"मंगल पांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
विभाग पुनर्रचना
नवीन संदर्भ जोडले
ओळ २८:
 
==बालपण आणि शिक्षण==
मंगल पांडे यांचा जन्म उत्तर प्रदेशातील [[बालिया|फैजाबाद]] जिल्ह्यातील [[नगवा]] या गावात १९ जुलै १८२७ रोजी एका ब्राम्हण परिवारात झाला.<ref>{{cite web |url=http://www.britannica.com/EBchecked/topic/1978989/Mangal-Pandey |title=Mangal Pandey: Indian soldier |first=Shanthie Mariet |last=D'Souza |work=Encyclopædia Britannica|language=इंग्लिश}}</ref><ref name="Mangal Pandey 2005">''Mangal Pandey: True Story of an Indian Revolutionary'', 2005, Rupa & Co. Mumbai</ref> त्यांना लहानपणापासूनच धाडसी कृत्यांची आवड होती. नेमबाजी, तलवारयुध्द इत्यादी कलांमध्ये ते पारंगत होते. मंगल पांडे त्याचबरोबर आपल्या [[हिंदू]] धर्माबद्दल अत्यंत संवेदनशील आणि अभिमानी होते. १८४९ मध्ये ते बंगाल सैन्यात सामील झाले. मार्च १८५७ मध्ये पांडे ३४व्या बंगाल नेटिव्ह इन्फंट्री (बी.एन.आय.) च्या ५ व्या कंपनीत एक सैनिक म्हणून काम करीत होते.
 
==१८५७ ची घटना ==
==कारकीर्द==
ज्या वेळी १८४९ साली, त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात नोकरीस सुरुवात केली, त्यावेळी ते २२ वर्षाचे होते. पांडे हे बराकपूर सैन्यदलामधील बंगालच्या ३४व्या बी. एन. आय तुकडीच्या ५व्या कंपनीत काम करत होते. कोलकात्याजवळील [[बराकपूर]] येथील १९ व्या पलटणीला दिलेली काडतुसे [[गाय]] वा [[डुक्कर]] यांची चरबी लावलेली आहेत असा समज सैन्यात पसरला होता. ही काडतुसे बंदुकीत भरण्यापूर्वी त्यांना लावलेले आवरण दातांनी तोडावे लागे. अशा वेळी या आवरणाला लावलेली गाईची वा डुकराची चरबी तोंडात जाऊ शकेल या भीतीने या पलटणीतील शिपायांनी ती काडतुसे स्वीकारण्याचे नाकारले. इतकेच नव्हे, तर प्रतिकारार्थ त्यांनी शस्त्र उपसले. त्या दिवशी ब्रिटिश अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने ब्रिटिशांनी तो अपमान मुकाट्याने गिळला. त्यांनी [[ब्रह्मदेश]] (म्यानमार)हून गोर्‍या सैनिकांची कुमक मागवून या पलटणीला निःशस्त्र करून अपमानित अवस्थेत हाकलून द्यायचे ठरवले. याची अंमलबजावणी बराकपूरला करण्याचे ठरले. या अपमानास्पद कारवाईमुळे मंगल पांडेने आपल्या सहकाऱ्यांना ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन केले. त्याला पकडण्यासाठी आज्ञा सोडणाऱ्या सार्जंट मेजर ह्यू सनवर त्याने गोळया झाडल्या आणि बॉ नावाच्या अधिकाऱ्यावर तलवारीने वार केला.
 
३१ मे रोजी एकदम सर्वत्र क्रांतियुद्धाला प्रारंभ करण्याची [[धोंडोपंत बाजीराव पेशवे|श्रीमंत नानासाहेब पेशवे]] आदींची योजना होती. मात्र १९ व्या पलटणीतील स्वदेशबंधूंचा आपल्यादेखत अपमान व्हावा, ही गोष्ट मंगल पांडे यांना आवडली नाही. [[मार्च २९]], [[इ.स. १८५७|१८५७]] रोजी कवायतीच्या मैदानावर मंगल पांडे [[बराकपूर छावणी|बराकपूर छावणीत]] ब्रिटिश करत असलेल्या अन्यायाविरुद्ध देशी सैनिकांना उत्तेजित करू लागले. `"मर्दहो, उठा !'" अशी गर्जना करून ते सैनिकांना म्हणाले, ``"आता माघार घेऊ नका. बंधूंनो, चला तुटून पडा ! तुम्हाला तुमच्या धर्माची शपथ आहे !! चला, आपल्या स्वातंत्र्यासाठी शत्रूचा निःपात करा !!!"
 
