'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक किल्ला आहे.
[[सह्याद्री]]च्या रांगांमध्ये हरिहर किल्ला आपले वेगळेपण जपतो.
ह्या किल्ल्यावर वेताळ मंदिर आहे.मे महिना असेल तर करवंदांचा रानमेवा हमखास खायला मिळतो.हरिहरचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे कातळपायऱ्या आहेत.चढाईनंतर पूर्वेकडे लहानसा तलाव लागतो. काठावर [[हनुमान]]चे मंदिर व बाजूलाचं चौथऱ्यावर [[महादेव]]ची पिंड
व नंदी आहेत. आजूबाजूला ४ ते ५ पाण्याने भरलेल्या कातळटाक्या दिसतात. डावीकडे खाली उतरुन तटापर्यंत जाता येते. या किल्ल्याला चौफर बेलाग कातळकडा आहे. पूर्वेला कापड्या डोंगर व ब्रम्हगिरी दिसतात.दक्षिणेकडे वैतरणा खोरे आहे. गिर्यारोहणप्रेमीकरता हा एक पर्याय आहे.<ref name="m.maharashtratimes.com">http://m.maharashtratimes.com/others/tourism/fort/articleshow/47544643.cms</ref> इतिहासः हरिहर उर्फ हर्षगड हा प्राचीन काळात बांधलेला असून तो अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी १६३६ साली निजामशाहीची पुनर्स्थापना करतेवेळी त्र्यंबकगडासोबत हा किल्ला सुद्धा जिकला.