"शिरीष पै" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा जोडली
दुवा जोडली
ओळ ९:
नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी नवयुगच्या माध्यमातून कथा आणि कविता लेखन स्पर्धांचे आयोजन केले. त्यातून अनेक लेखक, कवी, पत्रकार उदयाला आले. त्यांनी ललित लेखकांनाही प्रोत्साहन दिले. वडिलांना न पटलेल्या एका लेखकाकडे पाहण्याचा वडलांचा दृष्टिकोन बदलण्यात त्या यशस्वी ठरल्या. त्यांची वडिलांवर प्रचंड [[श्रद्धा]], प्रेम आणि त्यांच्याप्रती आदर होता.
 
शिरीष पै यांनी सन १९७५मध्ये ‘हायकू’‘[[हायकू]]’ हा [[जपानी भाषा|जपानी]] अल्पाक्षरी काव्यप्रकार मराठीत आणला आणि लोकप्रिय केला.
 
शिरीष पै या ओशोंच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाल्या होत्या. त्यांनी 'प्रतिभावंत ध्यानयोगी ओशो' या पुस्तकाचे लेखन केले आहे. त्यांचे एकूण १४ [[कथासंग्रह]] असून कांचनगंगा, खडकचाफा, चैत्रपालवी हे त्यातील काही प्रमुख. शिवाय एकूण २० काव्यसंग्रह त्यांच्या नावावर आहेत. कस्तुरी, [[एकतारी]], एका पावसाळ्यात, चंद्र मावळताना आणि विविध हायकूसंग्रह यांचा त्यांत समावेश आहे. कविता सादर करण्याची त्यांची हातोटी अनोखी होती. त्या नाट्यपूर्ण पद्धतीने कविता सादर करायच्या. त्या काळात शिरीष पै, शांता शेळके, वृंदा लिमये, पद्मा लोकूर, निर्मला देशपांडे या कवयित्रींशिवाय काव्यसंमेलन रंगायचे नाही. या सगळ्याच कवयित्रींमध्ये इतका छान मैत्रीभाव होता. त्यांची अभिनेत्री कुसुम कुलकर्णी यांच्याशीही छान मैत्री होती. या सगळ्यांची वेव्हलेंथ छान जुळायची. त्यामुळे हे मैत्र खास होते. त्यांच्या काव्यवाचन, साहित्यचर्चा अशा मैफली होत. वृंदाबाई, पद्माबाई वृद्ध झाल्या तेव्हा त्या सगळ्यांची काळजी करत असायच्या.
"https://mr.wikipedia.org/wiki/शिरीष_पै" पासून हुडकले