"सेंद्रिय शेती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Pooja Jadhav (चर्चा | योगदान) No edit summary |
Pooja Jadhav (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ ४८:
*[[माशाचे खत]] - समुद्रकिनारी वाया गेलेल्या माशांपासून तसेच माशाचे तेल काढल्यानंतर उरलेल्या अवशेषापासून जे खत तयार होते ज्यात नत्र, स्फुरद आणि पालाश यांचे प्रमाण भरपूर असते याला माशाचे खत म्हणूनही म्हंटले जाते.
*[[खाटीकखान्याचे खत]] - खाटीकखान्यात जनावरांचे रक्त व अवशेषापासून जे खत बनवितात त्याला खाटीकखान्याचे खत म्हणतात यात नत्र आणि स्फुरद चांगल्या प्रमाणत असते.
==सेंद्रिय पदार्थामुळे होणारे फायदे==
*न'''त्र पुरवठा'''
जमिनीत सेंद्रिय खत टाकल्यास नत्राचा पुरवठा होतो हे नत्र झाडांच्या वेगवेगळ्या अवस्थेत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात.शेणखताव्यतिरिक्त कोंबड्यांपासून मिळणारे खत (कॊंबडीची विष्ठा ) रेशिम उद्योगातील टाकावू पदार्थ नत्राचा अधिक पुरवठा करतात.
*'''जमिनीची पाणी धरून ठेवण्याची शक्ती वाढते'''
०.५ % ते १.० % सेंद्रिय पदार्थ जमिनीला दिल्यास पाणी धरुन ठेवण्याची जमिनीची शक्ती दुप्पट होते.
[एक एकरात ८ टन शेणखत (कुजलेले) घातल्यास त्या जमिनीत सेंद्रिय पदार्थ ०.५ % ने वाढतात.]जमिनीतील सेंद्रिय खतांचा वापर झाडांद्वारे केला जातो.जमिनीची धुप होण्याच्या प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थ नाहिसे होत जातात.वरचेवर सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरविल्यास जमिनीची उत्पादन क्षमता वाढते व पाणी धरुन ठेवण्याची क्षमताही वाढत.
*'''स्फुरद व पालाश'''
सेंद्रिय खतंमुळे स्फुरद व पालाश झाडांना विविध अवस्थेत उपलब्ध होऊन झाडांमध्ये मुळांच्याद्वारे शोषली जातात.
*'''जमिनीचा सामू'''
सेंद्रिय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमिन आम्ल, विम्ल व क्षारयुक्त होत नाही.
*'''कँशन अँक्शचेंज कँपोसिटी (CEC)'''
कँशन एक्सचेंज कँपोसिटी म्हणजे क्षारांच्या कणांची अदलाबदल करण्याची जमिनीची शक्ती.सेंद्रिय खतांमुळे कँशन अँक्शचेंज कँपोसिटी २० ते ३० % ने वाढते .त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येते.व झाडांना संतुलीत पोषकद्रव्ये मिळतात.
*'''कर्बाचा पुरवठा'''
कर्ब किवा कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने जमिनीतील असंख्य जिवाणूंना त्याचा उपयोग त्यांच्या वाढीसाठी होतो. हे जिवाणू जमीनीतून अन्नद्रव्य झाडांना उपलब्ध करुन देतात.
*'''सेंद्रिय खतांचा परिणाम'''
सेंद्रिय खतांमुळे मातीवर सावली होऊन तापमान वाढत नाही सेंद्रिय पदार्थ माती घट्ट धरुन ठेवतात.उष्ण तापमानात जमिनीला थंड करणे व कमी तापमानात जमिन गरम ठेवणे सेंद्रिय खतामुळे शक्य आहे.
सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील असंख्य जिवाणूंची वाढ होते.त्यात रोग निर्माण करणारे जीवाणूपण वाढीस लागू शकतात .अशा वेळी ट्रायकोडरमा नावाचे जीवाणू जमिनीत सोडल्यास रोग निर्माण करणा-या जिवाणूंचा नाश होऊ शकतो.
==विविध टप्पे==
|