"शतपत्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: रिकामी पाने टाळा मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ ५:
 
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढा]]
समाजात बदल घडवण्याचा, समाज सुधारण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणून लोकहितवादींनी लेखणी हातात घेतली आणि लहान-थोर सगळयांना हिताच्या गोष्टी सांगणारी तब्बल 108 पत्रे त्यांनी लिहिली. शंभर पत्रे या अर्थाने शतपत्रे म्हणून ही पत्रे प्रसिद्ध आहेत. विषयात वैविध्य तरी किती? इतिहास, राजकारण, अर्थशास्त्र, नवीन विद्या, परंपरा, धर्मकारण, जातिभेद, स्त्रीजीवन अशा कितीतरी विषयांवर ते सतत लिहीत राहिले. ‘प्रभाकर’ या त्यावेळच्या साप्ताहिकातून त्यांची शतपत्रे प्रसिद्ध झाली.
1882 साली त्यांनी स्वतःचे मासिक लोकहितवादी या नावाने चालू केले. या मासिकातून त्यांनी स्थानिक स्वराज्यव्यवस्था, ग्रामरचना, पृथ्वीराज चौहान, दयानंद स्वामी यांची चरित्रे अशी पुस्तके प्रसिद्ध केली. 1883 मधे त्यांनी ऐतिहासिक विषयांसाठी स्वतंत्र मासिक चालू केले आणि त्याचे नावही लोकहितवादी असेच होते. बापरे, किती लेखन केले लोकहितवादींनी? सातत्याने नवीन विषयांवर लिहित राहणे म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. बदलत्या काळाची पावले लोकहितवादींसारख्या धुरिणांनी ओळखली आणि त्यासंबंधी लेखन केले. पण गोपाळचे नाव लोकहितवादी कसे पडले? असा प्रश्न पडला असेल तुम्हाला. लोकांच्या चांगल्याचा, हिताचा विचार करणारे म्हणून त्यांनी स्वतःसाठी लोकहितवादी हे टोपणनाव घेतले आणि ते नाव सार्थही केले. स्वतःच्या कामाची त्यांना किती योग्य जाणीव होती तेच या नावातून दिसून येते.
‘प्रभाकर’ नावाच्या साप्ताहिकात महाराष्ट्रातील चळवळींची माहिती गोपाळरावांनी दिलेली आहे. 26 मार्च 1848 साली लिहिलेल्या तिसऱ्या पत्रात ते पुण्यात ग्रंथालय चालू व्हावे यासाठी कशा सभा घेतल्या गेल्या आणि इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या अभ्यासू लोकांनी त्याला कशी मान्यता दिली हे लिहिले आहे. याच पत्रात ते पुढे लिहितात की ‘पुण्यातील किती एक आळशी लोकास लायब्ररी काय, हे माहीत नाही. याच कारणामुळे सरदार आणि कामदार लोकांनी पैसा दिला नाही . तथापि अजमासे दीड हजार रुपये जमले आहेत.’ याच पत्रात लोकांना विद्या शिकण्याची कशी लाज वाटते, गरज वाटत नाही आणि पोटापुरते मिळण्यावरच ते कसे खूश आहेत याचे वर्णन त्यांनी केले आहे. वर्तमानपत्रांत लेख लिहून सामाजिक आणि राजकीय प्रश्नांविषयी लोकमत जागे करण्याचा गोपाळरावांनी आरंभ केला होता. पुढे त्यांच्या प्रेरणेने पुण्यातील पहिले दैनिक वर्तमानपत्र ज्ञानप्रकाश सुरू झाले. कदाचित त्यातील काही लिखाण हे लोकहितवादींचे असावे असे वाटते.
लोकहितवादी आणि त्या काळातल्या समाज सुधारकांनी समाजाच्या भविष्याचा विचार केला. भारतीय समाज, भारतीय माणसे जगात मागासलेली राहू नयेत. जगात जे नवीन, चांगले चालू आहे त्याच्या बरोबरीने भारतीय समाजाने गेले पाहिजे. या तळमळीने ते लिहित होते. त्याच पत्रात हे स्पष्ट करत असताना ते पुढे म्हणतात, ‘थोरपणा पाहिजे असेल त्यांनी सांप्रत काळच्या ज्ञानाची संपदा मिळवण्याचा प्रयत्न करावा. ज्या ज्ञानाने इतर लोकांनी आपली सरशी केली ते ज्ञान आपण धिक्कारू नये. कारण की, आपणांस त्याचा अनुभव आला आहे.याजकरिता सावधगिरीचे लक्षण हेच कीं, काळास ओळखून त्याप्रमाणे करावे, असे न केले तर फार फजित होऊन दुर्दशा झाली आहे, त्यापेक्षा अधिक होण्याचा संभव आहे.आता आपण अनेक देशांच्या कल्पना एके ठायी करून नवे शोध करून ते सुधारावें म्हणजे खरा थोरपणा मिळेल व लोकांचे हित होईल.’
