"पुरंदर किल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २१:
| रेखांश = 73.59
}}
[[सह्याद्री|सह्याद्रीच्या]] पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आहे हे या किल्ल्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एका फाट्यावर [[सिंहगड]] आहे. तोच फाटा पूर्वेकडे अदमासे २४ किलोमीटर धावून [[भुलेश्वर]] जवळ लोप पावतो. याच डोंगररांगेवर पुरंदर आणि वज्रगड वसलेले आहेत. [[कात्रज घाट]] किंवा बापदेव घाट किंवा दिवे घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. किल्ल्याच्या चौफेर माच्या आहेत. किल्ला [[पुणे|पुण्याच्या]] आग्नेय दिशेला अंदाजे २० मैलांवर तर [[सासवड|सासवडच्या]] नैर्‌ऋत्येला ६ मैलांवर आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे. वायव्येला १३-१४ मैलांवर [[सिंहगड]] आहे. तर पश्चिमेला १९-२० मैलांवर [[राजगड]] आहे.<br /><br />
पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. दारुगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते.<ref name="maha-tourism-purandar">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा = https://www.maharashtratourism.gov.in/mr/treasures/fort/purandar | शीर्षक = पुरंदर | प्रकाशक = [[महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ]]}}</ref>