"अब्दुल कादर मुकादम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
ओळ ७:
'''व्यवसाय-'''
 
अब्दुल कादर मुकादम हे राजकीय, सामाजिक घडामोडींचे अभ्यासक असून मुस्लिम समाजाच्या प्रश्नावर त्यांचा विशेष अभ्यास आहे.<ref>{{जर्नल स्रोत|last=DANDEKAR|first=DEEPRA|date=2016-09-13|शीर्षक=Abdul Kader Mukadam: Political opinions and a genealogy of Marathi intellectual and Muslim progressivism|urlदुवा=https://www.taylorfrancis.com/books/e/9781317435969/chapters/10.4324/9781315693316-21|journal=Taylor & Francis|language=en|doi=10.4324/9781315693316-21}}</ref> महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे १४ जून १९३० रोजी त्यांचा जन्म झाला. मुंबईच्या सेंट झेवियर्स काॅलेजमधून त्यांनी तत्त्वज्ञान विषय घेऊन बीए केले, व यानंतर पुणे विद्यापीठातून मराठी साहित्यात एमए केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b53135&lang=marathi|शीर्षक=मराठी पुस्तक चंद्रकोरीच्या छायेत, marathi book chaMdrakorIchyA chhAyeta chandrakorIchyA chhAyeta|संकेतस्थळ=www.rasik.com|अॅक्सेसदिनांक=2018-11-25}}</ref>मुकादम हे १९७०पासून महाराष्ट्रातील सुधारणावादी चळवळीत सक्रिय आहेत. मुस्लिम समाजामध्ये वैचारिक परिवर्तनाची गरज आहे या जाणिवेतून देशातील विविध पुरोगामी संस्था व चळवळीशी त्यांनी स्वत:ला जोडून घेतले आहे. हमीद दलवाईंनी स्थापन केलेल्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्यांच्या पत्रिकेचेही त्यांनी काही वर्षे संपादन केले. दलवाईंच्या निधनानंतर ते बरीच वर्ष सत्यशोधक मंडळात कार्यरत होते. कालांतराने वैचारिक मतभेद झाल्याने ते बाहेर पडले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.bbc.com/hindi/india/2015/07/150703_maharashtra_madarsa_sr|शीर्षक=महाराष्ट्र: स्कूल न जाने वाले बच्चों का सर्वेक्षण|last=से|पहिले नाव=अश्विन अघोर मुंबई|last2=लिए|first2=बीबीसी हिंदी डॉटकॉम के|संकेतस्थळ=BBC News हिंदी|भाषा=hi|अॅक्सेसदिनांक=2018-11-19}}</ref>
 
अब्दुल कादर मुकादम यांनी मुस्लिम सधारणावादी चळवळीतील अनेक दिग्गजांसोबत काम केले आहे. त्यांत कायदेतज्ज्ञ ए.ए.ए. फैजी, मोईन शाकीर, असगरअली इंजिनिअर, प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, दाऊद दळवी आदींसोबत यांचा समावेश होतो. याशिवाय नरहर कुुरुंदकर, वसंत पळशीकर, भाई वैद्य यांच्याशीदेखील त्यांचे मैत्रीचे नाते होते. .<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.catchnews.com/india-news/fatwa-directs-muslim-women-not-to-contest-kolhapur-civic-polls-1443847219.html|शीर्षक=Fatwa directs Muslim women not to contest Kolhapur civic polls|work=CatchNews.com|access-date=2018-11-19|language=en}}</ref> स्वातंत्र्योत्तर काळातील मुस्लिम समाजाचे प्रश्न, जातीयवाद, दहशतवाद, भारताचा मध्ययुगीन इतिहास, जमातवादी राजकारण, आधुनिक भारत आदी त्यांच्या अभ्यासाचे व चिंतनाचे विषय आहेत. इस्लामी धर्मशास्त्र, न्यायशास्त्र, परंपरा आणि इतिहास याचा व्यासंगपूर्ण व संशोधनात्मक अभ्यास करणे त्यांचा विशेष आवडीचा विषय राहिला आहे.