"लहुजी राघोजी साळवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
छोNo edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ २४:
| तळटिपा =
}}
'''लहुजी राघोजी साळवे''' (१४ नोव्हेंबर १७९४ - १७ फेब्रुवारी १८८१) हे भारतीय क्रांतिकारक होते. ते '''लहुजी वस्ताद''' नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म [[पुरंदर किल्ला|पुरंदर किल्ल्याच्या]] पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ या गावातील एका [[मातंग ]] कुटूंबात झाला. मातंग समाजात जन्माला आलेल्या लहूजींना युद्ध कलेचे प्रशिक्षण त्यांच्या घरातील वीर पुरुषानं कडून मिळाले होते. लहुजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे व आईचे नाव विठाबाई होते. लहुजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे अतिशय पराकर्मी पुरुष होते, युद्ध कले मध्ये त्यांचा कोणीही हात धरत नसत वाघा बरोबर लढाई करण्याच्या पराक्रमामुळे लहुजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे त्याकाळी प्रसिद्ध होते।होते. एखदा राघोजी साळवे यांनी वाघा बरोबर युद्ध करून जिवंत वाघाला खांद्यावर घेऊन पेशव्यांच्या राजदरबारी सादर केले होते व आपल्या प्रचंड शक्ती चे प्रदर्शन केले होते.
 
[[शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांच्या]] सैन्यात लहुजींचे पूर्वज पराक्रम गाजवीत. साळवे घराने सशस्त्र विद्येमध्ये निपुण व तरबेज होते त्यामुळे, शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात लहूजींच्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या. शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात साळवे घराण्याची योग्यता ओळखून पुरंदरकिल्ल्याच्या सरंक्षणाची जबाबदारी लहुजी साळवे यांचे आजोबा यांच्याकडे सोपवली होती. पुरंदर किल्ल्याच्या सरंक्षणासाठी साळवे घराण्यातील अनेक वीर पुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना ‘''राऊत''' या पदवीने गौरविले होते.'''''
 
पुढे ५ नोव्हेंबर १८१७ ला पेशव्यांचे इंग्रजांसोबत खडकी येथे तुंबळ युद्ध झाले. १२ दिवस राघोजी व २३ वर्षे वयाच्या लहुजी यांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला. राघोजी या युद्धात इंग्रजांच्या हातून लहुजींच्या समोरच शहीद झाले. पेशव्यांचा पराभव झाला. पुढे इ.स. १८१८मध्ये [[मराठा साम्राज्य]]ाचा भगवा ध्वज शनवारवाड्यावरून हटवून तेथे इंग्रजांचा युनियन जॅक फडकला.