"स्वामी विवेकानंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
106.78.174.230 (चर्चा)यांची आवृत्ती 1637331 परतवली.
खूणपताका: उलटविले
ओळ ३०:
}}
 
'''स्वामी विवेकानंद''' ([[१२ जानेवारी]], [[इ.स. १८६३|१८६३]] - [[४ जुलै]], [[इ.स. १९०२|१९०२]]) हे मूळचे [[बंगाल|बंगालचे]] रहिवासी असलेले [[भारत|भारतीय]] हिंदू विचारवंत होते. तरुणपणीचतरुणपणी ते [[रामकृष्ण परमहंस]] यांचे शिष्य झाले आणि रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी [[रामकृष्ण मिशन]] सुरू केले. जगामध्ये [[रामकृष्ण मिशन|रामकृष्ण मिशनच्या]] अनेक शाखा आहेत. [[भारत सरकार]]तर्फे विवेकानंदांचा जन्मदिवस हा [[युवक दिन]] म्हणून साजरा केला जातो.{{संदर्भ हवा}}
 
==बालपण ==
[[चित्र:Bhuvaneshwari-Devi-1841-1911.jpg|इवलेसे|उजवे|माता भुवनेश्वरी देवी]]
उत्तर [[कोलकाता|कलकत्त्यातील]] सिमलापल्ली येथे [[१२ जानेवारी]] [[इ.स. १८६३|१८६३]], सोमवारी सकाळी ६:३३ वा. (पौष कृष्ण सप्तमी, संक्रांतीच्या दिवशी) विवेकानंदांचा जन्म झाला. त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. वडील [[विश्वनाथ दत्त|विश्वनाथ दत्त हे]] [[कोलकाता]] उच्च न्यायालयात ([[वकील]]) अ‍ॅटर्नी होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रनाथाच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा वाटा होता. नरेंद्रनाथाला दर्शनशास्त्रे, [[इतिहास]], [[समाजशास्त्र|समाजशास्त्रे]], [[कला]], [[साहित्य]] इत्यादी अनेक विषयांत रुची आणि गती होती. [[वेद]], [[उपनिषदे]], [[रामायण]], [[महाभारत]], [[भगवद्गीता]] आदि धार्मिक साहित्यात त्याने विशेष आवड दाखवली. त्याला [[शास्त्रीय संगीत|शास्त्रीय संगीताची]] देखील जाण होती आणि त्याने बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले. किशोरावस्थेपासूनच तो [[व्यायाम]], [[खेळ]] आदी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेई. जुनाट अंधश्रद्धा आणि जात्याधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी त्याने लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते आणि सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टिकोण यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला होता. विवेकानंद हे मित्र परिवारात प्रिय होते, त्यांचे मित्र त्यांना [[बिले]] या नावाने हाक मारत तर त्यांचे गुरु नोरेन या शब्दाने. त्यांना वाचन, [[व्यायाम]], [[कुस्ती]], [[मुष्टियुद्ध]], [[पोहणे]], होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठीयुद्ध, [[गायन]] आणि वादन इत्यादी छंद होते.{{संदर्भ हवा}}
 
== शिक्षण ==
नरेंद्रनाथांनी आपल्या घरीच शिक्षणाची सुरुवात केली. नंतर त्यांनी १८७१ साली [[ईश्वरचंद्र विद्यासागर]] यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला आणि ते १८७९ मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले. काही दिवस या संस्थेत राहिल्यानंतर पुढे त्यांनी जनरल असेम्ब्लीज इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांनी [[तर्कशास्त्र]], पाश्चात्त्य [[तत्त्वज्ञान]], आणि [[युरोप|युरोपचा इतिहास]] इतिहास यांचा अभ्यास केला. १८८१ साली ते फाइन आर्टची आणि १८८४ मध्ये [[बी.ए.]] ची परीक्षा उत्तीर्ण झाले.{{संदर्भ हवा}}
 
