"मुक्ताबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''संत मुक्ताबाई''' (जन्म : [[आळंदी]], महाराष्ट्र, इ.स.१२७९; समाधी : मेहूण ([[जळगाव जिल्हा]]), इ.स. १२९७) या [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[संत]] व कवयित्री होत्या. ह्या '''मुक्ताई''' या नावानेही ओळखल्या जातात. [[संत निवृत्तिनाथ]], [[संत ज्ञानेश्वर]] व [[संत सोपानदेव]] हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते.
 
संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण ४२ अभंग प्रसिद्ध आहेत. या अभंगांमध्ये त्यांनी दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानेश्वरानेज्ञानेश्वर याने दरवाज्याची ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे.

योगी चांगदेवांचा अहंकार छोट्याश्या मुक्ताबाईचे अलौकिक ज्ञान बघून गळून गेला होता. त्यांनी मुक्ताबाईना आपले गुरू मानले. मुक्ताबाईंनी ज्ञानबोध या ग्रंथाचेही लेखन केले आहे असे संशोधनान्ती स्पष्ट होते. ह्या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई ह्यांचा संवाद आलेला आहे. त्या समाधिस्थ होण्याच्या थोडेसे आधी झालेले हे लिखाण असावे, असे त्यातील अंतर्गत संदर्भांवरून लक्षात येते.
 
==जीवनपट==