"मेघदूत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १:
'''मेघदूत''' हे कवी [[कालिदास|कालिदासाने]]ाने रचलेले [[संस्कृत भाषा|संस्कृत भाषेतील]] खंडकाव्य आहे. हे खंडकाव्य पूर्वमेघ आणि उत्तरमेघ या दोन भागांमध्ये विभागलेले आहे. या खंडकाव्याचा रचनाकाळ [[गुप्त साम्राज्य|गुप्तकाळात]] इ.स.चे ४ थे शतक ते इ.स.चे ६ वे शतक या कालखंडातला असल्याचे मानले जाते. पत्‍नीविरहामुळे व्याकुळलेल्या एका यक्षाने स्वतःच्या पत्‍नीला [[ढग|मेघाबरोबर]] पाठवलेला संदेशाच्या कल्पनेवर मेघदूत आधारले आहे.
 
मेघदूत काव्याची १११ श्लोक आहेत, काव्य पूर्वमेघ आणि उत्तरमेघ अशा दोन विभागांत विभागलेले आहे.
 
== कथासूत्र ==
मेघदूताचा नायक (यक्ष) हा अलका नगरीत राहणारा यक्षेश्वराचा एक सेवक होता. नेमून दिलेल्या कामात अापल्या पत्‍नीच्या नादाने हलगर्जीपणा केल्याने त्या यक्षाला, यक्षराजाने (कुबेराने) एका वर्षासाठी हद्दपारीची शिक्षा फर्माविली. हद्दपारीचे ठिकाण अलका नगरीहून फार दूर अंतरावर असलेला 'रामगिरि' पर्वत हे होते. त्या ठिकाणी बरेच महिने पत्‍नीपासून दूर राहिला असताना, कामीजनांना अत्यंत पीडा देणारा वर्षाऋतू सुरू झाला. तेव्हा त्या यक्षाच्या मनोवृत्ती एकदम उचंबळून अाल्या. त्या निर्जन प्रदेशात यक्षाला चेतन व अचेतन याचेही भान राहिले नाही. त्यामुळे त्या यक्षाने मेघालाच दूत कल्पून अापल्या पत्‍नीला निरोप सांगण्याचे काम सोपविले.
 
प्रथम रामगिरीपासून अलका नगरीपर्यंत जाणार्‍या मार्गाचे रसभरित वर्णन करून करुणरसपरिप्लुत असा संदेश प्रियेस सांगून प्रियेचे शुभवर्तमान मला परत येऊन देण्याचे सांगून यक्षाने मेघाची अलका नगरीकडे रवानगी केली. येथेच या काव्याची परिसमाप्ती करण्यात अाली अाहे.हे काव्य अतिशय रमणीय आहे <ref>संपादक: प्राचार्य डॉ. सुनील पाटील यांचे संपादकीय निवेदन (महाकवि श्रीकालिदासविरचित 'मेघदूत' (१९३५) भाषान्तरकार :रामचंद्र गणेश पाटील) </ref>
 
== कालिदास जयंती ==
कालिदासाचा जन्म नेमका कोणत्या दिवशी झाली ते माहीत नाही. परंतु ’मेघदूत’ काव्याची सुरुवात ज्या ’आषाढस्य प्रथमदिवसे’ या शब्दांनी होतो त्याची आठवण म्हणून कालिदासाचा जन्म आषाढ शुद्ध प्रतिपदेला झाला असे मानले जाते. त्यामुळे, कालिदासाची जयंती आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी होते. या दिवशी कालिदासाच्या वाङ्मयावर आधारलेले कार्यक्रम होतात.
 
== मेघदूतावरील प्रसिद्ध टीकाग्रंथकार ==
मेघदूतावर सुमारे ९० भाष्ये आहेत. ही भाष्ये १७-१८व्या शतकांतील पंडितांनी किंवा त्याहूनही प्राचीनकालीन पंडितांनी लिहिली आहेत. परंतु पुण्यातल्या भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेमध्ये केवळ आठ भाष्ये उपलब्ध आहेत.
* केदारनाथ शर्मांची विद्योतिनी टीका (हिंदी)
ओळ २१:
 
 
=== अन्य टीकाग्रंथकार ===
* कृष्णपति, कृष्णमाचारियर,. जगद्धर, जतीन्द्रविमल चौधरी, दक्षिणावर्तनाथ, दिनकर मिश्र, परमेश्वर, पूर्णसरस्वती, भरतमल्लिक, महिमसंघगणि, विजयसूरिगणि, सुमतिविजय, हरगोविंद आणि ’सारोद्धारिण” लिहिणारा एक अज्ञात लेखक वगैरे.
 
== मेघदूताचे अनुवाद ==
अनेक कवींनी मेघदूताचे मराठी भावानुवाद केले आहेत - त्यापैकी [[कुसुमाग्रज|कुसुमाग्रज]] (१९६१) व वसंत पटवर्धन (१९८१) ही नावे महत्त्वाची आहेत..
 