नरेंद्रनाथांनी डेव्हिड ह्यूम, इमॅन्युएल कान्ट, गोत्तिलेब फित्शे, बारूच स्पिनोझा, जॉर्ज हेगेल, आर्थर शोपेनहायर, ऑगस्ट कोम्ट, हर्बर्ट स्पेन्सर, जॉन स्टुअर्ट मिल आणि [[चार्ल्स डार्विन]] इत्यादी विचारवंतांच्या लेखनाचा अभ्यास केला होता. हर्बर्ट स्पेन्सरच्या उत्क्रांतिवादाने ते प्रभावित झाले होते. गुरुदास चटोपाध्याय या बंगाली प्रकाशकासाठी त्यांनी स्पेन्सरच्या ‘Education’‘एज्युकेशन’ या पुस्तकाचा अनुवादही केला होता. काही काळ त्यांनी स्पेन्सर यांच्याशी संपर्कही स्थापन केला होता. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासोबत त्यांनी प्राचीन [[संस्कृत]] आणि [[बंगाली]] ग्रंथांचाही गाढ अभ्यास केला होता. त्यांच्या प्राध्यापकांच्या मते नरेंद्र एक प्रतिभावान विद्यार्थी होते. १८८१-८४ मध्ये ते जेथे शिकले त्या स्कॉटिश चर्च कॉलेजचे प्राचार्य डॉ. विल्यम हेस्टी यांनी म्हटले आहे “He is an excellent philosophical student. In all the German and English Universities की, there is not one student so brilliant as he is.” “नरेंद्र"नरेंद्र खरोखरच बुद्धिमान आहे. मी खूप फिरलो, जग पाहिले परंतु त्याच्यासारखी प्रतिभा आणि बुद्धिसामर्थ्य असलेला मुलगा अगदी [[जर्मन]] विद्यापीठातल्या तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांमध्येही मला बघायला मिळाला नाही."{{संदर्भ हवा}} त्यांना ‘श्रुतिधारा’ (विलक्षण स्मरणशक्ती असलेला) म्हटले जात असे. “एवढ्या तरुण मुलाने एवढे वाचले असेल असे मला वाटले नव्हते.” असे महेंद्रलाल सरकारांनी त्यांच्याशी चर्चा केल्यावर म्हटले होते.{{संदर्भ हवा}}
 
==गुरु रामकृष्ण यांची भेट==
कोलकात्यात शिमला नामक मोहल्ल्यात सुरेंद्रनाथ मित्र यांनी श्री [[रामकृष्ण परमहंस]] यांना आपल्या घरी एका समारंभासाठी बोलविले होते. त्यावेळी कुणी चांगला गायक न मिळू शकल्याने त्यांना आपल्या शेजारी राहणा-या नरेन्द्रला बोलावून आणले. इ.स. १८८१ च्या नोव्हेंबर महिन्यात श्री रामकृष्ण पहिल्यांदाच नरेंद्रला भेटले आणि त्याचे गायन ऐकून संतुष्ट झाले. त्यांनी त्याला दक्षिणेश्वर येथे येण्याचे आमंत्रण दिले. सूक्ष्म योगदृष्टीच्या साहाय्याने श्रीरामकृष्ण नरेंद्रनाथांचा महिमामय अति उज्ज्वल भावी काल पाहू शकले होते म्हणूनच ते नरेंद्राकडे आकृष्ट झाले, असे दिसते..<ref>मुजुमदार सत्येंद्रनाथ, स्वामी विवेकानंद यांचे चरित्र, रामकृष्ण मठ नागपूर प्रकाशन आवृत्ती अकरावी, सन २००० </ref>
 
==नरेंंद्राचीनरेंद्राची साधना==
अनन्यचित्त होऊन गुरूने सांगितलेल्या मार्गाने साधना करीत नरेंद्र उन्नती साधत होता. रामकृष्णांच्या पवित्र सहवासात नरेंद्रात आमूलाग्र बदल झाले. त्यांच्यासह असलेल्या अन्य तरुण साधकांनी रामकृष्णांच्या आदर्शांना स्वीकारून काशीपूरच्या उद्यानात तपश्चर्या केली. रामकृष्णांच्या सेवेत हे सर्व तरूण सतत राहिल्याने त्या सर्वांच्यात अपूर्व आध्यात्मिक प्रेमसंबंध जोपासले गेले. येथे या ठिकाणीच भावी 'रामकृष्ण संघाची' पायाभरणी झाली.<ref>मुजुमदार सत्येंद्रनाथ, स्वामी विवेकानंद यांचे चरित्र, रामकृष्ण मठ नागपूर प्रकाशन आवृत्ती अकरावी, सन २००० </ref>
 
