चंद्रगुप्त हा स्वतः जैन धर्मीय असला तरी राज्यातचंद्रगुप्ताचा मुख्य हिंदू धर्म होता. सर्व राजकीय धोरणे व न्यायप्रणाली ही चाणक्याच्या अर्थशास्त्रात सांगितलेल्या प्रथेप्रमाणे अद्वैतवेदान्त तत्त्वज्ञानावर आधारित होती, परंतु सर्वधर्मसमभाव होता. अनेक देशांतून मौर्यांचे ऐश्वर्य पाहण्यास व राज्यकारभाराचा अभ्यास करण्यास येणाऱ्या प्रवाशांना व विद्वानांना मानाचे स्थान होते. सांस्कॄतिक आदानप्रदानास मुभा होती. मेगॅस्थेनिस [[चातुर्वर्ण पद्धत|चातुर्वर्ण पद्धतीचा]] उल्लेख करत नाही, तरी त्या काळचा समाज हा विविध समाजघटक करीत असलेल्या कामांनुसार विभागला असल्याचे वर्णन करतो. चाणक्याच्या लेखनातदेखील जन्मापेक्षा कर्माला जास्त महत्त्व दिलेले आढळ्ते. त्यामुळे मौर्यकालीन समाज हा विभाजित असला तरी आता ज्याप्रमाणे जातवाद माजला आहे तसा त्यावेळी नसावा असे वाटते.