लोकहितवादी सांगतात, ‘कोणास खोटें वाटेल तर त्याने स्वदेशीय राजधानीतील लोकांकडे पाहावे आणि त्यांस पुसावें की, इंग्रज हिंदुस्थानांत कोठे कोठे राज्य करतात ? ते म्हणतील की, छी, इंग्रज कोठे आहेत ? आमचे संस्थानांत तो एक ताम्रमुखी मात्र असतो. याप्रमाणे पेशवाईत अवस्था होती.’ पत्र क्र. 48 मधे ते लिहितात, ‘ब्राह्मणांना अजूनही वाटते की पृथ्वी शेषावर आहे, ग्रणांत राहू चंद्रास ग्रासतो, हिंदुस्थानाएवढीच पृथ्वी. पलिकडे गतीच नाही. (पत्र क्र. 62) कोणी म्हणतो पेशव्यांचे राज्य कसें बुडालें हो? दुसरा उत्तर करतो, अहो, ते अवतारी पुरुष होऊन गेले. जे होणार तें झालें. त्यास उपाय काय? सद्दी फिरली म्हणजे क्षण लागत नाही. देव देणार त्याला देतो. त्याचे मनात आले म्हणजे पाहिजे तसें घडतें.’ (पत्र क्र. 55) ‘ज्ञान म्हणजे काय हेंच लोकांस ठाऊक नाही. इंग्लंडांतील थोरली सनद, पार्लमेंट, फराशीस (फ्रान्स) यांची राज्यक्रांति, रूमचे राज्याचा नाश, अमेरिका खंडात युरोपियन लोकांची वस्ती, लोकसत्तात्मक राज्य, या शब्दांचा अर्थहि बहुत हिंदु मनुष्यास ठाऊक नसेल. पृथ्वीवर काय आहे व लोक कसे आहेत, याविषयी त्यांस कांही कळत नाही. पुराणिक एक पोथी सोडून बसला म्हणजे सर्व आनंदाने डोलतात व रावणास दहा डोकी, सहस्रार्जुनास हजार हात, दुधाचा समुद्र, दह्याचा समुद्र इ. गोष्टी ऐकल्या की बायका फार खुष होतात व पुरुष म्हणतात आम्ही आज फार मोठें ज्ञान संपादन केलें.’
बदलत्या काळाची पावले ओळखून लोकहितवादी आणि त्यांच्या बरोबरीच्या समाजसुधारकांनी इंग्रजांनी आणलेल्या नवीन ज्ञानाची, नवीन विषयांची माहिती करून घेण्याची गरज पुन्हा पुन्हा दाखवून दिली. त्यांना याची का गरज वाटत होती ? लोकहितवादींनी पहिल्या काही पत्रांतून त्यांनी त्याकाळातील लोकांच्या अज्ञानावर टीका केली आहे. आज आपल्याला ऐकताना विचित्र वाटेल की त्यांनी आपल्याच लोकांवर टीका केली. पण त्यांनी असे का केले असेल? याचा विचार करायला पाहिजे. हो ना. आपल्या लोकांचे काही चुकत असेल तर ते सांगून चुका सुधारायला मदत करणे हे निव्वळ स्तुती करत राहण्यापेक्षा कितीतरी महत्त्वाचे असते. अनेकवेळा जास्त आवश्यक पण असते. त्यावेळच्या समाजाचा कोणी तरी कान पकडायची गरज होतीच. मरगळलेल्या, निष्क्रिय झालेल्या समाजाला कोणी तरी हलवण्याची, मनात उभारी भरण्याची गरज होती. ती गरज लोकहितवादींसारख्या समाजसुधारकांनी पूर्ण केली. काय परिस्थिती होती तेव्हा भारतीय समाजाची?
