"सावित्रीबाई फुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sammika764 (चर्चा)यांची आवृत्ती 1647696 परतवली. खूणपताका: उलटविले |
No edit summary |
||
ओळ १:
{{गल्लत|सावित्रीबाई फुले (राजनेत्या)}}
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
| नाव = सावित्रीबाई फुलेhttps://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87&action=edit
| चित्र = MAHATMA fule vada (23).JPG
| चित्र रुंदी =
ओळ २६:
}}
'''सावित्रीबाई जोतीराव फुले''' (जन्म : [[नायगाव (खंडाळा)|नायगाव]], [[खंडाळा, सातारा जिल्हा|खंडाळा तालुका]], [[सातारा जिल्हा|सातारा]] जिल्हा; [[३ जानेवारी]], [[इ.स. १८३१]]; मृत्यू : पुणे, [[१० मार्च]], [[इ.स. १८९७]]) या [[मराठी]] शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती [[जोतिराव फुले]] यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री आहेत.
== चरित्र ==
सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील
सावित्रीबाईंचे पती जोतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज
१ मे, इ.स. १८४७(1847) रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली [[शाळा]] मध्येच बंद पडली.१ जानेवारी, इ.स. १८४८(1848) रोजी [[भिडे वाडा|भिडेवाड्यात]] जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली.
सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. तत्कालीन [[ब्रिटिश]] भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली. १८४७-१८४८ कर्च्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले. केवळ चार वर्षांत 18 शाळा उघडल्या आणि चालवल्या
(यापूर्वी
सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५(40-45) पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी "धर्म बुडाला.... जग बुडणार.... कली आला...." असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.
शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. [[ब्राह्मण]] समाजात [[विधवा]] पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना [[सती]] जावे लागे किंवा मग त्यांचे [[केशवपन]] करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला
जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.
ओळ ४७:
[[केशवपन]] बंद करण्यासाठी [[न्हावी |नाभिक]] समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. [[सत्यशोधक समाज|सत्यशोधक समाजाच्या]] कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.
इ.स. १८९६(1896) सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय
इ.स. १८९६-९७(1896-97) सालांदरम्यान पुणे परिसरात [[प्लेग|प्लेगच्या]] साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून [[१० मार्च]], [[इ.स. १८९७]] रोजी त्यांचे निधन झाले.
ओळ ९७:
* सावित्रीबाई फुले यांच्या नावाने काही संस्थांनी पुरस्कार ठेवले आहेत. ते असे :-
** कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार.
** पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सामाजिक कार्यासाठीचा 'सावित्रीबाई फुले पुरस्कार'. हा पुरस्कार २०११-१२ सालापासून दरवर्षी, महिला-बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम
** महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार
** चिंचवडगाव येथील महात्मा फुले मंडळाचे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले पुरस्कार
ओळ १०४:
** क्रांतिज्योती सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार
** मध्य प्रदेश सरकारचा उत्तम शिक्षिकेसाठीचा एक लाख रुपयांचा वार्षिक सावित्रीबाई पुरस्कार (२०१२ सालापासून)
** सावित्रीबाई फुले महिलामंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात काम
** मराठी पत्रकार परिषदेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार
** महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचा सर्व्प्त्कृष्ट नर्सला देण्यात येणारा सावित्रीबाई फुले पुरस्कार
ओळ ११७:
* {{स्रोत पुस्तक | शीर्षक = ‘त्या होत्या म्हणून’ | लेखक = डॉ. विजया वाड | प्रकाशक = अनुश्री प्रकाशन | भाषा = मराठी }}
* {{स्रोत बातमी | शीर्षक = दै. सकाळमधील लेख | दिनांक = ३ जानेवारी, इ.स. २००९ | प्रकाशक = [[सकाळ (वृत्तपत्र)|सकाळ]] | भाषा = मराठी }}
* कष्टाने शिक्षण घेतलेल्या मुलीला किंवा स्त्रीला सावित्रीची लेक म्हणायची रीत पडली आहे. त्यामुळे शिकलेल्या स्त्रियांच्या परिचय-ग्रंथाला ‘सावित्रीच्या लेकी’ किंवा ‘लेकी सावित्रीच्या’ अशी नावे देण्यात येतात. त्यामुळे या नावाची पुस्तके अनेक लेखकांनी लिहिली आहेत. उदा० निर्मलाताई काकडे यांच्या [[यू.म.
* ‘सावित्रीच्या लेकी’ नावाचे एक मासिकही आहे.
*
* आम्ही
* सावित्रीच्या लेकींचा परिचय (मधुरिमा मासिकातले पाक्षिक सदर) .
* सावित्रीबाई फुले : अष्टपैलू व्यक्तिमत्त्व (ना. ग. पवार)
==संदर्भ==
|