"बाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) बदल साचा |
Gunjan1008 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर ! |
||
ओळ १७:
[[वर्ग:इंडोनेशियाचे प्रांत]]
बाली इंडोनेशियातील बेट बेट आहे. हे जावाच्या पूर्वेस स्थित आहे. बाल्कच्या पूर्वेस लम्बाक बेट आहे. येथे ब्रह्मी लेख जुन्या २०० ईसा पूर्व आहेत. ५००० च्या आदल्यापूर्वी , इंडोनेशियामध्ये माझपहाट हिंदू साम्राज्याची स्थापना झाली . जेव्हा हे साम्राज्य पडले आणि मुस्लिम सुलतानांनी सत्ता गाठली तेव्हा जावा आणि इतर बेटांचे कुटूंब आले. येथे, हिंदू धर्माचा नाश झाला नाही. १०० वर्षांपूर्वी बाली मुक्त राहिली, परंतु अखेरीस डचने त्याला पराभूत केले. येथे बहुतेक लोक (९० टक्के) हिंदू धर्मावर विश्वास ठेवतात. हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे ज्यांचे कला, संगीत, नृत्य आणि मंदिर आकर्षक आहेत. दीनापसारची राजधानी येथे आहे . उबुड केंद्रीय गाव आहे. बेटामधील कला आणि संस्कृतीचे हे मुख्य ठिकाण आहे. कुट्टा दक्षिण बाली मधील एक शहर आहे. २००२ मध्ये इस्लामिक दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोटात २०२ जणांचा स्फोट केला . जिम्बेरन हे बालीतील मच्छीमारांचे एक गाव आहे आणि आता ते पर्यटन स्थळ आहे. बेटाच्या उत्तर किनार्यावर सिन्हाराज शहराची स्थापना झाली आहे. अगुंग पर्वत आणि बतुर ज्वालामुखी पर्वत दोन उच्च शिखर आहेत.
वातावरण-
प्रत्येक वर्षी लेबिहा समुद्रकिनाऱ्यावर जमिनीची धूप होते, ज्यामुळे ७ मिटर (२३ फीट) पर्यंत जमिनीचे नुकसान होते. याला सर्वात वाईट जमिनीची धूप असे म्हटले जाते. हा समुद्रकिनारा १०,००० पेक्षा अधिक भाविक तीर्थयात्रा करण्यासाठी वापरायचे आता ते मास्केटी समुद्रकिनाऱ्यावर हलविले आहेत.
२०१० च्या पुनरावलोकन अनुसार बाली चा वतावरनिक गुणवत्ता निर्देशांक ९९.६५ होता आणि इंडोनेशिया च्या ३३ प्रंतांमधून बाली ने ३ क्रमांक पटकावला.
पर्यटकांच्या अतिरेकामुळे येथील ४०० पैकी २०० नद्या आटल्या आहेत, पर्यटन व्यवसाय इथला मुख्य व्यवसाय देखील आहे,आणि एका संशोधना अनुसार बाली च्या दक्षिणी भागात पाण्याच्या कमतरतेचा प्रश्न देखील उदभवू शकतो.
प्लास्टिक प्रदूषण
मागील वर्षी बाली येथे जवळ जवळ ५-७ दशलक्ष पर्यटकांनी हजेरी लावली,२०१७ च्या शेवटाला येथे कचरा आणीबाणी जाहीर करण्यात आली कारण येथे ३.६ मैलांपर्यंत समुद्रकिनारा वर प्लास्टिक समुद्री लाटांमुळे येत होते. या सगळ्यामुळे पर्यटकांची गर्दी कमी होऊ नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आले.
इंडोनेशिया हे जगातील सर्वात वाईट प्रदूषण करणाऱ्यांपैकी एक देश मानला जातो, हा देश जगातील १०% इतके प्लास्टिक प्रदूषण करतो,इथली राजधानी जकार्ता येथे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आणि अस्वच्छता बघायला मिळते.
आर्थिक व्यवस्था-
१९७० च्या काळात बाली येथील अर्थव्यवस्था शेती प्रधान होती, पण आता पर्यटन हा इथला मुख्य व्यवसाय आहे आणि म्हणूनच बाली हे इंडोनेशिया मधील श्रीमंत क्षेत्र आहे.