भारतीय समाजात संस्कृत ही ज्ञानभाषा होती. प्राचीन काळी व्याकरण, वेदांत, ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्र, गणित अशा अनेक विषयांवरचे ग्रंथ संस्कृतात लिहिले गेले. त्या काळी संस्कृत ही ज्ञानवंतांची भाषा होती. तत्कालीन अभ्यासकांनी अतिशय बारकाईने केलेले निरीक्षण, विश्लेषण या ग्रंथातून परत परत दिसते. पण दुर्दैवाने काळाच्या ओघात इथे बाहेरच्यांची आक्रमणे होऊ लागली. त्या आक्रमणांमुळे कदाचित समाजाची घडीच बदलली. नवीन अभ्यास बंद झाला. नवीन विचार, नवीन संशोधन बंद झाले आणि संस्कृत विद्येला वाईट परिस्थिती आली. काळाप्रमाणे, बदलत्या परिस्थितीप्रमाणे नवीन ज्ञानशाखा, अभ्यासशाखा, विद्याशाखा विकसित होण्यासाठी समाजाला वेळ मिळाला नाही. पत्र क्र. 30 आणि 59 मधे लोकहितवादी म्हणतात, ‘धर्मशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ही सर्व प्राचीन काळी लिहिली गेली, आणि सांप्रत काळास फरक पडला आहे, त्यामुळे आज प्रत्यक्षांत व शास्त्रांत मेळ पडत नाही. प्रत्येक वेळी लोकस्थिती पाहून धर्मशास्त्रांत परिवर्तन केले पाहिजे. पण असे न झाल्यामुळे आमचे धर्मशास्त्र व त्याचबरोबर इतर शास्त्रे अगदी निरुपयोगी झाली आहेत.’ ‘संस्कृतात इतिहास नाही. भारतात राज्ये किती होतीं, कोणाची होती, तीं बुडाली केव्हा, कशामुळे बुडाली, मुसलमान केव्हा आले, पाश्चात्य केव्हा आले याविषयीं संस्कृत पंडितांचे ज्ञान, नांगरहाक्याइतके असते. ’
समाजातील लोकांची विचारांची पद्धत बदलणे हे सोपे नव्हते. लोकांच्या आपल्या पिढयानुपिढया चालत आलेल्या विचारांवर दृढ विश्वास होता. लोक कसा विचार करत होते हे दाखवून देताना पत्र क्र. 30 मध्ये लोकहितवादींनी लिहिले आहे, ‘हे शास्त्री, भट व संपूर्ण हिंदु लोक अजून मागल्या गोष्टींचे भरांत आहेत. त्यांस अजून सांप्रतचे काही सुचत नाही. त्यामुळे कित्येक लोक पोरासारखे बोलतातकी, विलायत बेट लहान दोनचार कोसांचे आहे. कोणी म्हणतो टोपकर हे पाण्यांतले राहणारे, कोणी म्हणतो कंपनी सरकार बायको आहे. इंग्रजांस राज्य करूं लागल्यास दोनशे वर्षे झाली आणि या लोकांच्या डोकीवरचे केश देखील त्यांनी मोजले. पण या लोकांस त्यांचे डोळेहि ठाऊक नाहीत.’
एकीकडे आजूबाजूला काय चालू आहे याची जाणीव अनेकांना नव्हती आणि दुसरीकडे विद्या, ज्ञान यासंबंधीच्या कल्पनाही जुन्या होत्या. अनेकदा संस्कृत विद्येचा नीट अर्थही माहीत नसायचा. केवळ पाठांतर करणे यालाच विद्या म्हणण्याची पद्धत पडली होती. विद्या या शब्दाचा असा अर्थ करावा याची लोकहितवादींना अगदी चीड यायची. ते 77व्या पत्रात यासंबंधी म्हणतात, ‘अहो, पाठ म्हणणें ही विद्या केली कोणी? यांत फळ काय? हा मूर्खपणा उत्पन्न कसा झाला असेल तो असो. परंतु एवढा मूर्खपणा कधी कोणत्याहि देशात झाला नसेल.’ लोकहितवादी म्हणत की, नुसते व्याकरण पाठ म्हणणे ही विद्या नव्हेच. त्यापेक्षा माणसाला लाकडे तोडण्याचे कौशल्य शिकवलेले बरे. कारण नुसते समजून न घेता पाठ केल्यामुळे काहीच फायदा होत नाही. उलट केवळ अज्ञान नव्हे तर विपरीत ज्ञान हे भारताच्या अधःपतनाचे पहिले कारण आहे असे त्यांना वाटत असे.
परदेशी आक्रमणांमुळे भारतातल्या अनेक भूभागातील राज्यव्यवस्था, कामाच्या पद्धती, अर्थव्यवस्था बदलू लागली. राजे-महाराज्यांचा जमान संपत चालला होता. त्यामुळे त्यांच्या पदरी काम करणाऱ्या अनेकांची नोकरी संपली. महाराष्ट्रात इ.स. 1818 च्या सुमारास दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या नामर्दपणामुळे पेशावाई बुडाली. त्यामुळे पूर्वीच्या सगळयाच व्यवस्था कोलमडू लागल्या. समाजात वेगळे वारे वाहू लागले. आगरकर याचे वर्णन करताना म्हणतात की, पूर्वीच्या हजार वर्षांच्या काळात भारताला सतत पाण्यात पडून राहिलेल्या लाकडाचे वा हाडकाचे, रूप प्राप्त झाले होते. त्याच्यात चैतन्य असे कसले राहिलेच नव्हते. पण पाश्चात्य विद्येमुळे नवी दृष्टी प्राप्त होताच हा समाज पुन्हा जिवंत होऊ लागला आणि नवभारताची निर्मिती झाली.
"https://mr.wikipedia.org/wiki/शतपत्रे" पासून हुडकले