"आडनाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १७:
चौगुला म्हणजे पाटलाचा मदतनीस. धान्याची कोठारे व इतर सर्व कामे करणारा ग्राम अधिकारी. गावचा कारभार चावडीवरून चालायचा. चारचौघे जमण्याचे ठिकाण म्हणजे चावडी. सरकारी चाकरीमुळे पाटील किंवा बलुतेदार अशा सर्वांनाच इनाम मिळाले. इनामात दोन प्रकार होते. एक सनदी (राजाने दिलेले) आणि दुसरे म्हणजे गावनिसबत(गावच्या जमिनीतून दिलेले). मुस्लिम राजवटीत यालाच जहागिर शब्द आला.या जहागीर शिवाय शेकडो पिढ्या पासून वारसा ने आलेली जमीन म्हणजेच कुळाने आलेली जमीन जो कसत त्यालाच कुळवाडी म्हणत आणि या कुळवाडी मध्ये ९६ कूळ अस्तिवात होती तीच आजची ९६ कुळी कुळवाडी लोक आहेत.कुळवड्याच्या या जमिनी देशमुख,देशपांडे,पाटील,कुलकर्णी आणि सावकार यांनी आपल्या नावावर लाटल्या आणि कुळवाडी स्वतःच्या जमिनीचा नामधारी मालक बनवले.पुढे स्वातंत्र्यानंतर कूळ कायदा आला आणि बेकायदा भरपूर जमिनी फस्त केलेल्या देशमुख,पाटील,कुलकर्णी,इनामदार या सावकारी प्रवृत्तीच्या लोककडून जमीन पूर्वी जे मुळ मालक होते म्हणजे फक्त जमीन कसत होते त्यांना जमिनी परत देण्यात आल्या. साहजिकच सुरुवातीला मराठा जातीकडे असणारी पाटीलकी पुढे ज्या गावात ज्या समाजाची संख्या जास्त त्यांच्याकडे गेली. त्याच्या अधिकारामुळे पाटील नावाला वलय आल्याने नगर परिसरानंतर अनेकजण स्वत:हून आडनावासह पुढे पाटील लावतात. पाटील नाव कुणी का लावेना पण रांझ्याच्या पाटलासारखा नको तर कर्मवीरांसारखा असावा हीच जनतेची अपेक्षा. 
 
गाव पातळीवर पाटलाला मदत करणारा व गावचे रेकॉर्ड लिहिणारा एक महत्त्वाचा अधिकारी म्हणजे कुलकर्णी, कुळवाडी लोकांच्या कुळा वर कर आकारणी करतो तो कुलकर्णी जो कुळवाड्याच्या कुळावर आकारणी करतो कूळ+आकारणी= कूळ करणी = कुलकर्णी. कुल आणि करण या शब्दापासून कुलकर्णी शब्द आला. कुल म्हणजे जमिनीचा मूळ भाग आणि करण म्हणजे लेखनवृत्ती त्यानुसार कुळवार लिखाण करणारा तो कुलकर्णी. काही भागात याला पटवारी, पांड्याही म्हणतात. प्राचीन काळी कुलकर्णी हा ब्राह्मण समाजाचा असायचा. परंतु पुढे इतरही उच्च जातीत कुलकर्णी पद आले. पाटलाप्रमाणे यालापण गावातील सर्व मानमरातब व बलुतेदाराकडून सर्व सेवा मोफत मिळत. कुलकण्र्याच्या जागेवरच आता ग्रामसेवक आणि तलाठी आले. 
 
इतर सेवेबरोबरच [[धार्मिक (मासिक)|धार्मिक]] सेवा करण्याकरिताही इनाम देण्यात आले. गावात [[गुरव]] आणि मश्जिदीकरिता मौलवींना वतन मिळाले. पूजाअर्चा आणि भाकित वर्तविण्याकरिता जोशी वृत्ती आली. त्यातून ग्रामजोशी, कुडबुडे जोशी हे प्रकार आले. गावचा आणखी एक महत्त्वाचा वतनदार म्हणजे महार वतन, ज्याला ‘हाडकी हाडोळा’ म्हटले गेले. कोतवाल, जागल्या व येसकर ही गावकामे महाराकडे होती. गावच्या संरक्षणाची जबाबदारी महार आणि मांग अशा दोन्ही समाजाकडे असली तरी सरकारकडून वतन मिळाले फक्त महारांनाच. छत्रपती शिवरायांनी तर आपल्या नातलगाला वगळून वाई गावचे वतन एका महाराला दिल्याची नोंद सापडते. 
"https://mr.wikipedia.org/wiki/आडनाव" पासून हुडकले