"मारुती स्तोत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रताधिकार भंग
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
पुनर्लेखन
ओळ १:
'''मारुती स्तोत्र''' हे [[मारुती]] तथा हनुमान या हिंदू देवतेची स्तुती करणारे काव्य होय.
{{प्रताधिकारित मजकूर शंका
| कॉपीव्हायो-वृत्तांत=https://tools.wmflabs.org/copyvios?lang=mr&project=wikipedia&oldid=1398665&action=compare&url=http%3A%2F%2Fsajjangad.blogspot.com%2F2011%2F04%2F
|मजकूर = ==समर्थ रामदास लिखित स्तोत्रे==
[[समर्थ रामदास]] यांनी सुद्धा या देवतेबद्दल बरीच स्तोत्रं लिहिली. समर्थ रामदासांचे 'भीमरूपी महारुदा वज्रहनुमान मारुती' हे त्यांचे स्तोत्र लोकपरिचीत ठरले.
 
 
संमर्थांना हनुमंताचा फार आधार वाटत होता. कारण त्यांचे वडील सूर्याजीपंत, बंधू गंगाधरपंत आणि स्वत: समर्थ या तिघांना हनुमंताचे दर्शन झाले होते. लहानपणी समर्थांना रामांनी अनुग्रह दिला आणि येथून पुढे हनुमान तुम्हाला सांभाळेल असे सांगितले. म्हणून समर्थांना हनुमंताचा खूप आधार वाटत होता. हनुमंताचे समर्थांवर खूप उपकार होते. या उपकारांचे उतराई होण्यासाठी समर्थांनी हनुमंताची एकवीस स्तोत्रे लिहिली आहेत. या स्तोत्रांवरून असे स्पष्ट दिसते की समर्थांच्या मते हुनमान हा समाजाचा संरक्षणमंत्री आहे. एक राष्ट्रीय दैवत म्हणून समर्थ हनुमंताची प्रतिमा उभी करतात.
 
 
 
त्यांनी स्थापन केलेले अनेक मारुती या स्तोत्रातील वर्णनानुसार आहेत. 'पुच्छ ते मुडिर्ले माथा, किरीटी कुंडले बरी। सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकीणी नागरा।' असे मारुतीचे ध्यान आढळते. एका स्तोत्रात समर्थांनी बहे बोरगाव येथील हनुमंताची पौराणिक कथा दिली आहे. समर्थांनी हजारो मारुतीमंदिरे स्थापिली असली तरी सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील त्यांचे अकरा मारुती प्रसिद्ध आहेत. समर्थ रामदास लिखित एकवीस स्तोत्रांपैकी अकरा स्तोत्रे अकरा मारुतींची आहेत. कोणत्या हनुमंताचे वर्णन कोणत्या स्तोत्रात आहे हे सांगणे मात्र कठीण आहे. हनुमंताचे चरित्र सांगणे, त्याच्या पराक्रमाचे वर्णन करणे हा या स्तोत्रांपाठीमागचा प्रमुख हेतू दिसतो.
 
 
समर्थांची हनुमानभक्ती मात्र त्यांच्या वाङ्मयात पानोपानी प्रकट झाली आहे. लहानपणी सर्वच मुलांना हनुमंताचे आकर्षण असते. समर्थ लहानपणी आपल्या दंडाला हनुमंताचा ताईत बांधत असत. त्यांचा तो दंडातला मारुती आजही जांबेत पाहायला मिळतो.{{संदर्भ हवा}}. लहान मुलांना पराक्रमामुळे हनुमंत प्रिय असला तरी संत वाङ्मयात हनुमंताला स्थान आहे, ते त्याच्या दास्यभक्तीमुळे. भक्तश्रेष्ठ तुकाराम महाराजांसारखे संत हनुमंताला 'भक्तीच्या वाटा मला दाखव' अशी विनंती करतात. तेव्हा हनुमान हे भक्तीचे प्रतीक आहे. समर्थांनी हनुमंताचा उपयोग भक्ती आणि शक्ती यांच्या समन्वयासाठी केला.
 
समर्थांनी त्यांच्या या हनुमान स्तोत्र रचना अनुष्टुप छंद आणि मालिनी वृत्तात केल्या.
 
 
 
समर्थ लिहितात :
 
' स्वधामासी जाता महारामराजा। हनुमंत तो ठेविला याचि काजा।
 
सदासर्वदा रामदासासी पावे। खळे गांजिता ध्यान सांडोनी धावे।
 
याचा अर्थ रामाच्या ध्यानात मग्न असलेला हनुमान भक्तावर संकट आले म्हणजे ध्यान बाजूला ठेवतो आणि धावत जातो. समर्थांना तत्कालीन विपरीत परिस्थितीत हनुमंतानेच सांभाळले आहे. म्हणून ते म्हणतात...
 
तुजविण मज पाहे पाहतां कोण आहे।
 
म्हणउनि मन माझे रे तुझी वास पाहे।
 
मज तुज नीरवीले पाहिजे आठवीले।
 
सकळिक निजदासांलागी सांभाळविले।।
 
समर्थांची हनुमंताला ही विनवणी आहे की तुझ्या शक्तीचा एक अंश तू आम्हाला दे. हनुमंताकडे शक्तीचा प्रचंड साठा आहे. तेव्हा त्याने त्यातला थोडा वाटा आम्हाला द्यायला हरकत नाही, असाही शेरा ते मारतात. एवढेच नव्हे तर तू कंजुषपणा करू नकोस, जरा मनाचा मोठेपणा दाखव असे सांगतात. ही स्तोत्ररचना केली त्यावेळी समर्थांना कफाची व्यथा होती. या स्तोत्रपठणाने त्यांची कफाची व्यथा दूर झाली. म्हणून काही कफपीडित समर्थभक्त कफावरील उपाय म्हणून या स्तोत्राचा उपयोग करतात.
}}
 
 
या स्तोत्राची अनेक रुपे आहेत. त्यांपैकी [[समर्थ रामदास स्वामी|समर्थ रामदासांनी]] लिहिलेले स्तोत्र महाराष्ट्रात प्रचलित आहे. याची सुरुवात ''भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती'' या पंक्तीने होते.
 
{{विकिस्रोतातस्थानांतरीत}}
Line ५१ ⟶ १५:
 
[[वर्ग:स्तोत्रे]]
 
[[वर्ग:धार्मिक साहित्य]]