"बहिणाबाई पाठक (संत)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
कल्याणी कोतकर (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: सुचालन साचे काढले |
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृष्य संपादन: बदलले |
||
ओळ ५६:
==जीवन==
बहिणाबाईचा जन्म, गोदावरीच्या उत्तरेस घृष्णेश्वराच्या पश्चिमेस, [[कन्नड]] तालुक्यातील [[वेळगंगा नदी]] काठी देवगांव (रंगाऱ्याचे) येथे शके १५५१ मध्ये एका ब्राम्हण कुटुंबात झाला. तिच्या आईचे नांव जानकी व पित्याचे नांव आऊजी. माता-पित्यानी तिचा विवाह वयाच्या पाचव्या वर्षी त्याच गावापासून पाच कोसावर असलेल्या '''रत्नाकर पाठक''' यांच्याशी लावला. त्यांना दोन मुले
संत बहिणाबाईना लहानपणापासूनच परमार्थाची व भक्तीची ओढ होती. कथा – कीर्तने, पुराण-श्रवण आणि सत्पुरुषांची सेवा यात संत बहिणाबाई रमली होती. पण त्यांची संसारावरील आसक्ती कमी होऊन पारमार्थिक वृत्ती वाढत गेली. घरची गरिबी, शि़क्षणाचा अभाव, तरीही समाधानी वृत्ती व संतवृत्तीला साजेशी पांडुरंगाची ओढ मनात होतीच. अखंड नामस्मरण चालू असे. शेतात काम करीत असतानाही हा भक्तिभाव अभंगाचे रूपाने त्यांच्या मुखातून बाहेर पडे.पुढे कोल्हापूर वास्तव्यात जयराम स्वामीच्या कथा कीर्तनाने संत बहिणाबाईच्या मनावर प्रभाव पडला. ती रोज तुकोबांचे अभंग म्हणू लागली व तिने तुकोबांच्या दर्शनाचा ध्यास घेतला. तिला तुकोबारायांना सदगुरू करून त्यांचे अनुग्रह व आशीर्वाद घ्यावयाचा होता. म्हणून रात्रंदिवस तुकोबाचे अभंग म्हणत ती त्यांचे ध्यान करू लागली. भेटीपूर्वीच तुकोबारायांचे वैकुंठागमन झाल्यामुळे त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. शेवटी कार्तिक वद्य ५ शके १५६९ रोजी तुकोबारायांनी स्वप्नात येऊन त्यांना गुरूपदेश दिला. तुकाराम महाराजांनीं वैकुंठगमन केल्यावर बहिणाबाईची निष्ठा पाहून तिला साक्षात दर्शन दिलें होतें. बहिणाबाईचे सारे जीवन गुरुबोधामुळे बदलून गेले. तिनें आपले गुरू [[संत तुकाराम]] महाराज व
==चमत्कार==
|