"दुर्गा भागवत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) छो "दुर्गा भागवत" ला ने संरक्षित केले ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत) [स्थानांतरण=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत)) |
विकीकरण |
||
ओळ ३३:
}}
'''दुर्गा भागवत''' ([[फेब्रुवारी १०]], [[इ.स. १९१०|१९१०]], [[मध्यप्रदेश]] - [[मे ७]], [[इ.स. २००२|२००२]]) या [[मराठी भाषा|मराठी]] लेखिका होत्या.
==शिक्षण==
दुर्गा भागवत
भारताच्या आद्य स्त्री-शास्त्रज्ञ [[कमला सोहोनी]] या दुर्गा भागवतांच्या भगिनी होत्या. आचार्य [[राजाराम रामकृष्ण भागवत|राजारामशास्त्री भागवत]] हे दुर्गाबाईच्या आजीचे बंधू होते. दुर्गाबाईंचे वडीलही शास्त्रज्ञ होते.
==कारकीर्द==
सुस्पष्ट पामाणिक विचार, छोटी छोटी वाक्ये, नादमय शब्द आणि अर्थातील सुबोधता हे दुर्गाबाईंच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. संस्कृत, पाली, प्राकृत, इंग्रजी, मराठी, फ्रेंच, हिंदी इत्यादी भाषांचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. दुर्गाबाईंच्या लेखनात भारतातील सांस्कृतिक, पौराणिक, सामाजिक जीवनातले अनेक संदर्भ वाचकांना थक्क करून जातात. अभ्यास आणि लिखाण हे त्यांचे प्राण होते. म्हणूनच त्यांच्या लिखाणात संशोधन, विद्वत्ता आणि माहितीचा प्रचंड साठा या त्रयींचा अपूर्व संगम आढळतो. त्यांच्या लिखाणात स्पष्ट आणि प्रामाणिक विचारांबरोबरच कवी मनाची कोमलता आढळते. आणि "आपणाला जे जे ठावे ते इतरांना सांगावे" हा समर्थ रामदासांचा विचार प्रत्यक्षात आणण्याची तळमळ दुर्गाबाईंमध्ये दिसून येते. आणीबाणीच्या विरोधात त्यांनी घेतलेल्या भूमिकेत हा ठामपणा दिसून येतो. लोकसाहित्याच्या व्यासंगात बुडलेल्या दुर्गाबाईंच्या लेखनात लोकसाहित्याचा जिवंत रसरशीतपणा, मोहक साधेपणा, बोलभाषेची मांडणी आढळते, तशीच व्यासंग-चिंतन-मनन यांतून आलेली गहिरेपणाची डूबही. दुर्गाबाईंच्या लेखनातील मौलिकता, अस्सल भारतीयत्व, सनातनत्व यांचा वेध घेण्याची शक्ती यांमुळे ललित निंबधाच्या क्षेत्रात त्यांनी एक नवा मानदंड निर्माण केला आहे. फ्रेंच, जर्मन, संस्कृत इत्यादी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी दोन वर्षे समाजशास्त्र विभागप्रमुख म्हणून काम पाहिले. मुंबईतील एशियाटिक सोसायटीच्या त्या क्रियाशील कार्यकर्त्या होत्या. भारतातील सन्माननीय लेखिका म्हणून रशिया भेटीचे निमंत्रण त्यांना मिळाले होते. [[कऱ्हाड]] येथे १९७५ साली झालेल्या ५१व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. पंतप्रधान इंदिरा गांधींनी भारतावर १९७१ साली लादलेल्या आणीबाणीच्या काळात दुर्गा भागवत यांनी लेखनस्वातंत्र्य आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांविषयी ठाम जाहीर भूमिका घेतली, मात्र त्यांना (आणि पु.ल. देशपांडे यांना) अटक करायची हिंमत इंदिरा गांधीना झाली नाही.{{संदर्भ हवा}}
== अनुवादित साहित्य ==
|