'''माझे सत्याचे प्रयोग''' ही [[महात्मा गांधी|महात्मा गांधींची]] आत्मकथा आहे.<br />
गांधीजींनी जीवनभर कशी वाटचाल केली ह्याचा मागोवा या पुस्तकामध्ये घेतला आहे.<br />
हे पुस्तक [[मराठी]], [[हिंदी]], [[गुजराती]] व इंग्रजीमध्ये[[इंग्रजी]]मध्ये उपलब्ध आहे तसेच जगभरातील अनेक भाषांमध्ये त्यांचे अनुवाद झालेले आहेत.
<br />या पुस्तकात लहानपणापासून १९२१ पर्यंतचे गांधीजींचे आयुष्य रेखाटले गेले आहे. दर आठवड्याला थोडे थोडे याप्रमाणे हे पुस्तक लिहिले गेले आणि १९२५ ते १९२९ या काळात ते त्यांच्या नवजीवन या नियतकालिकात प्रसिद्ध केले गेले. 'यंग इंडिया' मध्ये त्याचे इंग्रजी भाषांतर छापले जायचे. स्वामी आनंद यांनी या प्रकल्पाला चालना दिली आणि गांधीजींच्या इतर सहकाऱ्यांनी त्यांच्या सार्वजनिक लढायांची पार्श्वभूमी कळावी म्हणून हे प्रसिद्ध करावे असे त्यांना भरीस घातले. जागतिक अध्यात्मिक व धार्मिक अधिकआरअधिकार असलेल्या तज्ञांच्या समितीने, १९९९ मध्ये '१०० अध्यात्मिक पुस्तकातील एक' असा या पुस्तकाचा गौरव केला.
हा भाग महादेव देसाई यांनी लिहिला आहे. त्यांनी १९४० मध्ये या पुस्तकाचे गुजरातीमधून इंग्रजीत भाषांतर केले. या प्रस्तावनेत देसाई म्हणतात की मुळात हे पुस्तक नदोन भागात लिहिले गेले होते, पहिला गभाग १९२७ मध्ये आणि दुसरा १९२९ मध्ये! ते हाहीअसाही उल्लेख करतात की मूळ पुस्तकाची किमात रु.१ होती आणि ही प्रस्तावना लिहीपर्यंत पाच आवृत्तींचे प्रकाशन झाले होते. गुजरातीमधील ५०००० पुस्तकांची विक्री झाली होती परंतु इंग्रजी पुस्तक महाग असल्याने लोक विकत घेत नव्हते. इंग्रजी पुस्तक स्वस्तात उपलब्ध करून दिले पाहिजे असे देसाई म्हणतात. ते हाही उल्लेख करतात की एका इंग्रज विद्वानाने संपूर्ण भाषांतराचे संस्करण केले आहे परंतु त्यांना नामोल्लेख नको आहेहोता. पाचव्या भागातील प्रकरण २९-४० चे भाषांतर देसाई यांचे सुहृद प्यारेलाल यांनी केले आहे.
==प्रस्तावना==
या पुस्तकाची प्रस्तावना खुद्द गांधीजी यांनी लिहिली आहे आणि यात उल्लेख केलं आहे की कसे येरवडा कारागृहातील सह-कैदीजेरमदासकैदी जेरमदास यांच्या आग्रहामुळे त्यांनी परत अथ्म्चारीत्रआत्मचरीत्र लिहायला सुरुवात केली. त्यांचं एक मित्र त्यांना म्हणलं होता की आत्मचरित्र लिहिणे ही पाश्चात्य लोकांची खासियत आहे. पूर्वेकडे कोणी असे करत नाही. गांधीजी स्वतःच कबूल करतात की पुढे मागे त्यांचे विचार बदलू शकतात पण ही गोष्ट सांगण्यामागचा त्यांचं एकमेव उद्देश आहे सत्याचे प्रयोग लोकांना सांगणे. ते असेही म्हणतात की या पुस्तकात त्यांना राजकीय प्रयोगांविषयी न लिहिता आध्यात्मिक आणि मूल्यविषयक प्रयोगांबद्दल लिहायची इच्छा आहे.