"सत्यपाल चिंचोलीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) नवीन पान: '''सत्यपाल चिंचोलीकर''' (जन्म: इ.स. १९५२), '''सत्यपाल महाराज''' नावाने प्र... |
(काही फरक नाही)
|
१३:०२, १ मे २०१८ ची आवृत्ती
सत्यपाल चिंचोलीकर (जन्म: इ.स. १९५२), सत्यपाल महाराज नावाने प्रसिद्ध, हे महाराष्ट्रातील समाज प्रबोधक कीर्तनकार आहे.[१] सप्तखंजिरीच्या माध्यमातून ग्रामस्वच्छतेचा संदेश देतात. तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन चिंचोलीकर हातात कधी झाडू तर कधी खंजिरी घेत महाराष्ट्रातील विशेषत: विदर्भातील गावांत समाज प्रबोधन करत असतात. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी स्वच्छता, अंधश्रद्धा, जातिभेद, व्यसनमुक्ती, घनकचरा नियोजन, स्त्री भ्रूण हत्या, शिक्षणाचे महत्त्व, हगणदारी मुक्त गाव या विषयी जागरुकता पसरवली आहे.[२]
जन्म व कारकीर्द
इ.स. १९५२ साली अकोला जिल्ह्यातल्या सिरसोली या छोट्याशा गावात एका शिंपी कुटुंबात चिंचोलीकरांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब गरीब होते. त्यांच्या आईचे नाव सुशीला, भाऊ उकर्डा व लहान बहीण वनमाला व वडिलांचे नाव विश्वननाथ चिंचोळकर/चिंचोलीकर होते. त्यांचे वडील कपडे शिवण्याचा पारंपरिक व्यवसाय करत. लहानपणी त्यांना भजनांची आवड लागली. तुकडोजी महाराजांची व गाडगे बाबांची कीर्तने ऐकत ते मोठे झाले. आणि वयाच्या तेराव्या वर्षी गावात भजन, कीर्तन करायला सुरुवात केली.
अकोला जिल्ह्यातील अकोट गाव हे सत्यपाल चिंचोलीकर यांचे निवासस्थान आहे. आतापर्यंत देशभरातील १४,०००हून अधिक गावांत समाजप्रबोधनपर कीर्तने त्यांनी केली आहेत. "सामाजिक विषयांना आध्यात्मिकतेची आणि साथीला वादन कलेची जोड दिली की तो विषय थेट लोकांना भिडतो," असे सत्यापाल चिंचोलीकरांचे म्हणणे आहे.
आपल्या भजनातून ते सत्य परिस्थिती आणि सामाजिक विषय मांडतात. त्यांनी खंजिरी या ग्रामीण भागातील चर्मवाद्याला विकसित करुन सप्तखंजिरी म्हणजेच ७ खंजिरी एकत्र करून विविध आवाज काढायला सुरुवात केली. परिसर स्वच्छ करून ते दिवसाती सुरुवात करतात. दिवसभर वाचन लेखन आणि रात्री गावात जाऊन कीर्तने करतात.[३]
पुरस्कार
सत्यपाल महाराजांना खालिल पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत;
- महाराष्ट्र शासनाचा 'दलित मित्र पुरस्कार'
- 'समाजप्रबोधनकार'