"काळ (वृत्तपत्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ दिला
ओळ २:
 
==उद्दिष्टे==
काळ या शब्दाची व्यापक कल्पना स्पष्ट करणारा अग्रलेख शिवरामपंतांनी पहिल्याच अंकात लिहला. यात प्रतिभा कल्पकता आणि देशभक्तीची चुणूक दिसते.काळ हा सर्वसाक्षी आहे तसा सर्वविनाशीही आहे,आपल्या अग्रलेखात कालतत्वाचे मोठे विलोभनीय व व्यापक रूप त्यांनी उभे केले होते. आपल्या पत्राचा उदेश बाळबोधपणे सांगण्यापेक्षा काव्यमय कल्पकतेने त्यांनी सांगितला. शिवरामपंतांना काळ हे नाव टाइम्स या इंग्रजी पत्रावरून सुचले असावे. कारण केसरीत जाहिरात करताना काळच्या नावाखाली त्यांनी इंग्रजीत [[द टाइम्स ऑफ इंडिया|टाइम्स]] हा शब्द लिहला होता काळ या शोब्दातून ध्वनित होणारे काळ घडवणारे,काळावर प्रभुत्व गाजविणे, इंग्रजांसाठी काळ असे अनेक प्रकारचे कार्य या पत्राने केले. या पत्रातील शिवरामपंतांच्या लेखनात निबंधात स्वत्रांची आकांक्षा आणि प्रखर राष्टीय बाणा याचा उत्कट आणि प्रभावी अविष्कार झालेला दिसतो वक्रोक्ती-व्याजोक्तीची धार असलेली लेखणी यांनी अस्त्राप्रमाणे वापरून प्रतिपक्षाला नामोहरम केले.<br>
==प्रवास==
वृत्तपत्राचा प्रसिद्धीचा वार शुक्रवार होता. लोकांत दृढमुल व रूढ झालेल्या कित्येक राजकीय कल्पनांच्या उच्छेदासाठी काळाचा जन्म आहे. असे हे पत्र काढण्यामागचे उदिष्ट शिवरामपंतांनी जाहीर केले होते. लोकांच्या मनात पारतंत्र्याची चीड निर्माण व्हावी व त्यांनी स्वतंत्राचा ध्यास घ्यावा, असा आपल्या मनातील विचार लोकांपर्यंत पोचविण्याचे व्यापक व्यासपीठ निर्माण करावे या विचाराने काळ ची निर्मिती झाली. असा विशिष्ट मताचा प्रचार हेच मुख्य उदिष्ट असल्याने काळ मध्ये बातम्याना फारसे स्थान नव्हते. काही जाहिराती,थोड्या बातम्या वगळल्या,तर सर्व मजकूर शिवरामपंतांचाच असे. त्यांच्या लेखनात भावनेला अधिक प्राधान्य होते आणि लेखनही शैलीदार होते.<br>