२००३ बाली ची ८०% अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून होती परंतु ही अर्थव्यवस्था २००२ आणि २००५ मध्ये इस्लामी दहशतवादी हल्ल्यामुळे कोलमडली.तेव्हा पासून आज पर्यंत यात बरीच सुधारणा झालेली आहे.
शेती-
पर्यटन व्यवसाय देशाच्या वार्षिक सकलन उत्पादनात महत्त्वाचे काम करतो पण तरीही शेती या बेटावरची रोजगाराची मुख्य साधन आहे.मासेमारी देखील येथे बघण्यात येते.येथील कारागीर जे विविध हस्तकला बनवितात या साठी देखील बाली प्रसिद्ध आहे,या हस्तकलेमध्ये बटिक आणि इकत हे कापड,लाकडवरील कोरीव काम,दगडावरील कोरीव काम,चित्रकला, चांदीची भांडी यांचा समावेश आहे.प्रत्येक गाव एक कला निवडतो आणि त्याच वस्तू बनवितो उदा.आवाज करणारे झुंबर किंवा लाकडी वस्तू ई.
१९६३ मध्ये बाली बीच नावाचे हॉटेल सनुर येथे सुकारपो द्वारे बांधण्यात आले आणि तेव्हा पासूनच येथील पर्यटन क्षेत्राला वाव मिळाला ,या आधी संपूर्ण बेटावर फक्त ३ हॉटेल होती. हळू हळू संपूर्ण बाली मध्ये हॉटेलच्या बांधकामाची कामे सुरू झाली. १९७० मध्ये गुराह राय आंतरराषट्रीय विमानतळ झाले आणि पर्यटक आणखीनच वाढलेत.
बुलीलेंग सरकारने पर्यटनाला फार महत्त्व दिले. पर्यटन व्यवसाय प्रामुख्याने बेटाच्या दक्षिणेला केंद्रित आहे.
कुहा, लेगीअन, सेमिण्याक सानुर, उबुद, जम्बिरान, नुसा दुआ आणि पेकाटू हे मुख्य पर्यटन स्थळे इथे आहेत
२०१० मध्ये बालीला सर्वतकृष्ट बेट हा पुरस्कार ट्रॅव्हल अँड लिझर कडून मिळाला .हा पुरस्कार मिळण्याचे मुख्य कारण होते येथील मनमोहक दृष्ये,विविध देशातील पर्यटकांची हजेरी, उत्कृष्ट दर्जाचे आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक उपहारगृहे आणि स्थानिक लोकांची मित्रत्व वागणूक.बाली येथील संस्कृती आणि येथील धर्म हे देखील पुरस्कार मिळण्याचे मुख्य कारण होते. केकक नृत्य हा येथील एक अतिशय प्रतिष्ठित कार्यक्रम जो देव आणि त्यांचे अनुयायी यांचे संबंध घट्टा करतो असे मानले जाते. बीबीसी अनुसार संटरिनी, ग्रीस नंतर बाली हे सर्वात उत्कृष्ट बेट आहे.
संस्कृती-
बाली हे त्याच्या आत्याधूनिक आणि वैविध्येने भरलेल्या संस्कृती साठी प्रसिद्ध आहे.येथील पाककृती देखील विशिष्ट आहे. इथे चित्रकला,शिल्पकला, लाकडावरील कोरीव काम, हस्तकला आणि कला प्रदर्शन हे सगळे प्रकार बघायला मिळतात . बाली येथील संगीत गमेलान या नावाने ओळखले जाते,हे संगीत फार विकसित आणि विविधतेने नटलेले आहे.
पेडेंट, लिगोंग, बासिस, टोपेंग,बरोंग,गोंग किबार आणि केकेक (माकडांचे नृत्य) या इथल्या प्रसिद्ध नृत्य पद्धती आहेत.
उत्सव-
वर्षभरात या बेटावर विविध उत्सव साजरे केले जातात,हे उत्सव पारंपरिक कॅलेंडर अनुसार साजरे केले जातात .
हिंदू नववर्ष न्येपी हे वसंत ऋतू मधील एका दिवशी शांतता पाळून साजरे केले जाते.या दिवशी कोणीही घराबाहेर निघत नाही आणि पर्यटकांना सुद्धा आपल्या विश्राम खोलीतच राहायला सांगितले जाते.
|