"आंबेडकरी चळवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
ओळ १९:
 
== सांस्कृतिक पैलू ==
शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशी मित्र या वृत्तपत्रातून १ मार्च १९०९ साली आवाहन केले की मुलींना देवदासी करू नये. ज्या मुरळ्या आहेत त्यांच्यासोबत लग्न करण्याची ज्यांची इच्छा/ तयारी असेल, त्यांना जात पंचायतीकडून परवानगी असावी, अशा लोकांनी सह्या करून आम्हास कळवावे. याबाबत सरकारने IPC ३७३ प्रमाणे १६ वर्षाच्या आतील मुलीला वेश्येचा धंदा किंवा कामासाठी विकेल किंवा तसा प्रयत्न केला तर त्यास १० वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा देण्यात येईल. असा कायदा झाला. १८ एप्रिल १९०९ मध्ये सोमवंशी मित्र पत्रव्यवहार करणाऱ्या शिवूबाई या मुरळीसोबत गणपतराव हनुमंतराव गायकवाड यांनी विवाह केला,  व याला सर्व अस्पृश्य समाजाने (महार, मंग, ढोर, चांभार) इ. मान्यता दिली. आंबेडकरी कार्यकर्त्यानी १३ जून १९३६ रोजी देवदासी, मुरळी जोगतीन यांची परळ मध्ये परिषद घेतली व सर्व शोषित वर्गाला आवाहन केले. बाळकृष्ण जानोजी देवरुखकर यांना अस्पृश्य स्त्रियांच्या दु:खाची चांगलीच जाणीव होती आणि समाजात अशा प्रकारची वागणूक मिळणाऱ्या अस्पृश्य स्त्रियांना समान वागणूक मिळावे असेही नमूद केले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=XH7JAAAACAAJ&dq=we+also+made+history+books&hl=en&sa=X&ved=0ahUKEwi0wIWJhqPcAhUHNI8KHfFEDrIQ6AEIKDAA|titleशीर्षक=We Also Made History: Women in the Ambedkarite Movement|last=Pawar|first=Urmilā|last2=Moon|first2=Meenakshi|date=2008|publisher=Zubaan|year=|isbn=9788189013127|location=|pages=92-102|language=en}}</ref>
 
== वैचारिक पैलू ==
ओळ २५:
 
== कलात्मक पैलू    ==
दलित ओळख, आत्मसन्मान आणि सत्तासंघर्ष याची सुरवात संगीत आणि गाण्यांमधून होणार्या सांस्कृतिक रुढींचा विरोध आणि उठाव यातून होताना दिसून येते. गाण्यांमधून व संगीतामधून निर्माण होणाऱ्या आठवणी आणि त्यात असणाऱ्या भावनांना जागृत करण्याची क्षमता हि दलित लढा सातत्याने सुरु ठेवण्या साठीचे शक्तीस्त्रोत ठरले आहे. आंबेडकरी जलसा हे त्याचे ठळक उदाहरण आहे. आंबेडकरी दलित रंगभूमी हि देखील दलित समजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्रचनेसाठी उत्प्रेरक ठरली आहे. याची सुरवात आंबेडकरी संमेलनातून होऊन टप्प्याटप्प्याने लोकनाट्य, पथनाट्य यातून प्रगत झाले. बी.एस.शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे एकतेची भावना निर्माण करणे हे दलित नाट्याचे प्रमुख उद्देश होय. याव्यतिरिक्त काही चित्रपटांमध्ये देखील आपल्याला जातीविषयक प्रश्नांची संवेदनशील मांडणी केलेली दिसून येते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.forwardpress.in/2017/08/dalit-theatre-and-ambedkar/|titleशीर्षक=Dalit Theatre and Ambedkar|date=2017-08-15|work=Forward Press|access-date=2018-07-16|language=en-US}}</ref> उदा.फॅन्ड्री, जैत रे जैत.{{संदर्भ हवा}}
 
==संदर्भ==