"थोरले बाजीराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
→‎बाजीराव आणि धर्म: आधीच्या लेखातील वैयक्तिक मते काढून टाकली आहेत
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन
ओळ ५८:
 
==बाजीराव आणि धर्म==
त्यांनी कधीही देवधर्म यांचे अवडंबर केले नाही. जाती-पातीच्या परिघात ते अडकले नाहीत आणि म्हणूनच बहुजन समाजातील सरदारांच्या, सैनिकांच्या मांडीला मांडी लावून ते जेवत, त्यांच्या रमत. जे असेल ते खात. म्हणूनच पुण्यात धर्म मोडला आणि अभक्ष्य भक्षण केले यासाठी तथाकथित पंडितांनी आकांडतांडव केले. परंतु बाजीरावांनी त्यांना भीक घातली नाही. द्वितीय पत्नी मस्तानीबाईंचा पुत्र कृष्णसिंग अर्थात समशेरबहाद्दर (पुढे याने पानिपत युद्धात अतुलनीय पराक्रम केला). याच्या हक्कासाठी ते जागरूक होते. त्याचे मौजीबंधन करण्यास पुण्यातील शास्त्री, पंडिताचा विरोध होता. पण तो विरोध डावलून समशेरसिंगचे मौजीबंधन केले. धर्मातील खुळचट कल्पना त्यांनी केव्हाच झुगारून दिल्या होत्या. बाजीराव पेशवे हे महान होते.
 
'''<nowiki/>' श्री राजा शाहू नरपति हर्षनिधान<br /> बाजीराव बल्लाळ पंतप्रधान ''''<br />ही मुद्रा धारण करणार्‍या बाजीरावांकडे कोणतेही छक्केपंजे नव्हते. ब्राह्मणांचा त्या काळातील कर्मठपणाही नव्हता. नेपोलियनने जसे सामान्यांतून मार्शल निर्माण केले तसे बाजीरावांनी अठरापगड जाती-जमातीतून लढवय्यै सरदार निर्माण केले. संबंध भारतभूमीत स्फुल्लिंग पेटवला, अस्मिता निर्माण केली. अस्थिर झालेल्या स्वराज्याला त्यांनी स्थिर केले. एवढेच नाही तर संभाव्य विस्ताराचा मार्ग आखून दिला. हिंदुस्थानच्या इतिहासात मराठ्यांना मानाचे स्थान मिळवून दिले. एवढा बळकट शनिवारवाडा बांधून ते त्यात कधीही विश्रांतीसाठी थांबले नाहीत. खर्‍या अर्थाने ते कर्तबगार, खर्‍या अर्थाने थोरले, खर्‍या अर्थाने ते श्रीमंत होते.
 
'''<nowiki/>'''
 
==बाजीराव आणि स्त्रिया==