"हैद्राबाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ५१:
[[चित्र:Golconda fort.jpg|thumb|left|गोवळकोंडा किल्ला]]
[[चित्र:Charminar-Pride of Hyderabad.jpg|thumb|left|[[चारमिनार]]]]
 
=== नामव्युत्पत्ती ===
हैद्राबादच्या व्युत्पत्तीबद्दल अनेक कल्पना आहेत. पौराणिक कथेनुसार, या शहराचे संस्थापक "मोहम्मद कुली" भगमती नावाच्या नृत्यांगनास बळी पडले आणि शहराला भाग्नगर असे वर्ष 1590 मध्ये नाव दिले. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=The Damsel and Her Sultan|दुवा=http://www.indiatraveltimes.com/legend/sultan.html}}</ref> दुसऱ्या सिद्धान्तानुसार, हैदराबादचे नाव खालिफ अली इब्न अबी तालिब या नावाने ओळखले गेले होते, ज्याला हैदर म्हणत. म्हणून या शहराला हैदराबाद असे नाव पडले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=The birth of a city|दुवा=http://www.hyderabadplanet.com/hyderabad-history.html}}</ref>
 
=== प्राचीन इतिहास ===
इ. स. १५१२ मध्ये [[बहामनी सल्तनत|बहामनी राजवटीतून]] बंड करून किल्ले [[गोलकोंडा|गोवळकोंडा]] येथे कुतुबशाही स्थापन झाली. नंतरच्या काळात महंमद कुली कुत्ब शाह याने गोवळकोंडा येथील सततच्या पाणीटंचाईवर तोडगा म्हणून [[मुसी नदी]]च्या किनारी हैदराबाद या शहराची स्थापना इ.स. १५९१ मध्ये केली. त्यानेच शहरात [[चारमिनार]] या वास्तूची उभारणी केली. गोवळकोंड्याहून राज्यकारभार हैदराबादला स्थलांतरित झाला. शहराभोवती चार मोठे तलाव बांधले गेले.
 
मोगल सम्राट [[औरंगजेब]]ने इ. स. १६८७ मध्ये हैदराबाद ताब्यात घेतले, औरंगजेबाचा मृत्यू इ. स. १७०७ मध्ये झाला. त्यानंतरच्या काळात या प्रांताचा ''निजाम उल मुल्क'' असलेल्या [[मीर कमरुद्दीन खान सिद्दिकी]] अर्थात पहिला असफ जाह याने शहरावर आपली सत्ता प्रस्थापित केली. त्यानंतर असफशाही राजवटीतील सात पिढ्यांनी इ. स. १९४८ पर्यंत हैदराबादचे ''निजाम'' म्हणून राज्य केले. निजाम मुघलांच्या विपरीत असे धर्मनिरपेक्ष शासक होते. शेवटचा [[निज़ाम]] [[मीर उस्मान अली खान]] होता. त्याने हिंदू आणि मुसलमानांना त्यांच्या दोन डोळ्यांसारखे वागवले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक='Nizam of Hyderabad led life simpler than Mahatma Gandhi'|दुवा=http://www.ummid.com/news/2014/February/04.02.2014/seminar-on-nizam.html|अॅक्सेसदिनांक=8 ऑक्टोबर 2018}}</ref><ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=Nizam gave funding for temples, and Hindu educational institutions|दुवा=http://missiontelangana.com/nizam-gave-funding-for-temples-and-hindu-educational-institutions/|अॅक्सेसदिनांक=8 ऑक्टोबर 2018}}</ref>
 
=== आधुनिक इतिहास ===
भारत इ. स. १९४७ मध्ये स्वतंत्र झाल्यानंतर निजामाने हैदराबाद संस्थान भारतापासून अलग ठेवण्याचे प्रयत्न केले. मात्र, १७ सप्टेंबर इ. स. १९४८ ला भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान सामील करून घेण्यात आले. नंतरच्या काळात भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेच्या धोरणानुसार मद्रास स्टेटमधून तेलुगूबहुल भाषकांचा भाग अलग काढून आंध्रप्रदेश राज्याची निर्मिती करण्यात आली. हैदराबाद शहर आणि त्याभोवतलाचा तेलंगण हा विभाग आंध्र प्रदेशात समाविष्ट करण्यात आला. १ नोव्हेंबर इ. स. १९५६ला आंध्र प्रदेशाची स्थापना झाली. हैदराबाद या राज्याच्या राजधानीचे शहर झाले.
 
तेलंगण भागाचे वेगळे राज्य व्हावे, यासाठी आंध्रप्रदेशच्या स्थापनेपासून चळवळ सुरू राहिली. अखेर जुलै इ. स. २०१३ मध्ये केंद्रातील सत्ताधारी आघाडीच्या मान्यतेनंतर काँग्रेस पक्षाच्या कार्यसमितीने [[तेलंगणा|तेलंगण]] या नव्या राज्याच्या निर्मितीचा ठराव मंजूर केला आणि हैदराबाद ही आंध्रप्रदेश आणि तेलंगण या दोन्ही राज्यांची १० वर्षांसाठी राजधानी राहील हेही ठरवण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.thehindu.com/news/national/andhra-pradesh/telangana-will-be-indias-29th-state/article4970069.ece|title=Telangana will be India’s 29th State|first=Smita|last=Gupta|date=30 जुलै, 2013|via=www.thehindu.com}}</ref>