बीजांडकोशातून उदरगुहेत मुक्त झालेले बीजांड बीजांडवाहिनी ग्रहण करते आणि तिच्या गर्भाशयाच्या तोंडाकडे वाहून नेते. बीजांडवाहिनीचीबीजांडवाहिनीच्या आतील बाजू श्लेश्मकलेने युक्त असते.बाजूवरील श्लेष्मकलेवरील पक्षाभिकेमुळे आणि बीजांडवाहिनीच्या आकुंचनामुळे बीजांड वाहून नेले जाते. योग्य वेळी शुक्रजंतू उपलब्ध झाल्यास बीजांडाचे बीजांडवाहिनीतच फलन होते. फलित किंवा फलन न झालेले बीजांड शेवटी गर्भाशयात जाते. फलित बीजांडाचे गर्भाशयात रोपण होते. फलन न झालेले बीजांड मासिक स्रावाबरोबर शरीराबाहेर टाकले जाते.