"आनंदीबाई गोपाळराव जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
अविश्वकोशीय मजकूर काढला.
ओळ ५३:
}}
 
'''आनंदीबाई गोपाळराव जोशी''' (जन्म : पुणे, ३१ मार्च इ.स. १८६५; मृत्यू : पुणे, २७ फेब्रुवारी इ.स. १८८७) या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्याआहेत.
 
==जीवन==
आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी [[पुणे|पुण्यात]] त्यांच्या आजोळी झाला. आनंदीबाईंचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. जुन्या कल्याण परिसरातील पारनाका इथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांची त्या ज्येष्ठ कन्या होत्या. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह वयाने २० वर्षांनी मोठे असणाऱ्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. लग्नानंतर गोपाळरावांनी आपल्या पत्‍नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले.
 
गोपाळराव [[कल्याण]]ला पोस्ट ऑफिसात कारकून होते. ते स्वतः [[लोकहितवादी|लोकहितवादींची]] [[शतपत्रे]] वाचत. आपल्या पत्‍नीला शिक्षणात रस आहे हे गोपाळरावांनी जाणले. लोकहितवादींच्या शतपत्रांमुळे ते प्रेरित झाले आणि आपल्या पत्‍नीस [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] शिकविण्याचा त्यांनी निश्चय केला.
 
==वैद्यकीय शिक्षण==
लग्नानंतर आनंदीबाईंनी वयाच्या १४व्या वर्षी एका मुलास जन्म दिला. परंतु दुर्दैवाने पुरेशी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने तो केवळ १०चदहा दिवस जगू शकला. हीच खंत आनंदीबाईना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली. या अनुभवातून त्यांनी शिकून डॉक्टरस्वतः होण्याचा निर्णय घेतला.
 
गोपाळरावांनी यासंदर्भात [[अमेरिका|अमेरिकेत]] काही पत्रव्यवहार केला. परंतु हे शिक्षण घेण्यासाठी [[ख्रिस्ती धर्म]] स्वीकारण्याची अट होती, आणि धर्मांतर करणे तर या जोडप्यास मान्य नव्हते. मात्र त्यांनी प्रयत्‍न सोडले नाहीत . पुढे आनंदीबाईंची तळमळ आणि गोपाळरावांची चिकाटी यांचे फलित म्हणजे आनंदीबाईंना ख्रिस्ती धर्म न स्वीकारता [[इ.स. १८८३|१८८३]]मध्ये, वयाच्या एकोणिसाव्या वर्षी "[[विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हानिया]]"मध्ये प्रवेश मिळाला. तेथे गेल्यानंतर अमेरिकेतील नवीन वातावरण आणि प्रवासातील दगदग यामुळे आनंदीबाईंची प्रकृती खूप ढासळली होती. परंतु अमेरिकेतील कारपेंटर जोडप्याच्याजोडप्याचे मदतीमुळेसहाय्य सर्वत्यांना काही पार पडत गेलेलामले.
 
सुरुवातीला तत्कालीन भारतीय समाजाकडून आनंदीबाईंच्या डाॅक्टर होण्याला खूप विरोध झाला. त्यावेळी आनंदीबाईंनी [[कोलकाता]] येथे एक भाषण केले. तेव्हा त्यांनी [[भारत|भारतामध्ये]] महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे हे पटवून दिले, आणि हे स्पष्ट सांगितले की, मला यासाठी धर्मांतर वगैरे करण्याची काही गरज नाही. मी माझा [[हिंदु धर्म]] व [[संस्कृती]] यांचा कदापि त्याग करणार नाही. मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येऊन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे आहे.
ओळ ७१:
कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून [[मार्च]] [[इ.स. १८८६]] मध्ये आनंदीबाईना [[एम.डी.]]ची पदवी मिळाली. एम.डी.साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, ‘[[हिंदू]] [[आर्य]] लोकांमधील [[प्रसूतिशास्त्र]]’. एम.डी. झाल्यावर [[व्हिक्टोरिया राणी]]कडूनसुद्धा त्यांचे अभिनंदन झाले. हा खडतर प्रवास करताना त्यांना गोपाळरावांचा पाठिंबा होता. तिच्या पदवीदान समारंभाला गोपाळराव स्वतः उपस्थित राहिले; पंडिता रमाबाई होत्या. ‘भारतातील पहिली स्त्री डॉक्टर’ म्हणून सर्व उपस्थितांनी उभे राहून जोरदार टाळ्या वाजवून आनंदीबाईंची प्रशंसा केली.
 
 
स्वप्न पुरे झाले. आनंदी भारतात बोटीने परतली. एव्हाना तिला क्षयाची बाधा झाली होती. बोटीवर कुणीही गोऱ्या डॉक्टरने तिला बिगर- गौरवर्णीय म्हणून उपचार केले नाहीत. मायदेशी पोहोचल्यानंतर समुद्रोल्लंघन करून आलेली, त्यातून स्त्री म्हणून हिंदू डॉक्टर किंवा वैद्यही तपासून पाहीनात.
 
==भारतात आगमन==