"महदंबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
कल्याणी कोतकर (चर्चा | योगदान) No edit summary |
कल्याणी कोतकर (चर्चा | योगदान) छो संदर्भ |
||
ओळ ५६:
==व्यतिगत माहिती==
महादाईसा यांचे जीवन विलक्षण होते. बालविधवा ते विद्वान संन्यासिनी, कवयित्री असा प्रवास तिने केला. महादाईसाचे घराणे तसे विव्दानांचेच होते. त्या काळातील रीतीप्रमाणे त्यांचे लग्न लहानवयातच झाले. परंतु पतीचे लवकर निधन झाल्याने वैधव्य आले. त्या वडिलांकडे परत आली. भक्तिमार्गाची परमार्थाची त्यांना ओढ होती. परमार्थाच्या ओढीने आपला चुलत भाऊ नागदेव याच्यावर त्यांनी दादोसचे शिष्यत्व प्रथम स्वीकारले. त्याच काळात श्री चक्रधर स्वामींनी महानुभव पंथाची स्थापना केली. श्री चक्रधर स्वामींनी सर्व जातीतील पुरुषांना आणि स्त्रियांना आपल्या पंथात सहभागी करून घेतले. महानुभव पंथ हा संन्यासाला प्राधान्य देणारा पंथ होता.<ref>{{स्रोत पुस्तक|title=१०१ कर्तुत्ववान स्त्रिया|last=कर्वे|first=स्वाती|publisher=उत्कर्ष प्रकाशन|year=२०१४|isbn=978-81-7425-310-1|location=पुणे|pages=१७}}</ref> संन्यासाचा कठोर आणि कडक आचारधर्म महादाईसेने स्वीकारला. संन्यासिनीचे जीवन जगताना श्री चक्रधरांच्या सेवेत, त्यांच्या भक्तीत रममाण होताना तिच्या व्यक्तिमत्वातील उपजत काव्याची ओढ जागी झाली. त्याच्या भक्ती डोळस होती. बुद्धीची, चौकसपानाची त्याला जोड होती. महादाईसेला श्रीकृष्णाच्या चरित्राविषयी विशेष ओढ होती.
|