हे पहाताच सार्जंट मेजर ह्यूसन याने त्यांना पकडण्याची आज्ञा केली; पण एकही सैनिक जागचा हालला नाही. उलट मंगल पांडे यांची गोळी लागून ह्यूसन जखमी झाला. हे पहाताच लेफ्टनंट बॉ घोडा नाचवत मंगलवर चाल करून आला. एवढ्यात मंगलच्या बंदुकीतून सुटलेली गोळी घोड्याच्या पोटात शिरली. घोडा लेफ्टनंटसह भूमीवर आडवा झाला. मंगल पांडे यांना पुन्हा बंदुकीत गोळया भरायचा अवसर मिळण्याआधीच लेफ्टनंट बॉ आपले पिस्तुल काढून उभा राहिला. मंगल पांडे यांनी तिळमात्रही न डगमगता आपली तलवार उपसली. बॉने पिस्तुल झाडले; पण मंगल पांडे यांनी त्याचा नेम चुकवला. आपल्या तलवारीने मंगल पांडे यांनी त्यालाही लोळवले. ह्यूसन व बॉ आपल्या निवासस्थानांकडे पळून गेले.
ओळ ४२:
 
==स्मारके==
भारत सरकारने ५ ऑक्टोबर १९८४ रोजी पांडेंची प्रतिमा असलेली टपाल तिकिटे जारी करून त्यांचा सन्मान केला. तिकीट व प्रथम-दिवसांचे कव्हर दिल्लीचे कलाकार सी. आर. पाखराशी यांनी तयार केला होता.<ref>{{cite web |url=http://www.indianpost.com/viewstamp.php/Alpha/M/MANGAL%20PANDEY |title=Mangal Pandey |publisher=India Post |accessdate=2017-04-10|language=इंग्लिश}}</ref>
 
पांडे यांनी ब्रिटीश अधिका-यांवर हल्ला केला आणि नंतर फाशी देण्यात आली त्या जागेवर ''शहीद मंगल पांडे महा उद्यान'' नावाच्या एका पार्कची उभारणी [[बराकपूर]] येथे करण्यात आली आहे.<ref name="kmcgov.in">[https://www.kmcgov.in/KMCPortal/jsp/KMCAmusementPark.jsp#a12 Mangal Pandey Park, Amusement Parks / Auditoriums / Clubs], kmcgov.in</ref>
 
==प्रेरित चित्रपट==
आमीर खानचा ''मंगल पांडे: द राइजिंग'' हा चित्रपट २००५ मध्ये प्रदर्शित झाला. केतन मेहतांनी दिग्दर्शित केलेल्या ह्या चित्रपटात अमीर खान, राणी मुखर्जी या कलाकारांनी मुख्य पात्रांची भूमिका पार पाडली.<ref>{{IMDb title|0346457|Mangal Pandey: The Rising}}</ref>
 
पांडेचे जीवन ''द रोटी रिबेलियन'' या सुप्रिया करुणाकरन लिखित आणि दिग्दर्शित नाटकाचा विषय होता. हे नाटक स्पर्ष या थिएटर ग्रुपने आयोजित केले होते आणि जून २००५ मध्ये हैदराबादमधील आंध्र सरस्वती परिषदेच्या द मुव्हिंग थिएटरमध्ये मध्ये सादर केले होते.<ref>{{cite news |url=http://www.hindu.com/mp/2005/06/08/stories/2005060800760400.htm|work=The Hindu |title=Review of ''The Roti Rebellion''|date=8 June 2005|language=इंग्रजीइंग्लिश}}</ref>
 
==हे हि पहा==
* [[क्रांतिकारक]]
* [[१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध]]
* [[मोहन भंडारी]]
* [[मालती पांडे]]
* [[शिवछत्रपती पुरस्कार]]
 
== संदर्भ आणि नोंदी ==
Line ६६ ⟶ ६७:
{{DEFAULTSORT:पांडे,मंगल}}
[[वर्ग:भारतीय क्रांतिकारक]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढा]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
[[वर्ग:इ.स. १८२७ मधील जन्म]]