"चक्रधरस्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १५:
==एकाकी भटकंतीचा काळ==
[[गोविंदप्रभू|गोविंदप्रभूंपासून]] शक्ती मिळाल्यानंतर चक्रधरांची विरक्ती अधिकच वाढू लागली. [[लीळाचरित्र]]ाच्या एकांक या भागात त्यांच्या या काळातील भ्रमंतीचे वर्णन आहे. अहमदनगर जिल्यातील पाथर्डी पासुन आठरा कि.मी. अंतरावर येळी या गावी "
या भ्रमंतीच्या काळात चक्रधर यांची [[मेहकर]] येथे बाणेश्वराच्या मंदिरात बोणेबाईंची भेट झाली. बोणेबाईंना [[देवकी]] व स्वतः [[श्रीकृष्ण]] बनवून त्यांनी [[मेहकर]] येथे [[गोकुळाष्टमी]] साजरी केली. बोणेबाईंबरोबर त्यांनी [[लोणार]]ची यात्राही केली. नंतर एके दिवशी [[सिंहस्थ]] यात्रेच्या निमित्ताने ते बोणेबाईंबरोबर [[त्र्यंबकेश्वर]]ला जाण्यास निघाले. वाटेत [[पैठण]] येथे त्यांनी [[त्र्यंबकेश्वर]]ास जाण्याचा बेत रद्द करून [[पैठण]] येथेच विधिवत संन्यासाची दीक्षा घेतली. ही घटना शके ११८९ मध्ये घडली.<ref name="sankpal27">संकपाळ (२००९) पृ. २६-२७</ref> अशा तऱ्हेने [[रिद्धपूर|ऋद्धिपुरापासून]] सुरू झालेले चक्रधरांचे एकाकी भ्रमण [[पैठण]] येथे संपले. यानंतरच्या काळात त्यांनी प्रकटपणे समाज व धर्मसुधारणेचे त्यांचे कार्य सुरू केले.
|