"भाऊराव पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संतोष दहिवळ ने लेख भाऊराव पाटील वरुन भाऊराव पायगौंडा पाटील ला हलविला
 
भाऊराव पायगौंडा पाटील ला असणारे पुनर्निर्देशन हटविले
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले
ओळ १:
{{माहितीचौकट व्यक्ती
#पुनर्निर्देशन [[भाऊराव पायगौंडा पाटील]]
| चौकट_रुंदी =
| नाव = भाऊराव पाटील
| चित्र = Bhaurao Patil.jpg
| चित्र_आकारमान = 200px
| चित्रशीर्षक = भाऊराव पाटील, १९४९
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव =
| जन्म_दिनांक = [[सप्टेंबर २२]], [[इ.स. १८८७]]
| जन्म_स्थान = [[कुंभोज]], [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक = [[मे ९]], [[इ.स. १९५९]]
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_कारण =
| कलेवर_सापडलेले_स्थान =
| चिरविश्रांतिस्थान =
| चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश =
| निवासस्थान =
| राष्ट्रीयत्व =
| टोपणनावे = कर्मवीर
| वांशिकत्व =
| नागरिकत्व =
| शिक्षण =
| प्रशिक्षणसंस्था =
| पेशा = समाजसुधारणा, शिक्षणप्रसार
| कारकीर्द_काळ =
| मालक =
| प्रसिद्ध_कामे = [[रयत शिक्षण संस्था]]
| मूळ_गाव =
| पगार =
| निव्वळ_मालमत्ता =
| उंची =
| वजन =
| ख्याती =
| पदवी_हुद्दा =
| कार्यकाळ =
| पूर्ववर्ती =
| परवर्ती =
| राजकीय_पक्ष =
| विरोधक =
| संचालकमंडळ =
| धर्म =
| जोडीदार =
| अपत्ये =
| वडील =
| आई =
| नातेवाईक =
| पुरस्कार =
| स्वाक्षरी =
| स्वाक्षरीशीर्षक_पर्याय =
| संकेतस्थळ =
| तळटिपा = संपूर्ण जीवन वेचले.
| संकीर्ण =
}}
'''भाऊराव पाटील''' ([[सप्टेंबर २२]], [[इ.स. १८८७]]; ८, [[महाराष्ट्र]] - [[मे ९]], [[इ.स. १९५९]]) हे [[मराठा|मराठी]] समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी [[रयत शिक्षण संस्था]] स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून '[[कमवा व शिका]]' ही योजना सुरू करुन मोठे काम केले.<ref name="bbc._कर्म">{{Cite websantosh | शीर्षक = कर्मवीर भाऊराव पाटलांनी लावलेल्या रोपट्याचा आता वटवृक्ष झालाय | अनुवादित शीर्षक = | लेखक = | काम = BBC News मराठी | दिनांक = | अॅक्सेसदिनांक = 10-05-2018 | दुवा = https://www.bbc.com/marathi/media-44051079 | भाषा = mr | अवतरण = गरीब आणि होतकरू मुलांच्या शिक्षणासाठी कर्मवीरांनी 'कमवा आणि शिका' ही योजना सुरू केली होती. }}</ref> ते [[जोतीराव फुले]] यांनी सुरू केलेल्या [[सत्यशोधक समाज|सत्यशोधक समाजाचे]] एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही]] सहभाग होता. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला.
 
== चरित्र ==
[[चित्र:Dr Babasaheb Ambedkar with Karmaveer Bhaurao Patil (left) and Sant Gadge Maharaj (center) in July 14, 1949.jpg|thumb|[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] व [[गाडगे महाराज]] यांच्यासोबत भाऊराव पाटिल, १४ जुलै १९४९]]
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील यांचा [[जन्म]] [[कोल्हापूर]] जिल्ह्यातील [[कुंभोज]] या गावी जैन कुटुंबात झाला. [[सांगली]] जिल्ह्यातील [[ऐतवडे बुद्रुक]] हे त्यांचे मूळ गाव होय. त्यांचे पूर्वज कोल्हापूरजवळील जैन नादणी मठाचे भट्टारक पट्टाचार्य. भाऊरावांच्या आईला इतर जातीचीच नव्हे तर ब्राह्मणाची शिवाशिवही चालत नसे, एवढे हे कर्मठ घराणे होते. असे असले तरी भाऊराव लहानपणापासूनच बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. त्यांचे बालपण कुंभोजमधील अस्पृश्य मुलांच्यात खेळण्यात गेले. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे [[प्राथमिक शिक्षण]] [[सांगली]] जिल्ह्यातील [[विटा]] आणि इतरही काही गावांत झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या [[राजाराम हायस्कूल]]मध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय [[जैन बोर्डिंग]]मध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला.
 
=== रयत शिक्षण संस्था ===
पुढील काळात भाऊराव पाटील [[सातारा |साताऱ्यात]] जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मदवानमास्तर, [[भाऊसाहेब कुदळे]], [[नानासाहेब येडेकर]] आदि मंडळींबरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले. याच संस्थेमार्फत सर्व जातिधर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले. पुढे त्यांनी [[ओगल्यांच्या काच कारखाना|ओगल्यांच्या काच कारखान्यात]] व [[किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखाना|किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात]] काही काळ काम केले. याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला.
 
दिनांक [[ऑक्टोबर ४]], [[इ.स. १९१९]] रोजी भाऊराव पाटील यांनी ‘रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील [[काले]] या गावी केली. डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी यानी रयत शिक्षण संस्थेला १,११,१११ रुपयांची देणगी दिली. पुढे या संस्थेचे मुख्यालय [[सातारा]] येथे नेण्यात आले. संस्थेची काही अशी उद्दिष्टे होती -
 
# शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे.
# मागासलेल्या वर्गांतील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे.
# निरनिराळ्या जातिधर्मांतील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे.
# अयोग्य रूढींना फाटा देऊन खर्‍या विकासाचे वळण लावणे.
# संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे.
# सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे.
# बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे.
 
ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.
 
साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांच्या पत्नीस स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली. २५ फेब्रुवारी, [[इ.स. १९२७]] रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामाभिधान केले गेले. महात्माजींनी संस्थेला आपल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक ५०० रुपयांची मदत सुरू केली. [[जून १६]], [[इ.स. १९३५]] रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली साताऱ्यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले. बडोद्याच्या सयाजीराव महाराजांनी भाऊराव पाटलांना सातार्‍यात हायस्कूल काढण्यासाठी ४००० रुपये दिले, व बडोद्यात महाराजांच्या राज्यारोहणास साठ वर्षे झाल्यानिमित्त होणाऱ्या समारंभाचे आमंत्रण दिले.
 
त्या देणगीतून भाऊरावांनी देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले ‘फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’. यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली. [[इ.स. १९४७]] साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात ‘छत्रपती शिवाजी कॉलेज’ची, तर [[इ.स. १९५४]] साली कऱ्हाड येथे ‘सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज‘ची स्थापना केली. शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली, म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे [[इ.स. १९५५]] मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने ‘आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन’ सुरू केले. या सर्व शाळांच्या, महाविद्यालयांच्या व वसतिगृहांच्या स्थापनेमागे शिक्षणाचा प्रसार व त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्टे भाऊरावांच्या डोळ्यासमोर होती. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. महात्मा फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. ‘प्रत्येक गावात शाळा’; ‘बहुजन समाजातील शिक्षक’ व ‘शिक्षक प्रशिक्षण’ - या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
 
महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा ''कर्मवीर'' ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना [[पद्मभूषण पुरस्कार|पद्मभूषण पुरस्कार]] देऊन गौरवले. [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठाने]] त्यांचा [[इसवी सन १९५९]]मध्ये सन्माननीय [[डी. लिट.]] ही पदवी दिली होती.<ref name="सातारा">{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://satara.nic.in | शीर्षक = सातारा जिल्ह्याचे संकेतस्थळ - प्रभावशाली व्यक्ती | भाषा = इंग्लिश}}</ref>
 
[[ह.रा. महाजनी]] यांनी ‘महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन’ या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे वर्णन केले आहे. सातारा येथे कर्मवीरांचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृतिभवन आहे. तेथे भाऊराव पाटलांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भगीरथाची प्राणज्योत ९ मे, [[इ.स. १९५९]] रोजी मालवली.
 
==रयतगीत==
 
रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.
वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. || धृ ||
 
कर्मवीरांचे ज्ञान पीठ हे शक्तीपीठ हे ठरते आहे.
शाहू-फुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मुरते आहे.
धर्म जातीच्या पार गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे.
रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.|| १ ||
 
गरिबांसाठी लेणी मोडून , लक्ष्मी वाहिनी झाली आई.
कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई.
स्वावलंबी वृत्ती ठेऊनि, ज्ञानसाधना करतो आहे.
रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. || २||
 
दिन-दलितांसाठी आण्णा तुमची झिजली चंदन काया
अनाथ जीवा सदा लाभली मातृ हृदयी तुमची माया.
शून्या मधुनी नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे.
रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. ||३||
 
जीवनातला तिमिर जावा, प्रबोधनाची पहाट व्हावी,
इथे लाभले पंख लेवुनी उंच भरारी नभात घ्यावी
प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगनी चढतो आहे.
रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. ||४|| ... गीतकार - [[विठ्ठल वाघ]]
 
==भाऊराव पाटील यांची चरित्रे==
===ललित===
* आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार : कर्मवीर भाऊराव पाटील (प्रा. प्रभाकर नानकर)
* कर्मवीर भाऊराव पाटील ([[बा.ग. पवार]])
* कर्मवीर भाऊराव पाटील (प्रा.डॉ. रमेश जाधव)
* कर्मवीर भाऊराव पाटील (संध्या शिरवाडकर)
* कर्मवीर भाऊराव पाटील (सौ. सुधा पेठे)
* कर्मवीर भाऊराव पाटील : काल आणि कर्तृत्व (डॉ. रा.अ. कडियाळ)
* कुमारांचे कर्मवीर (द.ता भोसले]]. इंग्रजी अनुवाद Karmaveer Bhauraao Patil)
* ग्रामीण महाराष्ट्राची शिक्षण परंपरा - कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिक्षणानंद बापूजी साळुंखे ([[रा. ना. चव्हाण]])
* थोर रयतसेवक कर्मवीर भाऊराव पाटील (लीला शांतिकुमार शाह)
* समाजसेवक कर्मवीर भाऊराव पाटील (तृप्ती अंतरकर)
* माणसातील देव, अजित पाटील
 
 
 
(अपूर्ण यादी)
 
===ललितेतर===
(अपूर्ण यादी)
 
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स वर्ग|Bhaurao Patil|भाऊराव पाटील}}
 
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
 
[https://www.historicalmaharashtra.info/2013/02/karmveer-bhaurav-patil.html कर्मवीर भाऊराव पाटील]
 
{{DEFAULTSORT:पाटील, भाऊराव}}
[[वर्ग:पद्मभूषण पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:मराठी समाजसुधारक]]
[[वर्ग:मराठी शिक्षणतज्ज्ञ]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
[[वर्ग:इ.स. १८८७ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९५९ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]