"बहिणाबाई पाठक (संत)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ ५३:
}}
 
बहिणाबाईचाबहिणाबाई (जन्म : इ.स. १६२८ (शके १५५१); मृत्यू २ ऑक्टोबर १७०० झाला). [[तुकाराम|संत तुकारामांच्या]] समकालीन पुढच्या पिढीतील वारकरी संप्रदायातील मराठी स्त्री संत कवयित्री आणि संत तुकारामांच्या शिष्या. स्त्री संत मालिकेतील अग्रेसर मुक्ताबाई, कान्होपात्रा, जनाबाई, वेणाबाई, आक्काबाई, मीराबाई यांसह बहिणाबाईंचे स्थान आहे.
 
==जीवन==
बहिणाबाईचा जन्म, गोदावरीच्या उत्तरेस घृष्णेश्वराच्या पश्चिमेस, [[कन्नड]] तालुक्‍यातील [[वेळगंगा नदी]] काठी देवगांव (रंगाऱ्याचे) येथे शके १५५१ मध्‍ये एका ब्राम्हण कुटुंबात झाला. तिच्‍या आईचे नांव जानकी व पित्‍याचे नांव आऊजी. माता-पित्‍यानी तिचा विवाह वयाच्‍या पाचव्या वर्षी त्याच गावापासून पाच कोसावर असलेल्या '''रत्नाकर पाठक''' यांच्याशी लावला. त्यांना दोन मुले होती.
 
संत बहिणाबाईना लहानपणापासूनच परमार्थाची व भक्तीची ओढ होती. कथा – कीर्तने, पुराण-श्रवण आणि सत्‍पुरुषांची सेवा यात संत बहिणाबाई रमली होती. पण त्यांची संसारावरील आसक्‍ती कमी होऊन पारमार्थिक वृत्ती वाढत गेली. घरची गरिबी, शि़क्षणाचा अभाव, तरीही समाधानी वृत्ती व संतवृत्तीला साजेशी पांडुरंगाची ओढ मनात होतीच. अखंड नामस्मरण चालू असे. शेतात काम करीत असतानाही हा भक्तिभाव अभंगाचे रूपाने त्यांच्या मुखातून बाहेर पडे.पुढे कोल्‍हापूर वास्‍तव्‍यात जयराम स्‍वामीच्‍या कथा कीर्तनाने संत बहिणाबाईच्‍या मनावर प्रभाव पडला. ती रोज तुकोबांचे अभंग म्‍हणू लागली व तिने तुकोबांच्या दर्शनाचा ध्‍यास घेतला. तिला तुकोबारायांना सदगुरू करून त्‍यांचे अनुग्रह व आशीर्वाद घ्‍यावयाचा होता. म्‍हणून रात्रंदिवस तुकोबाचे अभंग म्हणत ती त्‍यांचे ध्‍यान करू लागली. भेटीपूर्वीच तुकोबारायांचे वैकुंठागमन झाल्यामुळे त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. शेवटी कार्तिक वद्य ५ शके १५६९ रोजी तुकोबारायांनी स्‍वप्‍नात येऊन त्यांना गुरूपदेश दिला. तुकाराम महाराजांनीं वैकुंठगमन केल्यावर बहिणाबाईची निष्ठा पाहून तिला साक्षात दर्शन दिलें होतें. बहिणाबाईचे सारे जीवन गुरुबोधामुळे बदलून गेले. तिनें आपले गुरू [[संत तुकाराम]] महाराज व त्यांचीही गुरुपरंपरा आपल्या अभंगांत वर्णन केली आहे. तुकाराम महाराजांविषयीं प्रत्यक्ष माहिती असलेल्या कवयित्रीचे हे अभंग आहेत. यामुळें या अभंगांना विशेष महत्त्व आहे. त्यांचे वर्णन करताना गेल्या शतकातील एक श्रेष्ठ संत, संतचरित्रकार आणि 'श्री गजानन विजय'कर्ते संतकवी [[दासगणू महाराज]] लिहितात. '''''पहा केवढा अधिकार .. ऋणी तिचा परमेश्वर ...''''' संत बहिणाबाईनी आपल्या बारा जन्माचे पस्तीस अभंग आपल्या मुलाला सांगितले. त्याचे आज ७४०हून आधिक अभंग आढळतात, त्यांच्या अनेक अभंगांतअभंगांंपैकी 'संत कृपा झाली। इमारत फला आली ॥ हा अत्यंत प्रसिद्ध अभंग आणि "घट फुटलियावरी। नभ नभाचे अंतरी॥ हा शेवटचा अभंग सांगितल्या वरसांगितल्यावर त्या समाधिस्थ झाल्या. या साध्वीची समाधी [[शिऊर]] या गावी आहे. संत बहिणाबाईला प्राण्यांची दया येत असे.<ref>{{स्रोत पुस्तक|title=१०१ कर्तृत्ववान स्त्रिया|last=कर्वे|first=स्वाती|publisher=उत्कर्ष प्रकाशन|year=२०१२|isbn=978-81-7425-310-1|location=पुणे|pages=२४}}</ref>
 
==चमत्कार==
असे सांगतात की त्यांनाबहिणाबाईंना त्यांच्या पूर्वीच्या तेरा जन्मांचे स्मरण होते.

या साध्वीच्या चरित्रातील एक प्रसंग ज्ञात आहे तो असा :
नेमाप्रमाणे एकादशीच्या वारीकरिता पंढरीला निघालेल्या असताना त्याना अचानक थंडी वाजून ताप भरला.परंतु पांडुरंगाच्या भेटीची एवढी तळमळ, की त्यानी अंगावरच्या फाटक्या [[घोंगडी]]ला विनंती केली, "ही माझी हुडहुडी तात्पुरती तुझ्याजवळ ठेव. एवढी वारी करून येईन आणि मग माझा भोग भोगीन." ही घोंगडी त्यानी एका झाडावर ठेवली व त्या वारीस निघून गेल्या.त्या सुखरूप परत येईपर्यंत ते झाड हिंव भरल्यासारखे थडथड हालत होते.
 
==रचना==
ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस!, या प्रसिद्ध अभंगाची रचना साध्वी बहिणाबाई यांचीच आहे.
संत बहिणाबाई यांनी सुमारे ४७३ अभंगांची रचना केली आहे.
ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस!, या प्रसिद्ध अभंगाची रचना साध्वी बहिणाबाई यांचीच.
संपूर्ण अभंग असा -
 
Line ७४ ⟶ ७६:
तुका झालासे कळस भजन करा सावकाश | <br />
बहिणा फडकती ध्वजा तेणे रूप केले ओजा ||
 
Ok
 
==बाह्य दुवे==