"राजेंद्र प्रसाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Ullhas.kolhe (चर्चा | योगदान) |
Ullhas.kolhe (चर्चा | योगदान) नवीन विभाग जोडला |
||
ओळ ४२:
===वकील===
१९१६ साली ते बिहार आणि ओडिशाच्या उच्च न्यायालयात दाखल झाले. नंतर १९१७ मध्ये सिनेट अँड सिंडीकेट ऑफ पटणा युनिव्हर्सिटीचे प्रथम सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. बिहारमधील रेशीमसाठी प्रसिध्द असलेल्या भागलपूर येथेही त्यांनी वकिली केली.
==स्वातंत्र्य चळवळीतील कार्य==
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसशी प्रसाद यांचा पहिला संपर्क १९०६ मध्ये कोलकाता येथे आयोजित एका वार्षिक सत्रात होता, जेथे कलकत्ता येथे शिकत असताना त्यांनी स्वयंसेवक म्हणून सहभाग घेतला. औपचारिकरीत्या, त्यांनी १९११ मध्ये जेव्हा कोलकाता येथे वार्षिक अधिवेशन पुन्हा आयोजित केल्या गेले तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९१६ साली आयोजित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लखनौ सत्रादरम्यान ते महात्मा गांधी यांची भेटले. चंपारण येथील एका शोधनिबंध कार्यादरम्यान, महात्मा गांधींनी प्रसाद यांना आपल्या स्वयंसेवकांसोबत येण्यास सांगितले. प्रसाद गांधीजींचे समर्पण, धैर्य व दृढ विश्वास बघून एवढे भारावून गेले कि त्यांनी १९२० मधील कॉंग्रेसची नॉन को-ऑपरेशन मोहीम जाहीर झाल्याबरोबर आपल्या वकिली कारकीर्दीला रामराम ठोकला व त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिले.
== संदर्भ आणि नोंदी ==
|