* [http://www.kavitakosh.org/kk/मेघदूत_/_कालिदास हिंदी गद्य अनुवाद]
* मेघदूत : मराठी समश्लोकी, समछंदी अनुवाद - [[चिंतामणराव देशमुख]]
* मेघदूत (मराठी पद्य अनुवाद) - रा. प. सबनीस, [[कृष्णशास्त्री चिपळूणकर]], डॉ. श्रीखंडे, कात्रे, [[ना.ग. गोरे]], वसंतराव पटवर्धन, [[बा.भ. बोरकर]], [[कुसुमाग्रज]], [[शांता शेळके]], [[द.वें. केतकर]], [[अ.ज. विद्वांस]] वगैरे. यांपैकी [[चिंतामणराव देशमुख]] (यांचे दोन अनुवाद आहेत), पंडित ग.वि. कात्रे, [[बा.भ. बोरकर]], द.वें. केतकर व अ.ज. विद्वांस या पाच जणांनी मेघदूताच्या मूळ ‘मंदाक्रान्ता’ या वृत्तातच मराठीतून काव्यानुवाद केला आहे.. बाकीच्यांनी निरनिराळ्या जातिवृत्तांतून जसे- साफी, समुदितमदता किंवा मुक्तछंदामध्ये अनुवाद केले आहेत.
* धनश्री लेले यांनी मेघदूर्तावर ‘मला भावलेले मेघदूत’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक esahity.com वर मोफत वाचता येते.
 
== नाट्यरूप मेघदूत ==
* पुण्याचे गणेश भांगरे यांनी मेघदूतावर आधारित ’आषाढस्य प्रथम दिवसे’ ही ९० मिनिटांची नृत्यनाटिका बसवली केली आहे. या नाटिकेत ४० कलावंत काम करतात.
* चिरंजीत, गिरिजाकुमार माथुर, हंसकुमार तिवारी आदी अनेक हिंदी लेखकांनी रेडियोवर मेघदूतावर आधारित संगीतिका सादर केल्या आहेत. उदयशंकर भट्ट हे रंगमंचावर मेघदूत नावाची एकांकिका करीत.
* पुण्यातील निखिल शेटे यांनी मेघदूताचा नवा अवतार रंगभूमीवर आणला आहे. याचा संगीत दिग्दर्शक जयदीप वैद्य यांनी मेघदूतासाठी डफ, [[पखवाज]], [[मृदंग]], [[व्हायोलीन]], [[सतार]], [[सरोद]], [[सारंगी]] आणि [[जेंबे]] अशा आठ वाद्यांचा उपयोग केला आहे.
 
== समश्लोकी अनुवादाचे नमुने ==
 
मूळ संस्कृत श्लोक (पूर्व मेघ-श्लोक ७वा, वृत्त -मंदाक्रांन्ता) पुढीलप्रमाणे - <br />
ओळ ४९:
 
मराठी काव्यानुवाद- (वृत्त-मंदाक्रान्ता) - <br />
१). संतप्तांचा अससि जलदा आसरा तूं, निरोप <br />
कांतेला दे, विरह घडवी आमुचा स्वामि-कोप<br />
यक्षेशाचें नगर अलका तेथ जा, सौध जेथ<br />
ओळ ८६:
रुद्धालोके नरपतिपथे सूचिभेद्यैस्तमोभिः ।<br />
सौदामन्या कनकनिकषस्निग्धया दर्शयोर्वीः<br />
तोयोत्सर्गस्तनितमुखरो मा स्म भूर्विक्लवास्ताः ।। ... मेघदूत.पूर्वमेघ.३७
 
अर्थ :- हे मेघा, रात्रीच्या वेळी अतिशय गडद असा काळोख पसरल्यामुळे शहरातील राजमार्ग दिसेनासे झाले असतील. अशावेळी आपल्या प्रियकरांच्या भेटीसाठी निघालेल्या कामोत्सुक स्त्रियांची पावलें अंधारात अडखळतील. तेव्हा मेघा, तूंच सोन्याच्या निकषावरील रेषेप्रमाणे चमचमणार्‍या तेजस्वी विद्युल्लतेच्या मदतीनें त्या स्त्रियांना मार्ग दाखव. मात्र त्या विलासिनी ललना भित्र्या आहेत हें लक्षात असूं दे, उगाच पाऊस पाडून आणि गर्जना करून त्यांना घाबरवूं नकोस.
 
[[शांता शेळके]] यांनी केलेला या श्लोकाचा अनुवाद
 
प्रिय भेटीस्तव अभिसारोत्सुक रमणी जेव्हां निघतील रात्रीं<br />
ओळ १०४:
करूं नको जलवृष्टि-गर्जना; सहजभीरु त्या पाहीं
 
== संदर्भ ==
{{wikisourcelang|sa|मेघदूतम्|संस्कृत विकिस्रोत प्रकल्पात मेघदूतम् हे काव्य वाचनासाठी उपलब्ध आहे.}}
{{sisterlinks|मेघदूत}}
"https://mr.wikipedia.org/wiki/मेघदूत" पासून हुडकले