"रमाबाई आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १०९:
''आम्हा दुरावली मायेची सावुली. निर्वाण पावली आमची रमाई माऊली.'' पहाडासारखा महामानव बाबासाहेब ढसाढसा रडले. जवळ जवळ तीस वर्षांच्या संसारात प्रेमाने व धैर्याने भक्कम सोबत देणार्‍या रमाबाई मध्येच अचानक सोबत सोडून न परतीच्या वाटेने कायमच्या दूर निघून गेल्या आणि बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी झाले.
==थॉट्स अॉन पाकीस्तान==
बाबासाहेब आंबेडकरांचे रमाबाईंवर निस्सीम प्रेम होते. तिचे कष्ट पाहून त्यांचे मन तुटायचे. त्यांनी आपल्या रामूला पाठवलेल्या पत्रात त्यांच्या या भावना प्रतिबिंबित व्हायच्या. ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा आपला ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या ‘प्रिय रामू’ला अर्पण केला. अर्पणपत्रिकेत बाबासाहेबांनी लिहिले आहे की, ‘‘तिच्या हृदयाचा चांगूलपणा, मनाची कुलीनता आणि शीलाच्या पावित्र्यासह तिचे शालीन मनोधैर्य नि माझ्याबरोबर दु:ख सोसण्याची तिची तयारी अशा दिवसांत तिने मला दाखविली- जेव्हा मी नशिबाने लादलेला मित्रविरहित काळ चिंतेसह कंठीत होतो. या बिकट परिस्थितीत साथ देणाऱ्या रामूच्या आठवणींत कोरलेले हे प्रतीक...’’ आपल्या पत्नीबद्दलच्या भावना बाबासाहेबांच्या या अर्पणपत्रिकेतून व्यक्त झाल्या आहेत.
बाबासाहेबांनी ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा ग्रंथ रमाईच्या स्मृतीला समर्पित केला. त्यांनी अगदी मनमोकळेपणाने कबूल केले होते की. ‘रामू’मुळेच ते घडले आहेत. रामूने जर त्याग केला नसता आणि स्त्री हट्ट धरला असता, तर कदाचित ते फक्त भिवा किंवा भीमा म्हणून राहिले असते. ते सर्वांचे बाबासाहेब झाले नसते आणि विद्येचे डॉक्टरही झाले नसते.
 
== रमाईंवरील पुस्तके==
* रमाई – [[यशवंत मनोहर]]