"जगन्नाथ भगवान शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. |
||
ओळ ९:
संदर्भ
मार्शल लॉ आणि सोलापूरचे चार हुतात्मे-प्रा.डॉ. निलकंठ पुंडे
मिठाचा सत्याग्रह सुरु झाल्यापासून शहरात दररोज सभा होत असत. या सभामधून काही वक्ते भडक भाषणे देत असत. याचा परिणाम हिंसाचारात होईल असे शिंदे यांना वाटत असे. त्यासाठी गिरण्या बंद पाडू नका, हुल्लडबाजी करू नका असे आवाहन त्यांनी सभामधून केले होते.१९३० सालच्या ८ मे ला जमनालाल बजाज आणि वीर नरीमन यांना अटक केल्याची बातमी सोलापुरात येऊन थडकली. त्यावेळी युवक संघाने महामिरवणूक काढली. त्यात जगन्नाथ शिंदे कवी कुंजविहारी तुळशीदास जाधव मल्लप्पा धनशेट्टी शेठ गुलाबचंद सहभागी झालेले होते. त्यादिवशी निघालेल्या मिरवणुका शांततेत पार पडल्या. परंतु जमावातील काही लोक आणि गिरणीतील मजूर शिदिंची झाडे तोडण्यासाठी रुपाभवाणी मंदिर परिसराकडे गेले, त्यावेळी हिंसाचार आणि गोळीबार झाला. परंतु त्या हिसाचारात शिंदे याचा अजिबात सहभाग नव्हता. कारण मिरवणुकीनंतर ते घरी गेले होते. परंतु सरकारच्या रोषाला ते बळी पडले.
अशा झुजार कामगार नेत्याला आणि प्रखर वक्त्याला केवळ देशप्रेम हाच अपराध मानून वयाच्या २५ व्या वर्षी फासावर लटकवून तरुणाच्या मनात दहशत बसविण्याचा प्रयत्न ब्रिटीश अधिकाऱ्यांनी केला होता.
संदर्भ
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सोलापूरचे दीपस्तंभ- प्रा.डॉ. श्रीकांत येळेगावकर
|