"शिरीष पै" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा जोडली
दुवा जोडली
ओळ ३:
शिरीष व्यंकटेश पै (जन्म : १५ [[नोव्हेंबर महिना|नोव्हेंबर]], १९२९; मृत्यू : मुंबई, २ सप्टेंबर, २०१७<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/mumbai-news/marathi-poet-playwriter-journalist-ms-shirish-pai-passes-away-in-mumbai-1543605/|शीर्षक=लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या शिरीष पै यांचे निधन|दिनांक=2017-09-02|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2019-02-10}}</ref>) या एक मराठी [[कवी]], [[मराठी लेखकांची यादी|लेखिका]] आणि नाटककार होत्या. [[आचार्य अत्रे]] हे त्यांचे वडील. पती व्यंकटेश पै हे [[वकील]] होते.
 
शिरीष पै यांनी [[कथासंग्रह|कथा]], [[कविता]], [[नाटक]], [[ललित लेख|ललित लेखन]] अशा सर्व प्रकारच्या साहित्यात उल्लेखनीय योगदान दिले. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी [[आचार्य अत्रे]] यांच्या 'मराठा'मध्ये [[पत्रकार]] म्हणून काम केले होते. त्या बी.ए.एल्‌.एल.बी होत्या. त्या १९५६ ते १९६० या काळात नवयुग साप्ताहिकाच्या, १९६१ ते १९६९ या काळात दैनिक मराठाच्या वाङ्मयीन पुरवणीच्या, आणि १९६९ ते १९७६ या काळात दैनिक 'मराठा'च्या संपादक होत्या. वृत्तपत्रांतून त्यांचे [[अग्रलेख]]. पुस्तक परीक्षणे, [[मुलाखत|मुलाखती]] आणि वाड्‌मयीन लेख प्रसिद्ध होत असत. त्यांनी आयुष्याची २५ वर्षे वृत्तपत्र व्यवसायात घालवली. त्यामुळे स्फुटलेखनाची त्यांना सवय होती. त्यांनी राजकीय लेखनही केले.
 
शिरीष पै एक चांगल्या वक्त्या होत्या. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातही त्यांनी प्रखर भूमिका निभावली. त्या बोलताना निरागसपणे बोलायच्या. मात्र, त्या बोलण्यामध्ये खूप अर्थ असे. त्यांची भाषा प्रगल्भ होती.
"https://mr.wikipedia.org/wiki/शिरीष_पै" पासून हुडकले