"हरी नारायण आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३८:
* ह.ना. आपटे निवडक वाङ्‌मय : साहित्य अकादमी प्रकाशन (इ.स. १९८९) : संपादक [[विद्याधर पुंडलिक]]
* हरिभाऊ, काळ आणि कर्तृत्व (इ.स. १९७२) : लेखक वि.बा.आंबेकर.
*हरिभाऊ आपटे यांची आत्मचरित्रात्मक कादंबरी -'मी' -डॉ. रेखा वडिखाये
 
हरिभाऊ आपटे यांची 'मी' ही कादंबरी त्यांच्या जीवनावर आधारित असल्याने तिच्यातून तत्कालीन,सामाजिक,राजकीय,सांस्कृतिक,आर्थिक परिस्थितीचे दर्शन घडते.कादंबरी नायकप्रधान वाटत असली तरी ती स्त्रीजीवनकेन्द्री आहे.स्त्रियांच्या दु:खांना वाचा फोडणे हाच या कादंबरीचा मूळ हेतू आहे.पुरुषप्रधान संस्कृतीच्या अनुषंगाने निर्माण झालेली पुरुषजातीची आणि समाजाची स्त्रीकडे बघण्याची मानसिकता बदलण्याची गरज त्यांनी या कादंबरीत वर्तवली आहे.हरिभाऊंचे वडील कुटुंब सोडून गेल्यामुळे आईच्या वाट्याला आलेले दु:ख,बहीण गंगी तिचा साठीच्या आतबाहेर असलेल्या पुरुषाशी झालेला जरठबाला विवाह,घराघरात असलेल्या गंगीसारख्या स्त्रियां, त्यांची अवस्था बदलण्यासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे या जाणिवेतून त्यांनी त्याकाळी स्त्री शिक्षणाचा जोरकसपणे पुरस्कार केला.हरिभाऊ आपटे यांनी मृत्युपूर्वी लिहून ठेवलेल्या,कादंबरीत समाविष्ट केलेल्या पत्रात समाजसुधारणेविषयीची त्यांची तळमळ प्रकर्षाने जाणवते.ते म्हणतात,"एकोणविसाव्या शतकानंतर आता आपला शत्रू म्हणजे आपले अज्ञान.आज हजारो वर्षे जगाचे पाऊल पुढे पडत आहे ते ज्ञानाच्या जोरावर. ज्ञानाचे स्थान एकेकाळी आपला आर्य देश होता.पुढे इजिप्त झाला,पुढे रोम झाला.पुढे फ्रान्स,जर्मनी,इंग्लंड, अमेरिका इत्यादी देश होत गेले आहेत.आता जपानमध्ये ते आले आहे.कालचक्राप्रमाणे ज्ञानाने आपले स्थान बदलले.ज्या स्थानातून त्याचा लोप झाला त्या स्थानाचे वैभवही लयास गेले.म्हणून अज्ञानरूपी शत्रूला जिंकण्यासाठी ज्ञानाचा प्रसार करणे हेच मोठे अकुंठित गतिशात्र आहे."( ' मी ' -पृ.क्र.४५३ ,४५४) समाजातील केवढा मोठा मानवसमूह पुरुषप्रधान संस्कृतीने अज्ञानाच्या अंधारात ठेवल्याने त्याच्याजवळ असलेल्या विविध क्षमतांचा समाजविकासासाठी आणि देशविकासासाठी वापर होऊ शकत नाही.याचे दु:ख हरिभाऊ वरील परिच्छेदात अतिशय कळकळीने व्यक्त करताना दिसतात.त्यांच्या या विचारांची आजच्या समाजालाही नितांत गरज आहे.स्त्रीशिक्षण आणि स्त्री -पुरुष समानतेचा विचार हा या कादंबरीचा गाभा आहे.ज्यायोगे कुटुंबाचा,समाजाचा, पर्यायाने देशाचा विकास घडून येणार आहे.
 
आधार ग्रंथ - ' मी ' -- हरिभाऊ आपटे , सर्व्हिडिया प्रकाशन ,पुणे ,१९६५ ,पाचवी आवृत्ती