"मिठाचा सत्याग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ १४:
 
== ओरिसातील मिठाचा सत्याग्रह ==
दांडी येथील मिठाच्या सत्याग्रहापूर्वीच [[ओरिसा|ओरिसात]] उत्पादित होणाऱ्या मिठावर ब्रिटिशांनी बसवलेल्या करामुळे तिथे १९२९ सालापासून आंदोलन सुरूच होते. तिथे मीठ तयार करण्यावर बंदी घालण्यात आल्यामुळे वातावरण तापलेले होते. गांधीजी दांडीला पोचण्यापूर्वीच ओरिसामधील लोकांनी मिठाचे उत्पादन सुरु ठेवण्याचा निर्धार केला.[[कटक]] येथे ओरिसाच्या वेगवेगळ्या भागातून स्वयंसेवक जमा झाले.मिठाच्या सात्याग्रहाबद्दल जाहीर सभा घेण्यात आल्या.या सभेत भाषणे करणाऱ्यांना ब्रिटिश सरकारने अटक करून तुरुंगात टाकले. ६ एप्रिलला [[गोपबंधू चौधरी]] आणि आचार्य हरिहर दास यांच्या नेतृत्वाखाली २१ सत्याग्रहींच्या तुकडीने स्वराज आश्रम, कटक येथून इंचुरी येथे मिठाच्या सत्याग्रह करण्यासाठी पायी जाण्यास सुरुवात केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://magazines.odisha.gov.in/Orissareview/2011/aug/engpdf/16-18.pdf|शीर्षक=|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=}}</ref> ९ एप्रिलला चांडोल येथे गोपबंधू चौधरी यांना अटक झाली.तरी यात्रा सुरूच राहिली.१३ एप्रिलला इंचुरी येथे पोचलेल्या हजारो सत्याग्रहींनी मूठभर मीठ हातात घेऊन कायदेभंग केला.सत्याग्रहींच्या तुकड्या मीठ हातात घेऊन कायदा मोडत.पोलिस त्यांना अटक करत.मग सत्याग्रहींची पुढची तुकडी पुढे येत असे.सर्व तुरुंग भरून गेले तरी आंदोलनात नवीन लोक सहभागी होतच होते. इंचुरीमधील सत्याग्रहात महिलांची संख्या लक्षणीय होती.काही निदर्शने महिलांनी आयोजित केली होती.शेवटी सर्व सत्याग्रहींची तुरुंगातून सुटका झाली, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी हजारो लोक जमले होते.<ref>{{जर्नल स्रोत|last=कर्वे|first=मीना(अनुवादक)|date=१५ ऑगस्ट २०१८|title=मीठ आणि महात्मा|url=http://www.sandarbhsociety.org/wp-content/uploads/2015/08/San76-Jun-Jul12.pdf|journal=शैक्षणिक संदर्भ|volume=|pages=५१,५२|via=}}</ref>
 
मिठाचा सत्याग्रह म्हणजे असहकार चळवळीचा एक भाग होता. प्रत्यक्षात मिठावरचा कर हे केवळ निमित्त होते. गांधींना त्या मिषाने लोकसंघटन आणि लोकजागृती साधायची होती.