तालुके व जिल्हे यांना पक्क्या आणि रुंद रस्त्यांनी जोडलेली आहे. [https://www.youtube.com/watch?v=4py9Mnd5JwA बारामती रेल्वे]मार्गाने दौंड रेल्वे जंक्शनला जोडलेली आहे. दौंड रेल्वे जंक्शन उत्तर भारत व दक्षिण भारतातील मुख्य शहरांना रेल्वे मार्गाने जोडलेले आहे. बारामती ते दौंड रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पुर्ण झाले आहे. बारामती मध्ये विमानतळ आहे. त्यामुळे बारामती देशातील मुख्य शहरांना हवाईमार्गाने जोडली जाऊ शकते. बारामती पुणे प्रवास करण्यासाठी जलद सेवा विना थांबा बस दर अर्धा तासाने बसॆस उपलब्ध आहेत. त्यासाठी स्वतंत्र खिडकी उपलब्ध आहे. सकाळी सहा ते संध्याकाळी नऊ वाजे पर्यंत बसॆस उपलब्धआहेत. बारामती येथुन सातारा, कोल्हापूर, सांगली, पंढरपूर, मुंबई तुळजापूर, धुळे, औरंगाबाद, जळगाव, रावेर अशा लांब पल्ल्याच्या बसॆस दररोज सोडल्या जातात. आणि महाराष्ट्रातील जवळ जवळ सगळी शहरे जोडले गेले आहेत. बारामती बस स्थानक राज्यातील
एक महत्वाचे आणि मोठे आगर म्हणून ओळखले जाते अलीकडील काळात वाढलेली बारामती चा विचार करून दुसरे नवीन बस स्थानक एम आय डी सी भागात सुरु केलेले आहे आणि त्या ठिकाणावरून ही काही बस बाहेरच्या गावी सोडल्या जातात.
==शिक्षण==
|