==गुरुभेट व संन्यासदीक्षा ==
याच ठिकाणी एका शुभ दिवशी श्री रामकृष्ण यांनी आपल्या यास सर्व शिष्यांना भगवी वस्त्रे देवून संन्यासदीक्षा दिली. संन्यासग्रहणानंतर गतकालीन युगप्रवर्तक संन्यासी मंडळींचे जीवन आणि उपदेश यांचे अनुशीलन करणे हेच नरेंद्राचे लक्ष्य बनले. नरेंद्राच्या घरी लहानाचे मोठे झालेले त्यांचे नातेवाईक डॉ. रामचंद्र दत्त हे रामकृष्णांचे भक्‍त होते. धर्मभावनेने प्रेरित होऊन नरेंद्राच्या मनात लहानपणीच तीव्र वैराग्य उत्पन्न झालेले पाहून डॉ. दत्त एकदा त्यांना म्हणाले, "भाई, धर्मलाभ हेच जर तुझ्या जीवनाचे उद्दिष्ट असेल, तर तू ब्राह्मोसमाज वगैरेंच्या भानगडीत पडू नकोस.
तू दक्षिणेश्‍वरीला श्रीरामकृष्णांकडे जा." एके दिवशी त्यांचे शेजारी श्री. सुरेंद्रनाथ यांच्याकडेच श्री रामकृष्ण परमहंसांचे त्यांना दर्शन झाले. सुरुवातीचे काही दिवस श्री रामकृष्ण नरेंद्रनाथांना आपल्यापासून क्षणभरही दूर ठेवू इच्छित नसत. त्यांना जवळ बसवून अनेक उपदेश करत. ते दोघेच असतांना त्यांची आपापसांत खूप चर्चा होत असे. श्री रामकृष्ण त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कार्याचा भार नरेंद्रनाथांवर सोपवणार होते. एके दिवशी श्री रामकृष्णांनी एका कागदाच्या कपट्यावर लिहिले, `नरेंद्र लोकशिक्षणाचे कार्य करील.’ काहीसे आढेवेढे घेत नरेंद्रनाथ त्यांना म्हणाले, “हे"हे सारे माझ्याने होणार नाही.” श्री" रामकृष्ण त्यांना लगेच दृढपणे म्हणाले, “काय ? होणार नाही ? अरे तुझी हाडं हे काम करतील.” पुढे श्री रामकृष्णांनी नरेंद्रनाथांना संन्यासदीक्षा देऊन त्यांचे नामकरण `स्वामी विवेकानंद’ असे केले.{{संदर्भ हवा}}
नरेंद्राच्या घरी लहानाचे मोठे झालेले त्यांचे नातेवाईक डॉ. रामचंद्र दत्त हे रामकृष्णांचे भक्‍त होते. धर्मभावनेने प्रेरित होऊन नरेंद्राच्या मनात लहानपणीच तीव्र वैराग्य उत्पन्न झालेले पाहून डॉ. दत्त एकदा त्यांना म्हणाले, “भाई, धर्मलाभ हेच जर तुझ्या जीवनाचे उद्दिष्ट असेल, तर तू ब्राह्मोसमाज वगैरेंच्या भानगडीत पडू नकोस.
तू दक्षिणेश्‍वरीला श्रीरामकृष्णांकडे जा.” एके दिवशी त्यांचे शेजारी श्री. सुरेंद्रनाथ यांच्याकडेच श्री रामकृष्ण परमहंसांचे त्यांना दर्शन झाले. सुरुवातीचे काही दिवस श्री रामकृष्ण नरेंद्रनाथांना आपल्यापासून क्षणभरही दूर ठेवू इच्छित नसत. त्यांना जवळ बसवून अनेक उपदेश करत. ते दोघेच असतांना त्यांची आपापसांत खूप चर्चा होत असे. श्री रामकृष्ण त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कार्याचा भार नरेंद्रनाथांवर सोपवणार होते. एके दिवशी श्री रामकृष्णांनी एका कागदाच्या कपट्यावर लिहिले, `नरेंद्र लोकशिक्षणाचे कार्य करील.’ काहीसे आढेवेढे घेत नरेंद्रनाथ त्यांना म्हणाले, “हे सारे माझ्याने होणार नाही.” श्री रामकृष्ण त्यांना लगेच दृढपणे म्हणाले, “काय ? होणार नाही ? अरे तुझी हाडं हे काम करतील.” पुढे श्री रामकृष्णांनी नरेंद्रनाथांना संन्यासदीक्षा देऊन त्यांचे नामकरण `स्वामी विवेकानंद’ असे केले.
 
