"लहुजी राघोजी साळवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ २४:
| तळटिपा =
}}
'''लहुजी राघोजी साळवे''' (१४ नोव्हेंबर १७९४ - १७ फेब्रुवारी १८८१) हे भारतीय क्रांतिकारक होते. ते '''लहुजी वस्ताद''' नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म [[पुरंदर किल्ला|पुरंदर किल्ल्याच्या]] पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ या गावातील एका [[मातंग ]] कुटूंबात झाला. मातंग समाजात जन्माला आलेल्या लहूजींना युद्ध कलेचे प्रशिक्षण त्यांच्या घरातील वीर पुरुषानं कडून मिळाले होते. लहुजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे व आईचे नाव विठाबाई होते. [[शिवाजीलहुजी महाराज|छत्रपतीसाळवे शिवाजीयांचे महाराजांच्या]]वडील सैन्यातराघोजी लहुजींचेसाळवे पूर्वजअतिशय पराक्रमपराकर्मी गाजवीत.पुरुष त्यामुळेहोते, शिवाजीयुद्ध महाराजांनीकले आपल्यामध्ये कार्यकाळातत्यांचा लहूजींच्याकोणीही पूर्वजांनाहात महत्त्वाच्याधरत जबाबदाऱ्यानसत सोपविल्यावाघा होत्या.बरोबर त्यांच्यालढाई उत्कृष्टकरण्याच्या कामगिरींमुळेपराक्रमामुळे शिवाजीलहुजी महाराजांनीसाळवे लहुजींच्यायांचे वडील राघोजी साळवे त्याकाळी प्रसिद्ध होते। एखदा राघोजी साळवे यांनी वाघा बरोबर युद्ध करून जिवंत वाघाला खांद्यावर घेऊन पेशव्यांच्या राजदरबारी सादर केले होते व आपल्या पूर्वजांनाप्रचंड ‘''राऊत'''शक्ती याचे पदवीनेप्रदर्शन गौरविलेकेले होते.'''
 
[[शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांच्या]] सैन्यात लहुजींचे पूर्वज पराक्रम गाजवीत. त्यामुळे, शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात लहूजींच्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना ‘''राऊत''' या पदवीने गौरविले होते.'''''
 
पुढे ५ नोव्हेंबर १८१७ ला पेशव्यांचे इंग्रजांसोबत खडकी येथे तुंबळ युद्ध झाले. १२ दिवस राघोजी व २३ वर्षे वयाच्या लहुजी यांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला. राघोजी या युद्धात इंग्रजांच्या हातून लहुजींच्या समोरच शहीद झाले. पेशव्यांचा पराभव झाला. पुढे इ.स. १८१८मध्ये [[मराठा साम्राज्य]]ाचा भगवा ध्वज शनवारवाड्यावरून हटवून तेथे इंग्रजांचा युनियन जॅक फडकला.
Line ३० ⟶ ३२:
या पराभवाने लहुजींच्या हृदयात स्वातंत्र्यप्राप्तीची ज्वाला भडकली. स्वातंत्र्यप्रेम, देशभक्ती, देशप्रेमाने लहुजींना आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या दुःखातून सावरले. भारतमातेला इंग्रजांपासून वाचविण्यासाठी राघोजी साळवे शहीद झालेल्या ठिकाणीच लहुजींनी १७ नोव्हेंबर १८१७ ला आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करीत ‘मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी’ अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा करून आपल्या वडिलांची समाधी उभारली. ही समाधी अजूनही पुणे-शिवाजीनगरजवळच्या ‘वाकडेवाडी’ येथे आहे.
 
दांड पट्टा चालवणे, तलवारबाजी, घोडेस्वारी, बंदूक चालवणे व निशाणेबाजी या सर्व युद्ध कले मध्ये लहुजी निपुण होते लहुजींचे पिळदार शरीर व त्यांची भरलेली छाती पाहून शत्रूला सुद्धा घाम फुटत असे. जीवघेण्या शस्त्रां बरोबर ते अगदी एखाद्या खेळण्याप्रमाणे खेळत असतं. आपल्या वडिलांचा मृत्यू व इंग्रजांनी केलेला पराभव लहुजींना असह्य झाला. पराक्रमी घराण्यातील लहुजींनी इंग्रजांवर मात करण्यासाठी म्हणजे पर्यायाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक’ निर्माण करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी इ.स. १८२२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र नाना रास्ते सरदार यांच्या हस्ते सुरू केले. या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले. यात प्रामुख्याने [[बाळ गंगाधर टिळक]], [[वासुदेव बळवंत फडके]], [[जोतिबा फुले]], [[गोपाळ गणेश आगरकर]], [[चापेकर बंधू]], क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, [[उमाजी नाईक]], फुले यांचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हेदेखील लहुजी साळवे यांच्या आखाड्यात शिकले.
 
२० जुलै १८७९ रोजी इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडके यांना ‘देवरनावडगा’ मुक्कामी रात्री झोपेत असताना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. ७ नोव्हेंबर १८७९ रोजी वासुदेव फडके यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. लहुजींच्या मनावर खूप मोठा आघात झाला. अवघ्या तेरा महिन्यांनी म्हणजेच १७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुण्याच्या संगमपुराच्या परिसरात एका झोपडीवजा घरामध्ये लहुजी साळवेंची प्राणज्योत मालवली व एका महाक्रांतिपर्वाचा शेवट झाला. क्रांतिवीर लहुजी साळवेंच्या समाधी संगमवाडी (पुणे) येथे आहे