"जन गण मन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अविश्वकोशीय मजकूर काढून टाकला
शुद्धलेखन दुरुस्ती
ओळ ३०:
या कवितेच्या भारताचे राष्ट्रगीत होण्याच्या योग्यतेबद्दल वाद आहे. ही कविता प्रथम [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या]] १९११ मधील अधिवेशनात म्हटली गेली होती. रवींद्रनाथ टागोर यांनी हे भारताच्या भविष्याचे जयगीत म्हणून लिहिले होते. पुढच्याच दिवशी [[जॉर्ज पाचवा, इंग्लंड|जॉर्ज पाचवा]] याचे स्वागत करण्यात आले. त्यामुळे असा समज पसरला की ते राजाला उद्देशून लिहिले आहे. पण टागोरांनी ही कविता देवाला उद्देशून लिहिली आहे असे म्हटले जाते.
बंगालची फाळणी रद्द केल्याबद्दल पंचम जॉर्ज यांचे अभिनंदन करण्यासाठी स्वागतगीत लिहावे, अशी सूचना प्रद्युत कुमार ठाकूर यांनी [[रवींद्रनाथ टागोर]] (ठाकूर) यांना केली होती. परंतु त्याची प्रचंड चीड येऊन टागोर यांनी २६ डिसेंबर रोजी गीत लिहिले ते ‘जन गण मन.’ २७ डिसेंबर १९११ रोजी टागोर यांनी स्वत: चाल लावलेले ‘जन गण मन’ काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात गायले.
==गीताचा अश्याआशय==
या गीतात भारत देश सुजलाम् सुफलाम् आहे, भारतभूमी किती संपन्न आहे, त्यात वास्तव्य करणार्‍या नागरिकांचे औदार्य यासह अनेक गुण व वैभव शब्दबद्ध करण्यात आले आहेत. सर्व जाती, संप्रदाय व पंथ यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या गीताच्या माध्यमातून त्यांनी सर्व शक्तिमान श्री परमेश्‍वराला भारताच्या कल्याणासाठी मागणे मागितले आहे.
 
==राष्ट्रगीत म्हणून मान्यता==
घटना समितीने २४ जानेवारी १९५0 मध्ये देशाचे अधिकृत राष्ट्रगीत म्हणून ‘जन गन मन’चा स्वीकार केला. या गीताची पाच कडवी असून केवळ पहिलेच कडवे भारतात म्हटले जाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/जन_गण_मन" पासून हुडकले