==धर्मप्रसाराच्या कार्याला सुरुवात==
रामकृष्ण मठाची स्थापना श्री रामकृष्णांच्या महासमाधीनंतर स्वामी विवेकानंदांनी आपले एक गुरुबंधू तारकनाथ यांच्या मदतीने कोलकात्याजवळील वराहनगर या भागात एक पडक्या इमारतीत मठाची स्थापना केली. तत्पूर्वी त्या जागेत भुतांचा वावर आहे, असा लोकप्रवाद होता. विवेकानंदांनी श्रीरामकृष्णांनीरामकृष्णांनी वापरलेल्या वस्तू आणि त्यांच्या भस्मास्थींचा कलश त्या ठिकाणी नेऊन ठेवला आणि त्यांचे भक्‍त तेथे राहू लागले.{{संदर्भ हवा}}
 
== ‘विवेकानंद’ नामकरण ==
राजा अजितसिंग खेत्री यांनी १० मे १८९३ रोजी एका बोटीवर स्वामीजींना 'विवेकानंद' असे नाव दिले.{{संदर्भ ते म्हणाले आपण जो धर्माचा विचार सांगता तो खूप विवेकनिष्ठ आहे.हवा}}
 
==[[कन्याकुमारी]]==
श्री रामकृष्ण यांच्या समाधीनंतर स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करण्यास बाहेर पडले. अखेरीस ते कन्याकुमारी या भारताच्या दक्षिण टोकाला जाऊन पोहोचले. तेव्हा त्यांनी समुद्रात उडी मारली आणि शिलाखंडावर जाऊन ध्यानात बसले . त्यावेळी भारतातील दैन्य पाहून त्यांचे कासावीस झालेले मन अधिकच हळवे झाले. भारताच्या कल्याणासाठी, येथील जनतेच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित करणे आणि त्यासाठी या मातृभूमीचा सेवक बनून झटणे असा दृढ संकल्प स्वामीजींनी केला. [[अद्वैत वेदान्त]] विचार जगभरात पोचविणे आणि माणसातील सुप्त मनुष्यत्व जागे करणे यासाठी त्यांनी भारताच्या सीमा ओलांडून पाश्चिमात्य जगात जाण्याचेही ठरविले.<ref>मुजुमदार सत्येंद्रनाथ, स्वामी विवेकानंद यांचे चरित्र, रामकृष्ण मठ नागपूर प्रकाशन आवृत्ती अकरावी, सन २००० </ref>
 
== शिकागोतील सर्वधर्मपरिषद ==
[[चित्र:Swami Vivekananda at Parliament of Religions.jpg|इवलेसे|उजवे|सर्वधर्मपरिषदेतील विवेकानंद]]
[[सप्टेंबर ११]], [[इ.स. १८९३|१८९३]] साली [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] [[शिकागो]] शहरातील शिकागो - आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती. त्या सभेला विवेकानंद गेले. तेथे त्यांनी "अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो" अशी भाषणास सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सुमारे सात हजार लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, जो दोन मिनिटे अखंड चालू होता. "जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने, मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो" या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू केले. ह्या परिषदेत विवेकानंदांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना, वेदान्तावर व [[भारत|भारतीय]] [[संस्कृती]]वर व्याख्यान दिले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी फारच सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. आपल्या अल्पशा व्याख्यानात जणू त्यांनी विश्वधर्म परिषदेचे प्राणतत्त्वच विशद केले. काही दिवसांतच आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांचे लक्ष वेधून घेतले. या वृत्तपत्रांनी स्वामींचे वर्णन 'भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी' असे केले. 'न्यूयॉर्क क्रिटिक'ने त्यांच्याबद्दल लिहिले आहे की "ते दैवी वक्तृत्वाचे धनी तर आहेतच परंतु त्यांचे धीरगंभीर उद्‌गार देखील त्यांच्या काषाय वस्त्रात शोभून दिसणाऱ्या तेजस्वी मुखमंडलाहून काही कमी आकर्षक नाहीत." [[वेदान्त]] आणि [[योग]] या विषयावर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये जाहीर तसेच खाजगी व्याख्याने दिली. अमेरिका आणि इंग्लंड देशांमध्ये त्यांनी वेदान्त सोसायटी स्थापली.{{संदर्भ हवा}}
 
