'''विधान भवन, नागपूर''' हे [[नागपूर]], [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] उपराजधानीच्या सिव्हिल लाईन्स परिसरात आहे, जेथे [[महाराष्ट्र विधानसभेचाविधानसभेचे हिवाळी सत्रअधिवेशन]] आयोजित केला जातो. १९१२ या मध्ये इमारतीची पायाभरणी केली गेली. हि इमारत ब्रिटीश कमांडने सेंट्रल प्रॉव्हिन्स आणि बेरारच्या प्रशासनासाठी स्थापित केली होती. नागपूर सेंट्रल प्रॉव्हिन्स आणि बेरारचे सर्वात मुख्य शहर आणि राजधानी होते. पुढे १९५२ मध्ये सीपी व बेरार मध्य भारतातील विस्तृत मध्य प्रदेश राज्यात विभागले गेले ज्यामध्ये आताचे [[मध्य प्रदेश]], [[छत्तीसगढ]] आणि [[विदर्भ]] क्षेत्र समाविष्ट होते. नागपूर शहर हे या राज्याची राजधानी होते. १९६० मध्ये, हे राज्य आणखी विभागला गेला, आणि विदर्भ क्षेत्र महाराष्ट्रात जाणार म्हणून निवासी लोकांने फार प्रतिकार केला. अशाप्रकारे, [[नागपूर|नागपूरने]] आपली राजधानीची स्थिती गमावली. परंतु, [[विदर्भ]] क्षेत्राच्या लोकांच्या समान विकासासाठी [[यशवंतराव चव्हाण]] यांच्या अध्यक्षतेखाली [[महाराष्ट्र शासन|महाराष्ट्र शासनाने]] नागपूर करार केला. त्यानुसार, नागपूरला [[महाराष्ट्र|महाराष्ट्राची]] उपराजधानी बनविली गेली आणि राज्य विधानसभेचे आणि राज्य विधान परिषदेचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे दरवर्षी आयोजित करण्यात आले.<ref>http://nagpur.gov.in/htmldocs/history.htm</ref>