"ताश्कंद करार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ सुधारले
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
ओळ १:
'''ताश्कंद करार''', '''ताश्कंद डिक्लरेशन''' तथा '''ताश्कंद अ‍ॅग्रिमेंट''' हा शांतता करार [[भारत]] आणि [[पाकिस्तान]] यांच्यात [[ताश्कंद]] येथे [[१० जानेवारी]], [[इ.स. १९६६]] रोजी केला गेला. [[१९६५चे युद्ध|१९६५च्या भारत पाकिस्तान युद्धात]] पाकिस्तानचा सपशेल पराभव दिसत असताना पाकिस्तानने इतर देशांच्या मध्यस्थीने हा करार करण्याचा प्रस्ताव मांडला.
 
[[सोव्हिएत युनियन]]चे प्रमुख [[अलेक्सी कोसिजीन]] यांच्या मध्यस्थीने झालेल्या करारावर भारत सरकारच्या वतीने पंतप्रधान [[लालबहादूर शास्त्री]] यांनी, तर पाकिस्तानच्या वतीने पाकिस्तानचे अध्यक्ष [[अयुब खान]] यांनी सह्य़ा केल्या. [[भारताची फाळणी|१९४७ साली भारत-पाकिस्तान फाळणीनंतर]] या दोन देशांमध्ये चिघळलेल्या सीमावादाने १९६५ मध्ये परत एकदा डोके वर काढले. ऑगस्ट १९६५ मध्ये पाकिस्तानी लष्कराने [[ऑपरेशन जिब्राल्टर]] या नावाने मोहीम काढून [[जम्मू आणि काश्मीर]]च्या भारतीय प्रदेशात सन्य घुसवले. प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारनेही पाकिस्तानी लष्करावर हल्ला चढवला. ऑगस्ट आणि सप्टेंबर १९६५ मध्ये सतरा दिवस चाललेले हे युद्ध [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांची]] सुरक्षा परिषद, [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] आणि सोव्हियेत युनियन यांच्या प्रयत्नांनी २२ सप्टेंबर १९६५ रोजी युद्धबंदी करार होऊन थंडावले. दोन्ही बाजूंचे हजारो सनिक या युद्धात मारले गेले आणि [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धानंतर]] प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने रणगाडे आणि इतर शस्त्रास्त्रांचा वापर झालेले हे युद्ध होते असे म्हटले जाते. सतरा दिवस चाललेले हे युद्ध अनिर्णित अवस्थेतच थांबले. या युद्धानंतर भारत आणि सोव्हिएत युनियनचे राजनतिक संबंध अधिक जवळचे झाले, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आणि [[चीन]]मध्ये अधिक जवळीक झाली. ४ ते १० जानेवारी १९६६ मध्ये ताश्कंद येथे झालेल्या बैठकीत संयुक्त राष्ट्रे, अमेरिकी सरकारचे प्रतिनिधी आणि सोव्हिएत रशियन सरकारचे वरिष्ठ प्रतिनिधी शामिल होते. करारात ठरल्याप्रमाणे भारत आणि पाकिस्तानने या युद्धात परस्परांच्या घेतलेल्या प्रदेशांवरील हक्कसोडून १९४९ साली नक्की केलेल्या युद्धबंदी रेषेपर्यंत माघार घेतली. भारतावरील पाकिस्तानी आक्रमणामुळे ५ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर १९६५ पर्यंत झालेल्या युद्धाची समाप्ती या कराराने झाली. लालबहादूर शास्त्री व पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुबखान यांच्यामध्ये सोव्हिएट महामंत्री कोसिजिन यांच्या मध्यस्थीने ४ जानेवारी १९६६ पासून वाटाघाटी होऊन १० जानेवारीस नऊ कलमी करारावर उभय नेत्यांनी सह्या केल्या.ताश्कंदच्या या शांतता कराराची औपचारिकता पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशी भारताचे पंतप्रधान [[लालबहादूर शास्त्री]] यांना हृदयविकाराचे दोन झटके येऊन त्यांचे अकस्मात निधन झाले.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.loksatta.com/navneet-news/tashkent-pact-1370123/|titleशीर्षक=ताश्कंद करार|date=2016-12-26|work=Loksatta|access-date=2018-03-25|language=mr-IN}}</ref>
 
==या करारातील ठळक कलमे==