== [[समाधी]] ==
शुक्रवार, [[जुलै ४]], [[इ.स. १९०२|१९०२]] ह्या दिवशी त्यांनी [[कोलकाता|कोलकात्याजवळील]] [[बेलूर मठ|बेलूर मठात]] समाधी घेतली. समाधी घेण्याच्या दिवशी त्यांनी पहाटे बेलूर मठात परिव्राजकांना शुक्ल यजुर्वेदाचा पाठ शिकवला. आणि स्वामी प्रेमानंद या गुरुबंधूंसमवेत काही काळ फिरत असता त्यांना रामकृष्ण मठाच्या भविष्यासंबंधात काही सूचना केल्या. ध्यान करत असतांना रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली आणि चाळीस वर्षापर्यंत आपण जगू ही स्वतःची भविष्यवाणी खरी केली. [[कन्याकुमारी]] येथे समुद्रात काही अंतरावर त्यांचे [[विवेकानंद स्मारक]] [http://www.vivekanandakendra.org/ विवेकानंद केंद्र] या संस्थेच्या पुढाकाराने उभे राहिले आहे आहे.{{संदर्भ हवा}}
 
== तत्त्वविचार आणि शिकवण ==
[[चित्र:Ramakrishna.jpg|इवलेसे|उजवे|गुरु रामकृष्ण परमहंस]]
स्वामीजीस्वामी हे हिंदू तत्त्वज्ञानाच्या 'वेदान्त' शाखेचे पुरस्कर्ते होते. [[आद्य शंकराचार्य]] यांच्या विचारांना पुढे नेत त्यांनी हे तत्त्वज्ञान प्रतिपादित केले.{{संदर्भ हवा}}
* त्यांच्या मते सर्व प्राणिमात्र शिवाचे अंश आहेत, त्यामुळेच 'शिवभावे जीवसेवा' हे रामकृष्ण यांचे वचन त्यांनी शिरोधार्य मानले.
* प्रत्येक जीव हा मूळ रूपातच ईश्वरी/दैवी आहे.
Line १०८ ⟶ १०७:
 
==भक्तियोग==
भक्तियोग म्हणजे खर्‍या, अकृत्रिम भावाने भगवंताचे अनुसंधान. ह्या अनुसंधानाची उत्पती प्रेमातून, प्रेमानेच त्याचा परिपोष आणि त्याची परिसमाप्तीही प्रेमातच. अत्युत्कट भगवत प्रेमाचा क्षणभराचा दिव्योन्मादही आपल्याला कायमचे मुक्त करू शकतो.{{संदर्भ हवा}}
 
==शिक्षण संदर्भातील विचार==
[[शिक्षण]] म्हणजे एखाद्याच्या अंगी अगोदरपासून असलेल्या पूर्णत्वाचा आविष्कार होय. विधार्थी जर शाळेत येत नसेल तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे गेले पाहिजे.{{संदर्भ हवा}}
== प्रकाशित चरित्रे==
विवेकानंदांचे चरित्र सर्वप्रथम इ.स. १८९८ साली, विवेकानंदांच्या हयातीत प्रकाशित झाले. ते चरित्र मराठीत होते. याशिवायची चरित्रे :-
Line १४१ ⟶ १४०:
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
 
==बाह्य दुवे==
{{commons|Swami Vivekananda|स्वामी विवेकानंद}}
ओळ १४८:
{{हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय}}
 
[[वर्ग:हिंदू आध्यात्मिक गुरू]]
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:हिंदू आचार्य]]
[[वर्ग:भारतीय तत्त्वज्ञ]]
[[वर्ग:हिंदू आध्यात्मिक गुरू]]
[[वर्ग:इ.स. १८६३ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९०२ मधील मृत्यू]]
[[वर्ग:हिंदू धर्म]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]