"मंगल पांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Ullhas.kolhe (चर्चा | योगदान) फुटकळ दुरुस्ती |
Ullhas.kolhe (चर्चा | योगदान) संदर्भ जोडले खूणपताका: सुचालन साचे काढले |
||
ओळ २८:
==बालपण आणि शिक्षण==
मंगल पांडे यांचा जन्म उत्तर प्रदेशातील [[बालिया|फैजाबाद]] जिल्ह्यातील [[नगवा|दुगवा रहीमपुर]] या गावात १९ जुलै १८२७ रोजी एका ब्राम्हण परिवारात झाला.<ref>{{cite web |url=http://www.britannica.com/EBchecked/topic/1978989/Mangal-Pandey |title=Mangal Pandey: Indian soldier |first=Shanthie Mariet |last=D'Souza |work=Encyclopædia Britannica}}</ref><ref name="Mangal Pandey 2005">''Mangal Pandey: True Story of an Indian Revolutionary'', 2005, Rupa & Co. Mumbai</ref> त्यांना लहानपणापासूनच धाडसी कृत्यांची आवड होती. नेमबाजी, तलवारयुध्द इत्यादी कलांमध्ये ते पारंगत होते. मंगल पांडे त्याचबरोबर आपल्या [[हिंदू]] धर्माबद्दल अत्यंत संवेदनशील आणि अभिमानी होते. १८४९ मध्ये ते बंगाल सैन्यात सामील झाले. मार्च १८५७ मध्ये पांडे ३४व्या बंगाल नेटिव्ह इन्फंट्री (बी.एन.आय.) च्या ५ व्या कंपनीत एक सैनिक म्हणून काम करीत होते.
==कारकीर्द==
ओळ ३५:
३१ मे रोजी एकदम सर्वत्र क्रांतियुद्धाला प्रारंभ करण्याची [[धोंडोपंत बाजीराव पेशवे|श्रीमंत नानासाहेब पेशवे]] आदींची योजना होती. मात्र १९ व्या पलटणीतील स्वदेशबंधूंचा आपल्यादेखत अपमान व्हावा, ही गोष्ट मंगल पांडे यांना आवडली नाही. [[मार्च २९]], [[इ.स. १८५७|१८५७]] रोजी कवायतीच्या मैदानावर मंगल पांडे [[बराकपूर छावणी|बराकपूर छावणीत]] ब्रिटिश करत असलेल्या अन्यायाविरुद्ध देशी सैनिकांना उत्तेजित करू लागले. `मर्दहो, उठा !' अशी गर्जना करून ते सैनिकांना म्हणाले, ``आता माघार घेऊ नका. बंधूंनो, चला तुटून पडा ! तुम्हाला तुमच्या धर्माची शपथ आहे !! चला, आपल्या स्वातंत्र्यासाठी शत्रूचा निःपात करा !!!
एवढ्यात शेख पालटू नावाचा मुसलमान शिपाई मंगलच्या दिशेने जाऊ लागला. तो आपल्या पलटणीतील असल्यामुळे आपल्याला मदत करायला येत असावा, असे मंगल पांडे यांना वाटले; पण तसे घडले नाही. शेख पालटूने मंगल पांडे यांना पाठीमागून विळखा घातला. पांडे यांनी त्याचा विळखा सोडवला. देशी शिपाईही शेखच्या रोखाने दगड व जोडे फेकू लागले. जिवाच्या भीतीने शेख पालटू पळून गेला. थोड्याच वेळात कर्नल व्हीलर त्या स्थानी आला. त्याने सैनिकांना मंगल पांडे यांना पकडण्याची आज्ञा केली. कर्नल व्हीलरला सैनिकांनी निक्षून सांगितले, ``आम्ही या पवित्र ब्राह्मणाच्या केसालासुद्धा हात लावणार नाही''. हिंदुस्थानच्या भूमीवरून वाहाणारे गोर्या अधिकाऱ्यांचे रक्त आणि समोरचे धर्माभिमानी शिपाई पाहून कर्नल व्हीलर त्याच्या बंगल्याकडे पळून गेला. नंतर जनरल हिअर्स पुष्कळसे युरोपियन शिपाई घेऊन मंगल पांडे यांच्यावर चालून गेला. तोपर्यंत दुपार झाली होती. मंगल पांडे थकले होते. आपण फिरंग्यांच्या हातात सापडणार, हे पहाताच त्यांनी बंदूक आपल्या छातीकडे रोखली व स्वत:वर गोळी झाडून घेतली. मंगल पांडे धरणीवर कोसळले. त्यांची शुद्ध हरपली. नंतरच ब्रिटिश त्यांना पकडू शकले. {{संदर्भ हवा}} जखमी झालेल्या मंगल पांडे यांना सैनिकी रुग्णालयात नेण्यात आले. आठवडाभरातच त्यांच्यावर सैनिकी न्यायालयात अभियोग चालवण्यात आला. स्वधर्मावर प्राणापलीकडे निष्ठा ठेवणार्या या तरण्याबांड क्षात्रवीराला न्यायालयाने इतर कटवाल्यांची नावे विचारली; परंतु मंगल पांडे यांच्या मुखातून कोणाचेही नाव बाहेर पडले नाही. पांडे यांना सैनिक न्यायालयात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आपल्या देशबांधवांच्या अपमानासाठी स्वतःचे प्राण देणार्या या क्रांतीच्या अग्रदूताविषयी लोकांत इतकी विलक्षण श्रद्धा निर्माण झाली होती की, सार्या बराकपूरमध्ये त्यांना फाशी देण्यास एकही मांग मिळेना. शेवटी या घाणेरड्या कामासाठी कोलकात्याहून चार माणसे मागवण्यात आली. मंगल पांडे ज्या तुकडीचे सैनिक होते, तिच्या सुभेदाराला इंग्रजांनी ठार मारले. १९ आणि ३४ या दोन्ही पलटणी त्यांनी निःशस्त्र करून खालसा केल्या. याचा परिणाम उलटाच झाला. शिपायांना धाक वाटण्याऐवजी शेकडो शिपायांनी आपणहून गुलामीचे चिन्ह असलेले त्यांचे सैनिकी गणवेश फाडून टाकले.
|